शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

राज्यातील १७ शहरांच्या हवेचा दर्जा सुधारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 12:40 AM

पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिन्याभरापूर्वी तो आराखडा शासनाला सादर केला. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आजअखेर दोन उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत.

ठळक मुद्दे कृती आराखडा निश्चित : मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, अ‍ौरंगाबादचा समावेश, महापालिकांची मदत

संतोष भिसे ।सांगली : हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सांगलीसह राज्यातील सतरा शहरांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चित केला आहे. तोे शासनाला सादर झाला आला असून, जानेवारीपासून अंमलबजावणीची अपेक्षा आहे.स्थानिक महापालिकांच्या मदतीने आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. नागपूर येथील निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई आयआयटीने आराखडा तयार केला आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद यासह १७ शहरांतील हवेतील प्रदूषणाच्या तीव्रतेची नोंद घेऊन त्यावरील उपाय आराखड्यात सुचवले आहेत. येत्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी करायची आहे. पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिन्याभरापूर्वी तो आराखडा शासनाला सादर केला. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आजअखेर दोन उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत.या शहरांसाठी आराखडाराष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पाअंतर्गत सतरा शहरांत कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक व उल्हासनगर या शहरांचा समावेश आहे. आराखड्याच्या अंमलबजावणीत तेथील महापालिकांचाही सहभाग असेल.

हे असतील उपायहवेचा दर्जा सुधारण्यासाठी वृक्षारोपणाची घनता वाढवणे, धुळीवर नियंत्रणासाठी कच्च्या रस्त्यांची संख्या कमी करुन पक्के डांबरी रस्ते तयार करणे, वनाच्छादीत क्षेत्र वाढवणे, बांधकामांवर नियंत्रण तसेच त्यांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालणे असे काही उपाय आराखड्यात आहेत. रस्ते आणि वाहतुकीचे व्यवस्थापन, पार्किंगसाठी राखीव क्षेत्र, रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता, सीएनजी इंधनाच्या वापरला प्रोत्साहन, विद्युत आणि सीएनजीवर चालणाºया वाहनांचा वापर वाढवणे या मुद्द्यांचही आराखड्यात समावेश आहे.

‘शहरांची हवा स्वच्छ आणि आरोग्यदायी रहावी यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ विविध उपाययोजना करत आहे. हवेच्या गुणवत्तेवरही लक्ष ठेवून आहे. ती सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यात सुचवलेल्या उपायांची अंमलबजावणी केली जाणार असून, त्यामुळे हवेचा दर्जा वाढण्यास मदत होईल’.- नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण