शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भांडणाचा राग; कुरुंदवाडमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून, पोलिसांनी पाठलाग करून केली तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:16 IST

वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता 

कुरुंदवाड : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय दीपक चव्हाण (वय २६) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास येथील माळभागावरील सिद्धार्थ चौकात ही घटना घडली.स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी दुपारी पाठलाग करून शिये फाटा परिसरात तिघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. यश सुनील काळे (वय १९, रा. कुरुंदवाड), अमन जमीर दानवाडे (२२, रा. त्रिशूळ चौक, गावभाग, इचलकरंजी) व श्रीजय बाबू बडसकर (२२, रा. औरवाड) अशी आरोपींची नावे असून, आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.

दरम्यान, खुनाची घटना समजताच अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे पहाटेपासून घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत चव्हाण व आरोपी यश काळे दोघे मित्र असून, किरकोळ कारणावरून शनिवारी दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी अक्षयने यशला मारहाण केल्याने याचा बदला घेण्याचा निश्चय यशने केला होता.पीरपंजांची दहावी असल्याने रविवारी रात्री दोघेही येथील माळभागावर समोरासमोर आले होते. रागाने एकमेकांकडे पाहिल्याचे निमित्त करून यशने आपल्या इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षयवर चाकूने वार करून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत जीव वाचवण्यासाठी अक्षय सन्मित्र चौकात गेला. तेथील नागरिकांनी त्याला शहरातीलच खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.खुनाची घटना समजताच सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस पोलिस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सकाळी मृत अक्षयची मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस करीत आहेत.

अक्षय गुन्हेगारी प्रवृत्तीचामृत अक्षय चव्हाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. मारामारीप्रकरणी त्याच्यावर येथील पोलिसांत गुन्हाही दाखल आहे.

वाद पुन्हा उफाळणार?खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी माळभागावर दोन गटांत पुन्हा तुंबळ हाणामारी झाली. पोलिस घटनास्थळी येताच दोन्ही गट पसार झाले. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता असल्याची चर्चा शहरात आहे.

गुन्हेगारी वाढलीशहरात गांजाची नशा करण्याचे प्रमाण वाढले असून तरुण वर्गासह अल्पवयीन मुलेही राजरोसपणे गांजांचे सेवन करत आहेत. ही घटनाही गांजाच्या नशेतच झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिसांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानेच शहरात गुन्हेगारी वाढत आहे.