शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

अंबाबाई मंदिराला लागते वर्षाला साडेनऊशे किलो कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 4:25 PM

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी वर्षाकाठी साडेनऊशे किलोंहून अधिक कुंकू लागते. अंबाबाईचे रोजचे धार्मिक विधी, नित्यनैमित्तिक कार्यक्रम, कुंकुमार्चन, शाश्वत पूजा, भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी पाकिटे या सगळ्यांसाठी या कुंकवाचा वापर केला जातो. नवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी असते.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिराला लागते वर्षाला साडेनऊशे किलो कुंकूनवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी

इंदुमती गणेश कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी वर्षाकाठी साडेनऊशे किलोंहून अधिक कुंकू लागते. अंबाबाईचे रोजचे धार्मिक विधी, नित्यनैमित्तिक कार्यक्रम, कुंकुमार्चन, शाश्वत पूजा, भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी पाकिटे या सगळ्यांसाठी या कुंकवाचा वापर केला जातो. नवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी असते.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी देवता असलेल्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षाला ५० ते ६० लाख भाविक येतात. देवीची महती सर्वदूर पसरल्याने या भाविकसंख्येत वाढ होत आहे. त्यात आॅनलाईन दर्शनसुविधेमुळे त्यात देशविदेशांतील भाविकांचीही भर पडली आहे.

स्त्रीदैवत म्हटले की कुंकवाचे महत्त्व ओघाने आलेच. त्यात आदिशक्ती अंबाबाई मंदिरातील धार्मिक विधींचे वेगळेपण आहे. अंबाबाईचे मंदिर पहाटे साडेचार वाजता उघडते. तेव्हापासून देवीची काकड आरती, सकाळी सहा, साडेआठ आणि ११ वाजता असे तीन वेळचे अभिषेक, दुपारची आरती, त्यानंतरची सालंकृत पूजा, शेजारती असे नित्य व नैमित्तिक विधी पार पडतात. रात्री १० वाजता गाभारा बंद होतो. पालखी सोहळा असेल त्या दिवशी थोडा उशीर होतो. याशिवाय सण, उत्सव, समारंभाच्या निमित्ताने विशेष पूजा बांधल्या जातात. नवरात्रौत्सवाच्या काळात अभिषेकांची संख्या दुपटीने वाढते.वरील सर्व धार्मिक कृत्यांसाठी कुंकू मोठ्या प्रमाणात लागते. ते हळदीपासून बनविलेले व शुद्ध प्रतीचे असावे लागते. त्यासाठी नुकतीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निविदा काढली आहे. ती दोन वर्षांसाठी देण्यात येणार असून, त्यासाठी तीनजणांनी अर्ज केला आहे.वर्षभर लागणारे कुंकू

  • दैनंदिन धार्मिक विधी : ३५० किलो
  • नवरात्रौत्सवात लागणारे कुंकू : ७० किलो
  • वर्षभरातील कुंकुमार्चन विधी : ४० किलो
  • ७०० महिलांचा सामुदायिक कुंकुमार्चन विधी : ७० किलो.

प्रसाद पाकिटे ८८ हजारअनेक परस्थ भाविक देवस्थान समितीकडे शाश्वत पूजेसाठीची पावती करून जातात. अशा भाविकांना समितीच्या वतीने प्रसादाचे पाकीट पोस्टाने अथवा कुरिअरने पाठविले जाते. त्यात हळदी-कुंकू, साखर आणि फुटाण्यांचा समावेश असतो. याशिवाय अभिषेकासह विविध धार्मिक विधींनंतर भाविकांना हे प्रसाद पाकीट दिले जाते. वर्षाला ८८ हजारांहून अधिक पाकिटे लागतात. त्यांपैकी केवळ नवरात्रौत्सवातील पाकिटांची संख्या ११ हजार आहे.साडेसातशे लिटर दूध, दोनशे लिटर दहीदेवीच्या पंचामृत अभिषेकासाठी दूध व दहीदेखील मोठ्या प्रमाणात लागते. त्यासाठी महिन्याला किमान ६२ लिटर दूध आणि १६ लिटर दही वापरले जाते. अशा रीतीने वर्षाला साडेसातशे लिटर दूध व दोनशे लिटर दही लागते; तर साखर ५० किलो, मध चार किलो लागतो.तीन हजार केळीसमितीच्या अखत्यारीत असलेल्या ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर व बिनखांबी गणेश मंदिरासाठी केळी मागविली जातात. अंगारकी संकष्टी असेल त्यावेळी दोन हजार केळी; तर दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीसाठी एक हजार केळी वापरली जातात. 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर