शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

वाचनाची चिकित्सा डोळस हवी

By admin | Updated: December 5, 2014 23:19 IST

शाम मानव : जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधी कणकवलीत मार्गदर्शन

कणकवली : एखाद्या वचनाची चिकित्सा करता येत नाही, तेव्हा श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतर होते. त्यासाठी डोळस श्रद्धा ठेवावी. आपल्या श्रद्धा वेळोवेळी तपासून पहाव्यात आणि त्यांची चिकित्सा करावी, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. शाम मानव यांनी व्यक्त केले. आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात वैद्यानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायद्यासंदर्भात काल (गुरुवार) रात्री आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभय करगुटकर, निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, समाजकल्याणचे सहआयुक्त जयंत चाचरकर, सुरेश झुरमुरे, तहसीलदार समीर घारे आदी उपस्थित होते.शाम मानव म्हणाले की, अध्यात्मात खूप चांगल्या, हितकारक गोष्टी आहेत. त्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या आमच्या शिबिरातही शिकवतो. अध्यात्म मनाशी रिलेटेड आहे. विज्ञानाशी लढणारे अध्यात्म अस्तित्वात नाही. माणसाने विचार करण्याच्या शक्तीवर समृद्धी निर्माण केली. वैज्ञानिक प्रक्रियेतून गेल्या १०० वर्षांत जेवढी प्रगती झाली तेवढी मागील दहा लाख वर्षांत झाली नव्हती. सुरेश झुरमुरे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)लोकांच्या भावना न दुखावता प्रबोधन करा : दिलीप पांढरपट्टेदिलीप पांढरपट्टे म्हणाले की, बहुतेक सगळे बुवा थोतांड निर्माण करणारे असतात. कोकणातील वातावरणच असे आहे की येथे अंधश्रद्धा जास्त निर्माण होतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची व्याख्या धूसर आहे. अंधश्रद्धेविरोधात काम करताना लोकांना बरोबर घेऊन गेले पाहिजे. या कामाविरोधात लोक चिडून बोलतात हे चळवळीचे अपयश आहे. समोरच्याला शत्रू करण्याची भूमिका असू नये. लोकांच्या भावना न दुखावता प्रबोधन केले पाहिजे. एखाद्याला धार्मिक कृत्यातून समाधान मिळत असेल तर त्याच्या भानगडीत पडू नये. प्रत्येक वेळी समोरच्याला काही कळत नाही, असे समजू नये. जादूटोणाबाबत प्रशिक्षण आवश्यकबुवाबाजीमुळे होणाऱ्या लुबाडणुकीवर आळा घालण्यासाठी ड्रग अ‍ॅण्ड रेमेडीज अ‍ॅक्ट अपुरा पडू लागला. त्यासाठी प्रभावी कायद्याची गरज वाटू लागली. त्यातून झालेल्या चळवळीतून जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला. हा कायदा एकमेवाद्वितीय असून व्यापक आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांनाही तो समजला पाहिजे. हा कायदा देवाधर्माविरोधात नाही. तरीही कायद्यातील तरतुदींमुळे निर्दोष माणसे तुरूंगात जाऊ शकतात. यासाठी कलम ६ वेगळे ठेवावे लागले. कोणीही तक्रार करण्याच्या तक्रारीने या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, असा आमदारांचा आक्षेप होता. त्यासाठी दक्षता अधिकारी नेमण्यात आले आहेत, शाम मानव म्हणाले.