शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'कोल्हापुरातील पंचगंगा पुलाजवळ कमानीच्या पुलासाठी ४०० कोटी लागणार', पूरग्रस्तांचे उपोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:24 IST

राष्ट्रीय महामार्गासाठी पंचगंगा पुलाजवळ टाकण्यात येणाऱ्या भरावाचे काम थांबवले

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गासाठी पंचगंगा पुलाजवळ टाकण्यात येणाऱ्या भरावाऐवजी कमानीचा पूल करण्याबाबत केंद्र सरकारकडून सूचना आल्या आहेत, त्यामुळे भराव टाकला जाणार नाही, असे आश्वासन देत, यासाठी अतिरिक्त ४०० कोटी लागणार असल्याचे रविवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपमुख्य अभियंता गोविंद बैरवा यांनी सांगितले. याबाबत, पूरग्रस्त समितीच्या वतीने पंचगंगा पुलाजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.

सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जाेरात सुरू आहे. पंचगंगा पुलानजीक मातीचा भराव टाकून रस्त्याचे काम केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. तरीही संबंधित विभागाने दाद न दिल्याने पूरग्रस्त समन्वयक समितीचे प्रमुख बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत काम थांबवण्याची मागणी केली होती. काम थांबवले नाहीतर रविवारी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार, पंचगंगा पुलानजीक बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखाली पूरबाधित गावातील लोकप्रतिनिधी उपोषणाला बसले होते.बाजीराव खाडे म्हणाले, महापुराच्या वेळी जिल्ह्यातील गावांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. हा भराव टाकला तर गावेच्या गावे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा.

आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे म्हणाले, पूरबाधित क्षेत्रात खासगी अथवा सार्वजनिक कामे करता येत नाहीत, हा नियम आहे. कमानीचा पूल करण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा अधिक नुकसान दरवर्षी बाधित गावातील होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपमुख्य अभियंता गोविंद बैरवा म्हणाले, भराव टाकण्याचे काम बंद करत असल्याचे पत्र यापूर्वीच दिलेले आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना आलेल्या आहेत. शिरोली ते रेल्वे उड्डाणपूलपर्यंत कमानी उभ्या कराव्या लागणार असून, यासाठी अंदाजे ४०० कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव येत्या आठ-दहा दिवसांत सरकारकडे पाठवला जाणार आहे. तो तातडीने मंजूर करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.यावेळी मिलिंद श्रीराव, पाडळी बुद्रूकचे सरपंच शिवाजी गायकवाड, प्रयाग चिखलीचे सरपंच रोहित पाटील, शिरोली पुलाचीच्या सरपंच पद्मजा करपे, शियेच्या सरपंच शीतल मगदूम, सांगरुळच्या सरपंच शीतल खाडे, उपसरपंच उज्ज्वला लोंढे, शिरोली दुमालचे सरपंच सचिन पाटील, पाडळी खुर्दचे सरपंच नानाजी पालकर, ‘गोकूळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, हंबीरराव वळके आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीfloodपूरhighwayमहामार्ग