शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेच्या गराड्यात अंगणवाडी..!

By admin | Updated: July 4, 2015 00:01 IST

बालकांच्या आरोग्याला धोका : आटपाडी तहसील चौक परिसरात कचऱ्याचे ढीग

अविनाश बाड - आटपाडी -कचऱ्याच्या ढिगातून वाट काढत आणि जीवघेण्या दुर्गंधीत बसूनच आटपाडीच्या तहसील कार्यालयाजवळील अंगणवाडीतील मुले खाऊ खात आहेत. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने, ५० मुलांच्या या अंगणवाडीत आता २८ मुले उरली आहेत. बाहेरच्या घाणीत खेळा, नाही तर दिवसभर कोंडवाड्यातील जनावरांप्रमाणे कोंडून राहा... अशा अवस्थेत शिक्षण घेणाऱ्या दुर्भागी चिमुरड्यांच्या पालकांनी, ‘वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि पुढाऱ्यांनो, १० मिनिटे या अंगणवाडीत नुसते थांबून दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा!’ असे बक्षीसच जाहीर केले आहे. येथील तहसील कार्यालयाच्या चौकाजवळ पूर्वेस शासकीय बचत भवनची इमारत आहे. या इमारतीच्या बाजूस शासकीय जनावरांचा दवाखाना आहे. जवळच बचत गटातील साहित्य विक्रीसाठी नवी इमारत बांधली आहे. तिथे विविध योजनांचे साहित्य ठेवले आहे. त्यामुळे या परिसरात सतत वर्दळ असते. या इमारतीच्या दक्षिणेस बचत धामच्या पाठीमागे प्रकाशवाडी नं. ४ ची अंगणवाडीची इमारत आहे. विशेष म्हणजे ९३ हजार ७५० रुपये एवढे जागतिक बँकेचे अनुदान मिळून २००२ मध्ये ही इमारत बांधण्यात आली आहे. या अंगणवाडीत दत्तनगरपासून गुलाल कलेक्शनपर्यंतच्या परिसरातील मुले येतात. या अंगणवाडीत पंखा आहे. पण विजेचे कनेक्शन नसल्याने मुलांसाठी ती एक शोभेची वस्तू ठरली आहे. अंगणवाडीच्या पूर्व दिशेस कुंपणाची भिंत आहे. बंद पडलेला हातपंप आणि कचरा आहे. इमारतीच्या दक्षिण बाजूस चिकटून बचत धामची बंद असलेली मोठी शौचालयाची टाकी आहे. या टाकीला, दोन मुले सहज आत जातील एवढी मोठी भोके आहेत. त्यातून विविध कार्यक्रमांतील शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ टाकत टाकल्याने ते कुजून त्याची दुर्गंधी पसरली आहे. टाकीशेजारी मोठा उकिरडा आहे. त्यावरील कचरा वाऱ्याने सगळ्या परिसरात पसरल्याने, तो खाण्यासाठी येणारी मोकाट जनावरे आणि डुकरांचा इथे सुळसुळाट झाला आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी ८-१५ दिवसांतून येऊन कचरा उचलण्याऐवजी, तो तिथेच जाळण्याचा पराक्रम करतात. कचऱ्याची राख पुढे ८-१५ दिवस अंगणवाडीच्या परिसरात उडत राहिल्याने मुलांची दाणादाण उडविते आहे. या दिशेहून मुले साचलेल्या कचऱ्यातून वाट काढतच अंगणवाडीत विद्यार्जनासाठी (?) येतात.अंगणवाडीच्या पश्चिम दिशेला बचतधाम इमारतीची मागील बाजू आहे. तिथे उघड्यावरील ‘स्वच्छतागृहा’ने दुर्गंधीत आणखीनच वाढ केली आहे. दक्षिण बाजूस जनावरांचाच दवाखाना आहे. त्यामुळे जनावरांची तपासणी आणि पुन्हा दवाखान्याच्या इमारतीच्या अडोशाने दुसरे उघडे स्वच्छतागृह बनले आहे. अशी चारीही बाजूंनी घाण असलेल्या ठिकाणी गेली १२ वर्षे अंगणवाडी सुरु (?) आहे. आटपाडी पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे. पण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी आणि कारभाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे.बिस्किटेही वादाच्या भोवऱ्यातजत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोषण आहाराप्रमाणेच अंगणवाडीतील लहान मुलांना दिली जाणारी बिस्किटेही चांगल्या प्रतवारीची व गुणवत्तेची नाहीत, कमी दर्जाची आहेत, निकृष्ट आहेत. तीही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.अंगणवाडीतील पोषण आहार कालबाह्य झालेला आहे. याची पंचायत समितीकडे तक्रार केली आहे. चौकशी करण्याचे आश्वासन दिले, पण त्यावर कोणतीही चौकशी झालेली नाही. कालबाह्य पोषण आहार परत घ्यावा, दुसरा द्यावा. - भैरु कांबळे,सामाजिक कार्यकर्ते, दरीबडचीपोषण आहाराबाबत तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित आहार पुरविणाऱ्या ठेकेदारांशी पत्रव्यवहार केला आहे. त्याने यापुढे आपल्याकडून अशी चूक होणार नाही, असे लिहून दिले आहे. पोषण आहार कालबाह्य झालेला नाही. तो आजही चालतो.- ए. आर. मडकेसहायक गटविकास अधिकारी