शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
2
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
3
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठे आर्थिक विधेयक संसदेत होणार सादर
4
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
5
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
6
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
7
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
8
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
9
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
10
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
11
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
12
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
13
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
14
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
15
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
16
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
17
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
18
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
19
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
20
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
Daily Top 2Weekly Top 5

वाचनाची चिकित्सा डोळस हवी

By admin | Updated: December 5, 2014 23:19 IST

शाम मानव : जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधी कणकवलीत मार्गदर्शन

कणकवली : एखाद्या वचनाची चिकित्सा करता येत नाही, तेव्हा श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतर होते. त्यासाठी डोळस श्रद्धा ठेवावी. आपल्या श्रद्धा वेळोवेळी तपासून पहाव्यात आणि त्यांची चिकित्सा करावी, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. शाम मानव यांनी व्यक्त केले. आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात वैद्यानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायद्यासंदर्भात काल (गुरुवार) रात्री आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभय करगुटकर, निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, समाजकल्याणचे सहआयुक्त जयंत चाचरकर, सुरेश झुरमुरे, तहसीलदार समीर घारे आदी उपस्थित होते.शाम मानव म्हणाले की, अध्यात्मात खूप चांगल्या, हितकारक गोष्टी आहेत. त्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या आमच्या शिबिरातही शिकवतो. अध्यात्म मनाशी रिलेटेड आहे. विज्ञानाशी लढणारे अध्यात्म अस्तित्वात नाही. माणसाने विचार करण्याच्या शक्तीवर समृद्धी निर्माण केली. वैज्ञानिक प्रक्रियेतून गेल्या १०० वर्षांत जेवढी प्रगती झाली तेवढी मागील दहा लाख वर्षांत झाली नव्हती. सुरेश झुरमुरे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)लोकांच्या भावना न दुखावता प्रबोधन करा : दिलीप पांढरपट्टेदिलीप पांढरपट्टे म्हणाले की, बहुतेक सगळे बुवा थोतांड निर्माण करणारे असतात. कोकणातील वातावरणच असे आहे की येथे अंधश्रद्धा जास्त निर्माण होतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची व्याख्या धूसर आहे. अंधश्रद्धेविरोधात काम करताना लोकांना बरोबर घेऊन गेले पाहिजे. या कामाविरोधात लोक चिडून बोलतात हे चळवळीचे अपयश आहे. समोरच्याला शत्रू करण्याची भूमिका असू नये. लोकांच्या भावना न दुखावता प्रबोधन केले पाहिजे. एखाद्याला धार्मिक कृत्यातून समाधान मिळत असेल तर त्याच्या भानगडीत पडू नये. प्रत्येक वेळी समोरच्याला काही कळत नाही, असे समजू नये. जादूटोणाबाबत प्रशिक्षण आवश्यकबुवाबाजीमुळे होणाऱ्या लुबाडणुकीवर आळा घालण्यासाठी ड्रग अ‍ॅण्ड रेमेडीज अ‍ॅक्ट अपुरा पडू लागला. त्यासाठी प्रभावी कायद्याची गरज वाटू लागली. त्यातून झालेल्या चळवळीतून जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला. हा कायदा एकमेवाद्वितीय असून व्यापक आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांनाही तो समजला पाहिजे. हा कायदा देवाधर्माविरोधात नाही. तरीही कायद्यातील तरतुदींमुळे निर्दोष माणसे तुरूंगात जाऊ शकतात. यासाठी कलम ६ वेगळे ठेवावे लागले. कोणीही तक्रार करण्याच्या तक्रारीने या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, असा आमदारांचा आक्षेप होता. त्यासाठी दक्षता अधिकारी नेमण्यात आले आहेत, शाम मानव म्हणाले.