शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

'कोल्हापुरातील पंचगंगा पुलाजवळ कमानीच्या पुलासाठी ४०० कोटी लागणार', पूरग्रस्तांचे उपोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:24 IST

राष्ट्रीय महामार्गासाठी पंचगंगा पुलाजवळ टाकण्यात येणाऱ्या भरावाचे काम थांबवले

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गासाठी पंचगंगा पुलाजवळ टाकण्यात येणाऱ्या भरावाऐवजी कमानीचा पूल करण्याबाबत केंद्र सरकारकडून सूचना आल्या आहेत, त्यामुळे भराव टाकला जाणार नाही, असे आश्वासन देत, यासाठी अतिरिक्त ४०० कोटी लागणार असल्याचे रविवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपमुख्य अभियंता गोविंद बैरवा यांनी सांगितले. याबाबत, पूरग्रस्त समितीच्या वतीने पंचगंगा पुलाजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.

सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जाेरात सुरू आहे. पंचगंगा पुलानजीक मातीचा भराव टाकून रस्त्याचे काम केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. तरीही संबंधित विभागाने दाद न दिल्याने पूरग्रस्त समन्वयक समितीचे प्रमुख बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत काम थांबवण्याची मागणी केली होती. काम थांबवले नाहीतर रविवारी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार, पंचगंगा पुलानजीक बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखाली पूरबाधित गावातील लोकप्रतिनिधी उपोषणाला बसले होते.बाजीराव खाडे म्हणाले, महापुराच्या वेळी जिल्ह्यातील गावांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. हा भराव टाकला तर गावेच्या गावे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा.

आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे म्हणाले, पूरबाधित क्षेत्रात खासगी अथवा सार्वजनिक कामे करता येत नाहीत, हा नियम आहे. कमानीचा पूल करण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा अधिक नुकसान दरवर्षी बाधित गावातील होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपमुख्य अभियंता गोविंद बैरवा म्हणाले, भराव टाकण्याचे काम बंद करत असल्याचे पत्र यापूर्वीच दिलेले आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना आलेल्या आहेत. शिरोली ते रेल्वे उड्डाणपूलपर्यंत कमानी उभ्या कराव्या लागणार असून, यासाठी अंदाजे ४०० कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव येत्या आठ-दहा दिवसांत सरकारकडे पाठवला जाणार आहे. तो तातडीने मंजूर करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.यावेळी मिलिंद श्रीराव, पाडळी बुद्रूकचे सरपंच शिवाजी गायकवाड, प्रयाग चिखलीचे सरपंच रोहित पाटील, शिरोली पुलाचीच्या सरपंच पद्मजा करपे, शियेच्या सरपंच शीतल मगदूम, सांगरुळच्या सरपंच शीतल खाडे, उपसरपंच उज्ज्वला लोंढे, शिरोली दुमालचे सरपंच सचिन पाटील, पाडळी खुर्दचे सरपंच नानाजी पालकर, ‘गोकूळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, हंबीरराव वळके आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीfloodपूरhighwayमहामार्ग