शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पावसाने मारली दडी, तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ३० टक्के भरलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:57 IST

मान्सून पावसाच्या हुलकावणीमुळे राज्यभर धरणांतील पाणीसाठा हा चिंतेचा विषय बनत चालला असताना, कोल्हापुरात मात्र अजूनही अतिरिक्त पाणीसाठा दिसत आहे.

कोल्हापूर : पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना, धरणांनी मात्र ती काहीअंशी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जून संपत आला असताना अजूनही जिल्ह्यातील चार मोठ्या धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अजून आठवडाभरानंतर मान्सून सक्रिय होणार असल्याचा हवामानाचा अंदाज पाहता, हे पाणी जिल्ह्याची तहान भागविण्यास पुरेसे आहे.

मान्सून पावसाच्या हुलकावणीमुळे राज्यभर धरणांतील पाणीसाठा हा चिंतेचा विषय बनत चालला असताना, कोल्हापुरात मात्र अजूनही अतिरिक्त पाणीसाठा दिसत आहे. आता अधुनमधून पावसाच्या सरी येत असल्याने पिकांची पाण्याची गरजही कमी होऊन उपसाही कमी होत आहे. तरीदेखील १५ जुलैनंतर अतिवृष्टी झाली, तर ऑगस्ट सुरू होता होताच पूरस्थिती निर्माण होऊ शकते, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन प्रशासनाने धरणातील विसर्ग कायम ठेवला आहे. राधानगरी, वारणा, तुळशी, काळम्मावाडी या चार मोठ्या धरणांतून आजच्या घडीला २१६० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

महापूर लांबणार

गेल्यावर्षी २२ जुलैलाच पूर आला होता, तत्पूर्वी २० जूनच्या दरम्यान पहिला पूर येऊन गेला होता. यावर्षी वळवाचा पाऊस देखील जास्त काळ झालेला नाही, त्यामुळे जमिनी तहानल्या आहेत. त्यामुळे आता दडी मारलेला पाऊस पुढील आठवड्यात कोसळू लागला तरी, किमान पहिले दोन-चार दिवस तरी तो शिवारातच मुरणार आहे. मग पाणी वाहण्यास सुरुवात होऊन ते नदी, नाल्याकडे धाव घेणार आहे. त्यामुळे महापूर किमान महिनाभर तरी लांबणार आहे. आता दडी मारलेल्या पावसाचा हा मोठा फायदा असणार आहे.

अतिरिक्तची धास्ती कायम

कमी दिवसात जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज पाहता, सलग आठ दिवसाच्या पावसाने देखील धरणे फुल्ल होऊ शकतात. धरणांतून विसर्ग वाढल्यानंतर महापुराचे संकट गडद होत जाते. त्यामुळे धरणे रिकामी करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. पण कोल्हापुरात अजूनही धरणांमध्ये ३० टक्के साठा आहे. २०१९ मध्ये महापूर आला, त्यावेळी हा साठा केवळ २ ते ३ टक्के इतकाच होता, तरीदेखील धरणे भरली आणि पुरात बुडवले होते. त्यामुळे अतिरिक्त साठा अजूनही धास्तावणाराच आहे.

धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • राधानगरी (२.३८) २८ टक्के
  • तुळशी (१.३७) ४० टक्के
  • वारणा (१०.२७) ३० टक्के
  • दूधगंगा (५.९१) २३ टक्के
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणी