शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Kolhapur: करवीर पंचायत समिती पतसंस्थेत ५ कोटींचा ढपला; जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:38 IST

मृत सचिवाकडून वसुलीसाठी संस्थेकडून प्रयत्न

कोल्हापूर : करवीर पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत ५ कोटी ३१ लाख २४ हजार रुपयांचा ढपला पाडल्याची तक्रार पतसंस्थेच्या ४८ ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. संस्थेचे मृत सचिव पी. ए. परिट यांनी हा ढपला पाडल्याचे संस्थेच्या अध्यक्षासह संचालकांचे म्हणणे आहे, परंतु परिट गैरव्यवहार करत असताना, अध्यक्षासह संचालकांना काहीच कसे लक्षात आले नाही, अशी विचारणा ठेवीदारांनी केली आहे. संस्थेचे अंतर्गत लेखापरीक्षक बी. एस. पाटील यांनी २०२३-२४ सालचे लेखापरीक्षण केले आहे. त्यांनीही अपहार झाल्याचे मान्य केले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.ठेवीदार सुबराव पवार, आप्पासाहेब नुल्ले, गणेश शेलार, सुरेखा पवार, शहिदा हेरवाडे, प्रकाश घबाडे आदींनी त्यांची किती रकमेची फसवणूक झाली, त्या रकमेसह ही तक्रार केल्याने ही बाब गंभीर आहे. निवृत्त मुख्याध्यापक कृष्णा बाबाजी वरेकर यांनी निवृत्तीनंतर मिळालेले पैसे, तसेच गावाकडील जमीन विकून मिळालेले पैसे सुमारे ६० लाख रुपये या संस्थेत ठेवले होते. ही रक्कम परत मिळेना या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.ठेवीदार जानेवारी २०२४ पासून ठेवीची मागणी करत आहेत, परंतु एकाही ठेवीदारास ते पैसे देऊ शकलेले नाहीत. त्यावरून संभ्रमाचे वातावरण तयार झाल्यावर संस्थेच्या अध्यक्षांनी, संचालक व मानद सचिव यांची एकत्रित बैठक घेतली. त्यामध्ये ठेवीदारांनी एकूण १३ कोटी ठेवींपैकी अडीच कोटी कर्ज वजा जाता उर्वरित १० कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी कुठे आहेत, अशी विचारणा केल्यावर त्यांना काहीच सांगता आले नाही. संस्थेच्या चालू खात्यावर सध्या फक्त पाच-सहा लाख रुपयेच असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

स्थावर मालमत्ताच नाही..

या पतसंस्थेने १५० ठेवीदारांच्या सुमारे १३ कोटींच्या ठेवी स्वीकारल्या आहेत. या संस्थेची स्थावर मालमत्ता काहीही नाही. संस्थेचा आर्थिक व्यवहार फक्त ठेवींवरच सुरू होता. कॅश क्रेडिट नाही. संस्थेची आर्थिक उलाढाल करण्याची क्षमता अडीच ते तीन कोटी रुपयांचीच आहे. असे असतानाही संस्थेने गरजेपेक्षा जास्त ठेवी स्वीकारून संगनमताने खोटे वार्षिक अहवाल तयार करून गैरव्यवहार केल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

एकाही ठेवीदारास ठेव मिळेना..संस्थेचे सचिव एम. ए. देसाई यांनी आमची चूक झाली, जी काय शिक्षा होईल, ती आम्ही भोगावयास तयार आहे, अशी कबुली ठेवीदारांसमक्ष दिली होती. सर्व ठेवीदारांची रकम संस्थेचे मयत सचिव पी. ए. परिट यांच्या मालमत्तेतून तत्काळ वसूल करून आणि सर्व संचालक मंडळ मिळून रक्कम भरून ठेवी परत करण्याची व्यवस्था करत आहे, असे आश्वासन दिल्यामुळे आजपर्यंत आम्ही ठेवीदार संयमाने राहिलो, परंतु आजअखेर एकाही ठेवीदाराला रक्कम परत मिळाली नसल्याने आम्ही तक्रार केल्याचे ठेवीदारांनी सांगितले. संस्थेने मयत सचिव परिट यांच्या व त्यांच्या वारसांविरुद्ध सहकार न्यायालय क्रमांक १ मध्ये मनाई दावा दाखल केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर