शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

कोल्हापूर उत्तरसाठी ईर्ष्येने ६० टक्के मतदान, शनिवारी फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 11:38 IST

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम यांच्यात लक्षवेधी लढत झाली. या निवडणूकीचा फैसला शनिवारी (दि.१६) होणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत मंगळवारी ईर्षेने आणि तणावपूर्ण वातावरणात सुमारे ६१ टक्के मतदान झाले. मतदानावेळी दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते समोरासमोर आल्याने प्रचंड घोषणाबाजीच्या घटना घडल्या. त्यातून कांही ठिकाणी तणाव निर्माण झाला.महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम यांच्यात ही लक्षवेधी लढत होत आहे. या निवडणूकीचा फैसला शनिवारी (दि.१६) होत आहे. या निकालाचा राज्याच्या सत्ताकारणांवर फारसा परिणाम होणार नसला तरी महाविकास आघाडीतील तीन पक्षांची एकजूट कितपत सांधली आहे याचा निकाल ही लढत देणार आहे.या निवडणुकीत रिंगणात पंधरा उमेदवार असले तरी लढत दुरंगीच झाली. प्रत्यक्ष उमेदवारांपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील विरुध्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वर्चस्वाची लढाई असेही या लढतीला स्वरुप आले. एकूण २ लाख ९२ हजार मतदार होते. मतदानासाठी ३५७ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठे,शुक्रवार पेठ अशा पेठांपासून ते राजारामपुरी-ताराबाई पार्कचा उच्चभ्रू वसाहती, शाहुपुरी-लक्ष्मीपुरीची व्यापारी वस्ती व गोरगरिब कष्टकरी झोपडपट्टीधारक असे संमिश्र मतदार असलेला हा मतदार संघ आहे. उन्हाचा तडाखा असूनही लोक मतदानासाठी बाहेर पडले.काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने ही निवडणूक लागली. सुरुवातीच्या टप्प्यात ती बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले परंतू आगामी महापालिका निवडणूक व महाविकास आघाडीच्या कारभाराविरुध्दचा जनमताचा कौल अजमावण्यासाठी भाजपने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला गेल्याने शिवसेना सुरुवातीला नाराज झाली. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या मतांवरच शेवटपर्यंत डोळा ठेवून निवडणूक लढवली.

आणखी काय हवं...भाजपने राज्यभरातून नेते, कार्यकर्ते प्रचारात उतरवले. शिवसेनेचेही मुंबई-पुण्याचे नगरसेवक प्रचारात होते. दोन्ही बाजूंकडून पैशांचे वाटप, जेवणावळीपासून किराणा दुकानांतून घरपोहोच माल पुरवण्यापर्यंत सर्व प्रकारची यंत्रणा राबवली.

एवढी चुरस कशामुळे..

ज्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारांनी पेटीएमद्वारे एक हजार स्वीकारल्यास ईडीची धमकी मतदारांना दाखवली, त्यांच्याच पक्षाचे सहा प्रमुख कार्यकर्ते मतदारांना पैसे देताना आदल्या दिवशी पोलिसांनी पकडले. कांहीही झाले तरी ही लढत जिंकायचीच या ईर्षेनेच ही लढत झाल्याने या एका मतदार संघाच्या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष वेधले.

हिंदुत्वाचा पुकारा...भाजपने ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भगव्या टोप्या घालून मतदान केंद्रापर्यंत जयश्रीराम..च्या घोषणा दिल्या. त्याला शिव-शाहूंच्या विचारधारेच्या कोल्हापूरकरांनी मतपेटीतून काय उत्तर दिले यावरच याचा निकाल ठरणार आहे. भाजपची आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची राजकीय दिशा काय असेल याचीच चुणुक या लढतीने दाखवली आहे.

वेळ व झालेले मतदान आकडेवारी

वेळ : टक्केवारी सकाळी ७ ते ९ : ६. ९६ टक्केसकाळी ९ ते ११ : २०. ५७ टक्केसकाळी ११ ते दुपारी १ : ३४.१८ टक्केदुपारी १ ते ३ : ५५.२६ टक्केसायंकाळी ६ वाजेपर्यंत : ६०.०९ टक्के (अंदाजे)

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस