शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

३५ लाखांची कामे उरकली पाच लाखांत

By admin | Updated: December 19, 2014 00:13 IST

‘रोहयो’ गैरव्यवहार : करवीर तालुक्यातील वडकशिवाले ते इस्पुर्ली, नदी पाणवठा रस्त्याचे काम निकृष्ट, कारवाई कधी?--लोकमत हेल्पलाईन

भारत चव्हाण -कोल्हापूर -करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या वडकशिवाले ते इस्पुर्ली तसेच नदी पाणवठा रस्त्याचे ३५ लाखांचे काम प्रत्यक्षात पाच लाखांत उरकल्याची जाहीर तक्रार झाली. त्यानुसार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाली. कामात मोठी अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आला; परंतु त्याच्या अनुषंगाने सर्व संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस सरकारी यंत्रणेला आजतागायत झाले नसल्याने आश्चर्य व्यक्तहोत आहे. सरकारी निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाला की नाही याची शहानिशा करण्याचे ज्यांचे कर्तव्य आहे, अशा यंत्रणेसमोर झालेला घोटाळा पुढे आणल्यावरही या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्याचे सरकारी यंत्रणेचे इंगीत काय, असा सवालही तक्रारदारांमधून होत आहे. वडकशिवाले गावातील रस्त्यांच्या कामासाठी २८ लाख ६५ हजार व ५ लाख ९० हजार असा निधी मंजूर झाला होता. सन २०११ ते १३ या आर्थिक वर्षात ही कामे पूर्ण झाली आहेत. या रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्याची तक्रार १५ आॅगस्ट व त्यानंतर ८ सप्टेंबर २०१३ च्या ग्रामसभेत करण्यात आली; परंतु त्यास कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे घोटाळ्याची तक्रार रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना आयुक्त नागपूर यांच्याकडे झाली. गावातील निवृत्त सुभेदार शंकरराव पाटील हे तक्रारदार आहेत. तक्रारीच्या अनुषंगाने रोजगार हमी योजना विभागाचे सहायक अभियंता वर्ग - २ यांच्यामार्फत चौकशी झाली. चौकशीत अनियमितता आढळून आली. मंजूर निधी आणि प्रत्यक्ष झालेले काम यामध्ये मोठी तफावत असल्याचेही स्पष्ट झाले. अहवाल सहायक अभियंता वर्ग - २ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. खरे तर सरकारी निधी योग्य पद्धतीने त्या त्या कामावर खर्च होतो की नाही याची काम सुरू असताना पाहणी होणे अपेक्षित होते; परंतु तसे कोणतेही कर्तव्य या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी पार पाडले नाही. सगळेच कसे काही झालेच नाही, अशा आविर्भावात मूग गिळून गप्प बसले. त्यामुळे तक्रारदार हताश होऊन त्यांनी ‘लोकमत हेल्पलाईन’कडे धाव घेऊन रस्त्याच्या कामात कसा गैरव्यवहार झाला आहे, याची कागदोपत्री मांडणी केली. सरकारी यंत्रणेवरील विश्वास उडालेल्या तक्रारदारांनी आता ‘लोकमत’नेच आवाज उठवावा, असा आग्रह धरला. व्यक्ती कोणीही असोत या घोटाळ्यात ज्यांचा सहभाग आहे, अशांवर कारवाई ही झालीच पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. तपासणीचे केवळ नाटक तक्रारदाराच्या चिकाटीमुळे घोटाळ्याविरोधात पाठपुराव्यामुळे तपासणीचे नाटक गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. कामाची चारवेळा तपासणी झाली. काल, बुधवारीच तक्रार निवारण अधिकारी व करवीर गटविकास अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा तपासणी केली. आता अशी तपासणी किती दिवस करणार हा कळीचा मुद्दा बनला आहे. कारवाई कधी होणार रस्त्यांच्या कामात अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले असतानाही या कामावर पांघरूण कोण घालत आहे, त्यांचा हेतू काय आहे याविषयीच आता संशय बळावत चालला आहे. तरीही सरकारी अधिकारी संबंधितांवर कारवाई करण्याचे टाळत आहेत. एकदा काय ते स्पष्ट करा. घोटाळा झाला असेल, तर होय म्हणून कारवाई करा, अन्यथा झाला नाही म्हणून तरी सांगा, असे म्हणायची वेळ तक्रारदारांवर आली आहे.नियोजन विभागाचे आदेश राज्य सरकारच्या नियोजन विभागाचे कार्यासन अधिकारी र. रा. वाघमारे यांनी २० जानेवारी २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वडकशिवाले येथील रस्त्याच्या कामाची चौकशी करून त्याचा अहवाल आठ दिवसांत पाठवावा, असा आदेश दिला होता. चौकशीमधील निष्कर्षमंजूर अंदाजपत्रकातील भरावासाठी लागणारी माती वमऊ मुरुम ५१४० घनमीटर प्रत्यक्षात ६५.६० रुपयांप्रमाणे ३,४८,००५ इतक्या रकमेत होणे अपेक्षित होते. मापदंडाप्रमाणे कोणतेही मोजमाप नोंद न करता काल्पनिकपणे १०७३३ घनमीटर कठीण मुरुमाचे २३३.०८ रुपये प्रतिघनमीटर प्रमाणे २५,४१,०५२ इतकी रक्कम अदा केली.प्रत्यक्षात काम तपासले असता ३,४८,००५ इतक्या रकमेचेही काम झालेले नाही. पाण्याच्या निर्गतीसाठी गटरखुदाई केलेली नाही.हजेरीपटावरील हजेरी नोंदी करीत असताना एप्रिल महिना ३१ दिवसांचा नसतो याचे भानही कोणत्याही पातळीवर असू नये, याचे आश्चर्य वाटते. रस्त्याच्या कामात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे.