शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र की स्वतंत्र लढणार?, नेत्यांवरच ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:22 IST

महायुती विरुद्ध इंडिया आघाडीत लढत

कोल्हापूर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक चार महिन्यांत होणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबतचा आदेश दिल्याने, आता या निवडणुका कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे इच्छुकांचे चेहरे फुलले आहेत. सध्याच्या स्थितीत महायुती विरुद्ध इंडिया आघाडी या निवडणुकीत आमनेसामने येणार हे निश्चित आहे.२१ मार्च, २०२२ रोजी जिल्हा परिषदेमध्ये ‘प्रशासकराज’ सुरू झाले. इतर मागास आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न गेल्याने ‘तारखेवर तारीख’ सुरू होती. त्यामुळे इच्छुक नाराज झाले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अजूनही महामंडळांच्या निवडी जाहीर झालेल्या नसताना कार्यकर्त्यांना कुठेच संधी मिळत नसल्याने सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते थोडे अस्वस्थच होते, परंतु आता चार महिन्यांत निवडणुका होणार असल्याने जिल्ह्यातील राजकारणाला उकळी फुटणार आहे.राज्यात सध्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेना एकत्र आहे, तर काँग्रेस, उद्धवसेना, शरदचंद्र पवार पक्षांसह डाव्या संघटना एकत्र आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आमदार विनय कोरे महायुतीमध्ये सहभागी आहेत. सध्याची जिल्ह्यातील राजकीय स्थिती पाहता, सर्वच ठिकाणी महायुती विरुद्ध इंडिया अशी लढत न होता गटातटाचीच लढाई होणार आहे. अशात महायुतीमध्येच काही ठिकाणी रंगतदार लढती होणार आहेत. तुलनेत इंडिया आघाडीत एकवाक्यता ठेवून लढण्यासाठी आमदार सतेज पाटील पुढाकार घेतील असे चित्र आहे.

महायुती म्हणून एकत्रजिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रपणे लढवणार असल्याचे या आधीच जाहीर केले आहे. काही ठिकाणी जर एकमत झाले नाही, तरी आम्ही स्वतंत्र लढून सत्तेच्या जोडण्या घालताना महायुती म्हणूनच एकत्रितपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जागा किती राहणार?जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी येणारी निवडणूक होणार की, नगरपंचायतींमुळे ही संख्या कमी होणार, याबाबत मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही. यातील इतर मागासवर्गीयांचे आरक्षणही जैसे थे राहणार आहे. सदस्यसंख्या वाढविण्याचा मध्यंतरी घेण्यात आलेला निर्णय नंतरच्या काळात रद्द करण्यात आला आहे, परंतु गेल्या काही वर्षांत चंदगड, आजरा, हातकणंगले, हुपरी, शिरोळ येथे नगरपंचायती, नगरपालिका झाल्याने, त्यामुळे काही जागा कमी होणार का, हे स्पष्ट होण्यासाठी आणखी दोन महिने लागणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी