शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

Kolhapur: भांडणाचा राग; कुरुंदवाडमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून, पोलिसांनी पाठलाग करून केली तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:16 IST

वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता 

कुरुंदवाड : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय दीपक चव्हाण (वय २६) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास येथील माळभागावरील सिद्धार्थ चौकात ही घटना घडली.स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी दुपारी पाठलाग करून शिये फाटा परिसरात तिघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. यश सुनील काळे (वय १९, रा. कुरुंदवाड), अमन जमीर दानवाडे (२२, रा. त्रिशूळ चौक, गावभाग, इचलकरंजी) व श्रीजय बाबू बडसकर (२२, रा. औरवाड) अशी आरोपींची नावे असून, आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.

दरम्यान, खुनाची घटना समजताच अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे पहाटेपासून घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत चव्हाण व आरोपी यश काळे दोघे मित्र असून, किरकोळ कारणावरून शनिवारी दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी अक्षयने यशला मारहाण केल्याने याचा बदला घेण्याचा निश्चय यशने केला होता.पीरपंजांची दहावी असल्याने रविवारी रात्री दोघेही येथील माळभागावर समोरासमोर आले होते. रागाने एकमेकांकडे पाहिल्याचे निमित्त करून यशने आपल्या इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षयवर चाकूने वार करून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत जीव वाचवण्यासाठी अक्षय सन्मित्र चौकात गेला. तेथील नागरिकांनी त्याला शहरातीलच खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.खुनाची घटना समजताच सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस पोलिस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सकाळी मृत अक्षयची मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस करीत आहेत.

अक्षय गुन्हेगारी प्रवृत्तीचामृत अक्षय चव्हाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. मारामारीप्रकरणी त्याच्यावर येथील पोलिसांत गुन्हाही दाखल आहे.

वाद पुन्हा उफाळणार?खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी माळभागावर दोन गटांत पुन्हा तुंबळ हाणामारी झाली. पोलिस घटनास्थळी येताच दोन्ही गट पसार झाले. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता असल्याची चर्चा शहरात आहे.

गुन्हेगारी वाढलीशहरात गांजाची नशा करण्याचे प्रमाण वाढले असून तरुण वर्गासह अल्पवयीन मुलेही राजरोसपणे गांजांचे सेवन करत आहेत. ही घटनाही गांजाच्या नशेतच झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिसांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानेच शहरात गुन्हेगारी वाढत आहे.