शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

कोल्हापूर :शहरातील हवा प्रदूषण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 13:04 IST

या अधिविभागाने करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर परिसर आणि महाद्वार रोड, शिवाजी विद्यापीठ परिसर आणि दाभोळकर कॉर्नर ते सीबीएस स्टँड परिसरात दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये हवा प्रदूषणाचे मापन केले. त्याची तुलना दि. १६ ते २२ मार्च दरम्यानच्या मापनासमवेत केली. एप्रिलमधील मापनात एसओटूचे प्रमाण मार्चमधील लॉकडाऊनच्या कालावधीतील सरासरीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी झाले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवरील एसओटू, एनओएक्स,आरएसपीएमचे प्रमाण निम्म्यावर; लॉकडाऊनमधील चित्र

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘जनता कर्फ्यू’नंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये कोल्हापूर शहरातील हवा प्रदूषणाचे मापन शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाने केले. त्यामध्ये हवेतील सल्फर डायआॅक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायआॅक्साईड (एनओटू), सूक्ष्म धूलीकणांचे प्रमाण (आरएसपीएम) कमी झाल्याचे दिसून आले.

या अधिविभागाने करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर परिसर आणि महाद्वार रोड, शिवाजी विद्यापीठ परिसर आणि दाभोळकर कॉर्नर ते सीबीएस स्टँड परिसरात दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये हवा प्रदूषणाचे मापन केले. त्याची तुलना दि. १६ ते २२ मार्च दरम्यानच्या मापनासमवेत केली. एप्रिलमधील मापनात एसओटूचे प्रमाण मार्चमधील लॉकडाऊनच्या कालावधीतील सरासरीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. एनओटूचे प्रमाण २५ टक्क्यांनी, तर आरएसपीएमचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. एसओटू, एनओटू आणि आरएसपीएमचे प्रमाण हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनापेक्षा ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी चेतन भोसले, फिल्ड असिस्टंट अजय गौड, अमित माने यांनी प्रदूषण मापनाचे काम केल्याची माहिती पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सोमवारी दिली.लॉकडाऊनमधील हवेतील प्रदूषकांचे प्रमाणठिकाण महिना एसओटू एनओटू आरएसपीएमदाभोळकर कॉर्नर मार्च(दि. १६ ते २२) २६.१९ ४५.१५ १२८.४७एप्रिल(दि. ६ ते १२) १८.४५ ३०.८२ ७४.६५महाद्वार रोड मार्च २०.५९ ३७.५१ ९८.९६एप्रिल १३.६१ २५.५४ ५३.८२शिवाजी विद्यापीठ मार्च १२.१५ १७.५४ ५७.९९एप्रिल ७.१३ १२.७२ ४२.३६

मानांकन असे (युजीपरमीटर (मिलिग्रॅममध्ये)*सल्फर डायआॅक्साईड : ८०*नायट्रोजन डायआॅक्साईड : ८०*सूक्ष्म धूलीकण : १०० 

लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असणे, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक आस्थापना आणि हॉटेल, बेकरी आदींतून बाहेर पडणारा धूर, रस्त्यावर जाळला जाणारा कचरा बंद झाल्याने हवेतील प्रदूषके कमी झाली आहेत.- डॉ. पी. डी. राऊत 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण