शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रुकडी येथे होणार कृषी विकास-संशोधन केंद्र रयत शिक्षण संस्थेचा प्रकल्प : जिल्ह्यातील शेतकºयांना येथे कृषी पर्यटन, मार्गदर्शन केंद्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:43 IST

रुकडी माणगाव : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विकास व संशोधन केंद्र या अँग्री हबची उभारणी करण्यात

अभय व्हनवाडे ।रुकडी माणगाव : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विकास व संशोधन केंद्र या अँग्री हबची उभारणी करण्यात येत आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून, शेतकºयांना येथे कृषी पर्यटन व मार्गदर्शन केंद्राची सुविधा उपलब्ध होणार आहे.

रयत शिक्षण संस्थेस छ. राजाराम महाराज यांनी १३६ एकर माळ जमीन देणगी दाखल दिली होती. येथे मुलांचे वसतिगृह, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कृषी शिक्षणाची सुविधा संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता एकूण जमिनीपैकी ३५ एकर जमिनीवर शिक्षणसंस्था विस्तारली आहे. उर्वरित जमीन विनावापर पडून राहिली आहे. या जमिनीचा वापर व्हावा याकरिता येथील माजी मुख्याध्यापक व शिक्षक प्रयत्न करीत होते. याशिवाय या संस्थेचे कार्यकारी संचालक मंडळ, सदस्य डॉ. एन. डी. पाटील येथे काहीतरी प्रकल्प उभारण्यासाठी आग्रही होते. यातून येथे अँग्री हब उभारण्याची संकल्पना पुढे आली.

संस्थेच्या १0१ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा विचार पुढे आला. हा विचार संस्थेचे माजी अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या समोर मांडण्यात आला. त्यांच्या पुढाकाराने जैन इरिगेशन यांच्या सल्ल्याने येथील क्षेत्रात ऊस, आंबा, पेरू, केळी, आदी पिकांची लागवड करण्यात येणार आहे. याकरिता येथील पंचगंगा नदीपासून जवळपास पावणेतीन किलोमीटर अंतरावर पाणी आणण्यात आले आहे. यासाठी दहा इंच व्यासाची जलवाहिनी व पंचवीस एच.पी.च्या दोन मोटरींचा वापर केला आहे.

सर्व क्षेत्र ओलिताखाली येण्याकरिता ठिबक सिंचन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पिकांना खते व पाणी उपलब्धतेचे तंत्रज्ञान हाताळणी संगणकाद्वारे जैन इरिगेशन जळगाव येथून कार्यालयात बसून करणार आहे. मजुरांचा तुटवडा भासल्यास फक्त चार कर्मचाºयांवर कामकाज चालावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यासाठी ५६ बाय ५६ या अंतराचे मध्य ठिकाणी शेततळे उभारण्यात आले आहे. या शेततळ्यात ६७ लाख लिटर व पाच दिवस पुरेल इतकी पाणी साठवणूक क्षमता आहे.उत्पादित होणाºया वस्तंूची प्रात्यक्षिके१0१ एकर क्षेत्रात ४१ एकर ऊस, २0 एकर हंगामी पीक, १५ एकर केशर आंबा, १५ एकर लखनौ पेरू, १0 एकर जी-९ केळीची लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय तीन एकर क्षेत्रात पथ प्रकल्प व जैन इरिगेशनच्या उत्पादित होणाºया वस्तंूची प्रात्यक्षिके ठेवण्यात येणार आहेत.

शेतकरी पर्यटनस्थळ, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, कृषी महाविद्यालय साकारण्यात येणार असून, याकरिता १४ एकर जमिनाचा वापर करण्यात येणार आहे.या प्रकल्प केंद्राची उभारणी करण्यास माजी अध्यक्ष शरद पवार व डॉ. एन. डी. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत; पण त्याशिवाय जैन इरिगेशन यांनी येथे उभारण्यात येणाºया तंत्रज्ञानाच्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम स्वीकरणार आहे.