शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST

सदाशिव मोरे । आजरा : आजरा-गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के (६७४ द.ल.घ.फू.) पाणीसाठा शिल्लक आहे. ...

सदाशिव मोरे ।

आजरा

: आजरा-गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के (६७४ द.ल.घ.फू.) पाणीसाठा शिल्लक आहे. वळवाच्या पावसाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपला असला आहे. परंतु, पिण्याच्या पाण्यासाठी शेवटच्या आवर्तनातून ३५० द.ल.घ.फू. पाणी चित्रीतून सोडले जाणार असून, ३२४ द.ल.घ.फू. पाणीसाठा शिल्लक ठेवला जाणार आहे.

आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पामुळे आजऱ्यातील ६१४ तर गडहिंग्लजमधील ८१३६ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चित्रीसह एरंडोळ, धनगरवाडी, खानापूर प्रकल्पामुळे १३,०८५ हेक्टर क्षेत्राला लाभ झाला आहे. त्यामुळे आजरा व मलिग्रे जि. प. मतदार संघामधील बहुतांशी गावे हिरवीगार झाली आहेत. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना हिरण्यकेशी नदीवरून झाल्या आहेत. त्यामुळे आजरा व गडहिंग्लज तालुक्याला गेल्या दहा ते बारा वर्षांत पाणी टंचाईच्या झळा कमी बसत आहेत.

चित्रीच्या पाण्यावर दररोज दोन मेगावॅट विजेची निर्मितीही केली जाते. चित्री धरण पावसाळ्यात पूर्ण भरल्यानंतर व उन्हाळ्यात पाण्याची आवर्तने सुरू झाल्यानंतर वीज निर्मिती केली जाते.

चित्री धरणातून चालू वर्षी तीन आवर्तनातून पाणी सोडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई कोठेही बसली नाही. अद्यापही धरणातील पाणीसाठा मुबलक आहे. चित्रित ३६ टक्के, एरंडोळ ६८ टक्के, धनगरवाडी २० टक्के, खानापूर २१ टक्के असा पाणीसाठा शिल्लक आहे.

चालूवर्षी झालेल्या वळवाच्या पावसाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे चित्रीतून येत्या चार दिवसांत शेवटचे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी सुरू केले जाणार आहे. ३५० द.ल.घ.फू. पाणीसाठा चौथ्या आवर्तनातून सोडला जाणार आहे.

------------------------

*

चित्रीच्या पाण्यावर विद्युत निर्मिती

चित्रीच्या पाण्यावर २०११ पासून तात्यासाहेब कोरे वारणानगर या कंपनीकडून वीजनिर्मिती सुरू आहे. पावसाळ्यात चित्री धरण १०० टक्के भरल्यानंतर व उन्हाळ्यात पाण्याची आवर्तने सुरू झाल्यानंतर दररोज दोन मेगावॅट विजेची निर्मिती होते.