शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भुस्खलनाचा धोका, स्थलांतर होण्याच्या सूचना देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 16:23 IST

कायमस्वरुपी स्थलांतर गरजेचे

कोल्हापूर : दरड कोसळणे, भुस्खलन, जमीन खचणे, रस्ता खचणे, अशा वेगवेगळ्या कारणाने जिल्ह्यातील ७६ गावे भीतीच्या छायेखाली आहेत. या गावांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयार केली असून यातील काही गावे ही लोकवस्तीची असून मुसळधार पाऊस सुरू झाला की तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात.पावसाळा सुरू झाला की पुराच्या धोक्यामुुळे कोल्हापूर जिल्हा नेहमीच हायअलर्टवर असतो. याकाळात अतिवृष्टी होत असलेल्या ठिकाणी दरडी कोसळणे, भुस्खलन होणे, जमीन खचणे किंवा रस्ता खचणे असे प्रकार होतात. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात याचे प्रमाण जास्त आहे.

सन २०२१ दरड कोसळून राधानगरीतील दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. तसेच करवीरमधील शिपेकरवाडी येथेही अशी घटना घडली होती. अतिवृष्टी सुरू झाली की जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून या लोकांचे स्थलांतर केले जाते. यात जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींच्या वतीने जनजागृती केली आहे.

जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणे / गावेशाहुवाडी : घोलसवडे, पणुरे, कासार्डे. कांडवणपैकी आगलावेवाडी, माणपैकी ठाणेवाडी, गेळवडे, पुसर्ले, लोलाणे, करंजफेण, मारळे, सावर्डे, शिराळा मलकापूर, विशाळगड भोसलेवाडी, शित्तूर वरुण, कडवेपैकी शिंदेवाडी, उखळू, पणुद्रेपैकी हिंगणेवाडी, भेडवडे, उखळूपैकी अंबाईवाडीपैकी खोतवाडी, शिराळा मलकापूर धनगरवाडा.पन्हाळा : बडेवाडी डोंगर, पोहाळवाडी दरड, गिरोली जोतिबा दरड, पावनगड दरड, मंगळवार पेटते पन्हाळा दरड, बुधवार पेठ परिसर मुख्य रस्ता, मौजे मराठवाडी, म्हाळूंगे ॲडव्हेंचर पार्क, आपटी.करवीर : महे, बोलोली, शिपेकरवाड एरिया, आमशी सातेरी, खुपिरे.भुदरगड : मौेजे डेलेपैकी भारमलवाडी, फये, भेंडेवेडी, बीजवडे, पडखांबेपैकी खोतवाडी, पडखांबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कालवडेपैकी हारफोडेवाडी, टिक्केवाडी, मंदापूरगडहिंग्लज : चिंचेवाडी, सामानगड.राधानगरी : कोणाली तर्फ असंडोली, पाटपन्हाळादरड, गैैबीघाट, शिरगाव, सावतवाडी, मानेवाडी, खामकरवाडी, गोटेवाडी, केळोशी बुद्रूक, केळोशी खुर्द, पाल खुर्द, तळगाव, पडसाळी, राई, माणबेट, चौके, राऊतवाडी, पणोरी, कासारपुतळे, पाल बुद्रूक पैकी मोहितेवाडी, आपटाळ, चोरवाडी, कुराडवाडी, ऐनीपैकी धमालेवाडी, ऐनीपैकी भैरी धनगरवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, धामणवाडीपैकी हणबरवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, पांडेवाडी, सोळांकूर रामनगर.कागल : बोळावी ठाणेवाडी, बेलेवाडी मासा, चिकोत्रा खोरे हासूर बुद्रूक, रांगोळी.आजरा : वाजरे, खोतवाडी, पेरणोली, हारपेवाडीचंदगड : गंधारगडगगनबावडा : अणदूर रोड, कडवे रोड, मांडुकली, शेळोशी रोड.

कायमस्वरुपी स्थलांतर गरजेचेजिल्ह्यातील या ७६ गावांमधील धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे कायमस्वरुपी स्थलांतर होणे गरजेचे आहे. याठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसवण्याचा विचार झाला होता, पण अजून त्यावर कार्यवाही झालेली नाही.

जिल्ह्यातील ७६ ठिकाणे धोकादायक असली तरी त्यातील मानवी वस्ती असलेली मोजकीच गावे आहे. अतिवृष्टी सुरू झाली की परिस्थिती बघून तेथील नागरिकांना जवळचे सभागृह, समाज मंदिर, शाळांमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात. - प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlandslidesभूस्खलनRainपाऊस