शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

रुकडी येथे होणार कृषी विकास-संशोधन केंद्र रयत शिक्षण संस्थेचा प्रकल्प : जिल्ह्यातील शेतकºयांना येथे कृषी पर्यटन, मार्गदर्शन केंद्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:43 IST

रुकडी माणगाव : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विकास व संशोधन केंद्र या अँग्री हबची उभारणी करण्यात

अभय व्हनवाडे ।रुकडी माणगाव : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विकास व संशोधन केंद्र या अँग्री हबची उभारणी करण्यात येत आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून, शेतकºयांना येथे कृषी पर्यटन व मार्गदर्शन केंद्राची सुविधा उपलब्ध होणार आहे.

रयत शिक्षण संस्थेस छ. राजाराम महाराज यांनी १३६ एकर माळ जमीन देणगी दाखल दिली होती. येथे मुलांचे वसतिगृह, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कृषी शिक्षणाची सुविधा संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता एकूण जमिनीपैकी ३५ एकर जमिनीवर शिक्षणसंस्था विस्तारली आहे. उर्वरित जमीन विनावापर पडून राहिली आहे. या जमिनीचा वापर व्हावा याकरिता येथील माजी मुख्याध्यापक व शिक्षक प्रयत्न करीत होते. याशिवाय या संस्थेचे कार्यकारी संचालक मंडळ, सदस्य डॉ. एन. डी. पाटील येथे काहीतरी प्रकल्प उभारण्यासाठी आग्रही होते. यातून येथे अँग्री हब उभारण्याची संकल्पना पुढे आली.

संस्थेच्या १0१ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा विचार पुढे आला. हा विचार संस्थेचे माजी अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या समोर मांडण्यात आला. त्यांच्या पुढाकाराने जैन इरिगेशन यांच्या सल्ल्याने येथील क्षेत्रात ऊस, आंबा, पेरू, केळी, आदी पिकांची लागवड करण्यात येणार आहे. याकरिता येथील पंचगंगा नदीपासून जवळपास पावणेतीन किलोमीटर अंतरावर पाणी आणण्यात आले आहे. यासाठी दहा इंच व्यासाची जलवाहिनी व पंचवीस एच.पी.च्या दोन मोटरींचा वापर केला आहे.

सर्व क्षेत्र ओलिताखाली येण्याकरिता ठिबक सिंचन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पिकांना खते व पाणी उपलब्धतेचे तंत्रज्ञान हाताळणी संगणकाद्वारे जैन इरिगेशन जळगाव येथून कार्यालयात बसून करणार आहे. मजुरांचा तुटवडा भासल्यास फक्त चार कर्मचाºयांवर कामकाज चालावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यासाठी ५६ बाय ५६ या अंतराचे मध्य ठिकाणी शेततळे उभारण्यात आले आहे. या शेततळ्यात ६७ लाख लिटर व पाच दिवस पुरेल इतकी पाणी साठवणूक क्षमता आहे.उत्पादित होणाºया वस्तंूची प्रात्यक्षिके१0१ एकर क्षेत्रात ४१ एकर ऊस, २0 एकर हंगामी पीक, १५ एकर केशर आंबा, १५ एकर लखनौ पेरू, १0 एकर जी-९ केळीची लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय तीन एकर क्षेत्रात पथ प्रकल्प व जैन इरिगेशनच्या उत्पादित होणाºया वस्तंूची प्रात्यक्षिके ठेवण्यात येणार आहेत.

शेतकरी पर्यटनस्थळ, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, कृषी महाविद्यालय साकारण्यात येणार असून, याकरिता १४ एकर जमिनाचा वापर करण्यात येणार आहे.या प्रकल्प केंद्राची उभारणी करण्यास माजी अध्यक्ष शरद पवार व डॉ. एन. डी. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत; पण त्याशिवाय जैन इरिगेशन यांनी येथे उभारण्यात येणाºया तंत्रज्ञानाच्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम स्वीकरणार आहे.