शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

Kolhapur: भांडणाचा राग; कुरुंदवाडमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून, पोलिसांनी पाठलाग करून केली तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:16 IST

वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता 

कुरुंदवाड : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय दीपक चव्हाण (वय २६) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास येथील माळभागावरील सिद्धार्थ चौकात ही घटना घडली.स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी दुपारी पाठलाग करून शिये फाटा परिसरात तिघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. यश सुनील काळे (वय १९, रा. कुरुंदवाड), अमन जमीर दानवाडे (२२, रा. त्रिशूळ चौक, गावभाग, इचलकरंजी) व श्रीजय बाबू बडसकर (२२, रा. औरवाड) अशी आरोपींची नावे असून, आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.

दरम्यान, खुनाची घटना समजताच अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे पहाटेपासून घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत चव्हाण व आरोपी यश काळे दोघे मित्र असून, किरकोळ कारणावरून शनिवारी दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी अक्षयने यशला मारहाण केल्याने याचा बदला घेण्याचा निश्चय यशने केला होता.पीरपंजांची दहावी असल्याने रविवारी रात्री दोघेही येथील माळभागावर समोरासमोर आले होते. रागाने एकमेकांकडे पाहिल्याचे निमित्त करून यशने आपल्या इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षयवर चाकूने वार करून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत जीव वाचवण्यासाठी अक्षय सन्मित्र चौकात गेला. तेथील नागरिकांनी त्याला शहरातीलच खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.खुनाची घटना समजताच सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस पोलिस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सकाळी मृत अक्षयची मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस करीत आहेत.

अक्षय गुन्हेगारी प्रवृत्तीचामृत अक्षय चव्हाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. मारामारीप्रकरणी त्याच्यावर येथील पोलिसांत गुन्हाही दाखल आहे.

वाद पुन्हा उफाळणार?खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी माळभागावर दोन गटांत पुन्हा तुंबळ हाणामारी झाली. पोलिस घटनास्थळी येताच दोन्ही गट पसार झाले. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता असल्याची चर्चा शहरात आहे.

गुन्हेगारी वाढलीशहरात गांजाची नशा करण्याचे प्रमाण वाढले असून तरुण वर्गासह अल्पवयीन मुलेही राजरोसपणे गांजांचे सेवन करत आहेत. ही घटनाही गांजाच्या नशेतच झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिसांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानेच शहरात गुन्हेगारी वाढत आहे.