शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST

सदाशिव मोरे । आजरा : आजरा-गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के (६७४ द.ल.घ.फू.) पाणीसाठा शिल्लक आहे. ...

सदाशिव मोरे ।

आजरा

: आजरा-गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के (६७४ द.ल.घ.फू.) पाणीसाठा शिल्लक आहे. वळवाच्या पावसाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपला असला आहे. परंतु, पिण्याच्या पाण्यासाठी शेवटच्या आवर्तनातून ३५० द.ल.घ.फू. पाणी चित्रीतून सोडले जाणार असून, ३२४ द.ल.घ.फू. पाणीसाठा शिल्लक ठेवला जाणार आहे.

आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पामुळे आजऱ्यातील ६१४ तर गडहिंग्लजमधील ८१३६ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चित्रीसह एरंडोळ, धनगरवाडी, खानापूर प्रकल्पामुळे १३,०८५ हेक्टर क्षेत्राला लाभ झाला आहे. त्यामुळे आजरा व मलिग्रे जि. प. मतदार संघामधील बहुतांशी गावे हिरवीगार झाली आहेत. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना हिरण्यकेशी नदीवरून झाल्या आहेत. त्यामुळे आजरा व गडहिंग्लज तालुक्याला गेल्या दहा ते बारा वर्षांत पाणी टंचाईच्या झळा कमी बसत आहेत.

चित्रीच्या पाण्यावर दररोज दोन मेगावॅट विजेची निर्मितीही केली जाते. चित्री धरण पावसाळ्यात पूर्ण भरल्यानंतर व उन्हाळ्यात पाण्याची आवर्तने सुरू झाल्यानंतर वीज निर्मिती केली जाते.

चित्री धरणातून चालू वर्षी तीन आवर्तनातून पाणी सोडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई कोठेही बसली नाही. अद्यापही धरणातील पाणीसाठा मुबलक आहे. चित्रित ३६ टक्के, एरंडोळ ६८ टक्के, धनगरवाडी २० टक्के, खानापूर २१ टक्के असा पाणीसाठा शिल्लक आहे.

चालूवर्षी झालेल्या वळवाच्या पावसाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे चित्रीतून येत्या चार दिवसांत शेवटचे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी सुरू केले जाणार आहे. ३५० द.ल.घ.फू. पाणीसाठा चौथ्या आवर्तनातून सोडला जाणार आहे.

------------------------

*

चित्रीच्या पाण्यावर विद्युत निर्मिती

चित्रीच्या पाण्यावर २०११ पासून तात्यासाहेब कोरे वारणानगर या कंपनीकडून वीजनिर्मिती सुरू आहे. पावसाळ्यात चित्री धरण १०० टक्के भरल्यानंतर व उन्हाळ्यात पाण्याची आवर्तने सुरू झाल्यानंतर दररोज दोन मेगावॅट विजेची निर्मिती होते.