शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

शेतकरी संघाच्या शिरोळ शाखेत ३३ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 5:49 PM

शेतकरी सहकारी संघाच्या शिरोळ शाखेत व्यवस्थापक अमर गुरव यांनी तब्बल ३३ लाखांचा अपहार केला आहे. कर्नाटकात खतविक्री करून तिचे पैसे परस्पर हडप करण्याचा उद्योग केल्याचे उघडकीस आल्याने संघात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघाच्या शिरोळ शाखेत ३३ लाखांचा अपहारव्यवस्थापकांनी खतविक्रीत मारला हात : पाचजणांचे पथक चौकशीसाठी

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या शिरोळ शाखेत व्यवस्थापक अमर गुरव यांनी तब्बल ३३ लाखांचा अपहार केला आहे. कर्नाटकात खतविक्री करून तिचे पैसे परस्पर हडप करण्याचा उद्योग केल्याचे उघडकीस आल्याने संघात एकच खळबळ उडाली आहे.

संघाची तपासणी यंत्रणा आठवड्याला आढावा घेत असताना एवढा मोठा अपहार होतोच कसा? असा सवाल केला जात असून, यामध्ये केवळ व्यवस्थापकच गुंतला आहे की आणखी कोण, हे शोधण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनासमोर आहे.संपूर्ण आशिया खंडात नावाजलेल्या शेतकरी संघाची वाटचाल गेल्या दहा-पंधरा वर्षांत बिकट आहे. संघाचा बैल काहीसा उठून कामाला लागला; पण संघातील अपहाराने त्याच्या पायांतील बळ गेले आहे. शिरोळ शाखेत आतापर्यंतचा सर्वांत मोठा अपहार झाला आहे.

शाखा व्यवस्थापक अमर गुरव यांनी खताची विक्री कर्नाटकात केली, स्टॉक बुकला माल शिल्लक दाखवत त्याचे पैसे संघाकडे न भरता स्वत: वापरले. गेले अनेक वर्षे शाखेत हा प्रकार सुरू असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. गुरव यांनी संघाचे वरिष्ठ अधिकारी व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा अपहार केल्याची चर्चा सुरू आहे.

सोमवार (दि. १४) पासून संघात दबक्या आवाजात अपहाराची चर्चा सुरू होती. मंगळवारी सकाळी संघ व्यवस्थापनाने पाचजणांचे पथक पाठविले. त्यानंतर संघात एकच खळबळ उडाली. पथकाने दिवसभर कशा पद्धतीने व किती वर्षांपासून अपहार सुरू झाला, याची कसून चौकशी सुरू आहे. दोन दिवसांत पथक अहवाल सादर करणार आहे.

सक्षम तपास यंत्रणा; मग अपहार कसा?संघाचे निरीक्षक महिन्याला शाखांचा ताळेबंद तपासतात. महिन्याच्या सहा तारखेला व्यवस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, भाग निरीक्षक, तपासणी प्रमुखांसमोर ताळेबंद वाचून दाखविला जातो. मग हा अपहार नजरेस कसा पडला नाही? शिरोळपेक्षा मोठ्या शाखा खतांची मागणी करीत असताना याच शाखेला जादा खतपुरवठा करण्यामागे नेमके गौडबंगाल काय? हे खरे प्रश्न आहेत.

अपहाराचा सिलसिला कायमगेल्या चार-पाच वर्षांत अनेक शाखांतील छोटे-मोठे अपहार लेखापरीक्षणाद्वारे उघड झाले आहेत. त्यांच्यावर आरोप सिद्ध होऊन वसुलीची प्रक्रिया सुरू असताना शिरोळ शाखेत मोठा अपहार झाला आहे.

गुरव १५ वर्षे एकाच जागेवरशाखा व्यवस्थापक अमर गुरव हे गेले १५ वर्षे एकाच शाखेत काम करत आहेत. त्यांनी संपूर्ण यंत्रणेचा अंदाज घेऊन हा ढपला पाडल्याची चर्चा सुरू आहे. प्रथमदर्शनी ३३ लाखांचा अपहार दिसत असला तरी गुरव यांच्या मागील सर्व कामकाजाची चौकशी केल्यानंतर आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिरोळ शाखेतील अपहार निदर्शनास आला असून, त्याच्या चौकशीसाठी पथक नेमले आहे. अहवाल येताच संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडणार नाही.- अमरसिंह माने,अध्यक्ष, शेतकरी संघ 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर