शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

आपले सरकार पोर्टल सहा दिवसांपासून बंद, एमपीएससीचे अर्जच भरता येईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:25 IST

लाखो विद्यार्थी घायगुतीला; प्रशासनाचे दुर्लक्ष

शिवाजी सावंतगारगोटी (जि. कोल्हापूर) : एकीकडे स्पर्धा परीक्षेला बळ देण्याचा गवगवा सरकारकडून केला जात असला तरी दुसरीकडे याच परीक्षांमध्ये अडथळे ठरणाऱ्या तांत्रिक बाबींकडे मात्र सरकार सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचा प्रत्यय सध्या राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी घेत आहे. महाराष्ट्र शासनाचे ‘आपले सरकार’ हे ऑनलाइन पोर्टल मागील सहा दिवसांपासून बंद असून, अर्ज दाखल करण्याच्या वेबसाइटचे सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील लाखो एमपीएससी परीक्षार्थी अडचणीत आले आहेत.अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ एप्रिल असून, एकाच दिवशी लाखो अर्ज ऑनलाइन दाखल होतील का, अर्ज दाखल न झाल्यास होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.आपले सरकार ऑनलाइन महा ई सेवा केंद्रातून जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलेयर तसेच शिक्षणाशी संबंधित अन्य महत्त्वाचे दस्तऐवज, अर्ज करण्यासाठी हे पोर्टल वापरले जाते. मात्र, पोर्टलवर तांत्रिक बिघाड आल्याने अर्ज प्रक्रिया ९ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपासून ठप्प आहे. एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची उद्या गुरुवारपर्यंत अंतिम मुदत आहे. पोर्टल बंद राहत असल्याने अर्ज करणे कठीण होऊन बसले आहे.

तांत्रिक अडचणींमुळे त्रासपोर्टलवर लॉगइन होत नाही किंवा लॉगइन झाल्यावर अर्ज भरताना सर्व्हर एरर दाखवते. भरलेला अर्ज सेव्ह होत नाही किंवा सबमिट करताना पोर्टल क्रॅश होते. यामुळे वेळ, पैसे आणि मेहनत वाया जात आहे.

ग्रामीण भागात अधिक फटकाग्रामीण भागातील इंटरनेटचा वेग आधीच मंद आहे. त्यात पोर्टल काम करत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आणि अनेक शिक्षण संस्थांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा मुदतवाढ जाहीर केलेली नाही.

आपले सरकार हे महाराष्ट्र सरकारचे सरकार असल्याप्रमाणे वागत असून, ते पूर्णपणे निरंकुश आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला त्यांना जबाबदार धरून कडक कारवाई करावी. विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढवून न दिल्यास विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून याचा सरकारला जाब विचारावा लागेल. - अविनाश शिंदे, तालुकाप्रमुख, शिंदेसेना, भुदरगड

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारonlineऑनलाइनMPSC examएमपीएससी परीक्षा