शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पावसाने मारली दडी, तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ३० टक्के भरलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:57 IST

मान्सून पावसाच्या हुलकावणीमुळे राज्यभर धरणांतील पाणीसाठा हा चिंतेचा विषय बनत चालला असताना, कोल्हापुरात मात्र अजूनही अतिरिक्त पाणीसाठा दिसत आहे.

कोल्हापूर : पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना, धरणांनी मात्र ती काहीअंशी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जून संपत आला असताना अजूनही जिल्ह्यातील चार मोठ्या धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अजून आठवडाभरानंतर मान्सून सक्रिय होणार असल्याचा हवामानाचा अंदाज पाहता, हे पाणी जिल्ह्याची तहान भागविण्यास पुरेसे आहे.

मान्सून पावसाच्या हुलकावणीमुळे राज्यभर धरणांतील पाणीसाठा हा चिंतेचा विषय बनत चालला असताना, कोल्हापुरात मात्र अजूनही अतिरिक्त पाणीसाठा दिसत आहे. आता अधुनमधून पावसाच्या सरी येत असल्याने पिकांची पाण्याची गरजही कमी होऊन उपसाही कमी होत आहे. तरीदेखील १५ जुलैनंतर अतिवृष्टी झाली, तर ऑगस्ट सुरू होता होताच पूरस्थिती निर्माण होऊ शकते, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन प्रशासनाने धरणातील विसर्ग कायम ठेवला आहे. राधानगरी, वारणा, तुळशी, काळम्मावाडी या चार मोठ्या धरणांतून आजच्या घडीला २१६० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

महापूर लांबणार

गेल्यावर्षी २२ जुलैलाच पूर आला होता, तत्पूर्वी २० जूनच्या दरम्यान पहिला पूर येऊन गेला होता. यावर्षी वळवाचा पाऊस देखील जास्त काळ झालेला नाही, त्यामुळे जमिनी तहानल्या आहेत. त्यामुळे आता दडी मारलेला पाऊस पुढील आठवड्यात कोसळू लागला तरी, किमान पहिले दोन-चार दिवस तरी तो शिवारातच मुरणार आहे. मग पाणी वाहण्यास सुरुवात होऊन ते नदी, नाल्याकडे धाव घेणार आहे. त्यामुळे महापूर किमान महिनाभर तरी लांबणार आहे. आता दडी मारलेल्या पावसाचा हा मोठा फायदा असणार आहे.

अतिरिक्तची धास्ती कायम

कमी दिवसात जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज पाहता, सलग आठ दिवसाच्या पावसाने देखील धरणे फुल्ल होऊ शकतात. धरणांतून विसर्ग वाढल्यानंतर महापुराचे संकट गडद होत जाते. त्यामुळे धरणे रिकामी करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. पण कोल्हापुरात अजूनही धरणांमध्ये ३० टक्के साठा आहे. २०१९ मध्ये महापूर आला, त्यावेळी हा साठा केवळ २ ते ३ टक्के इतकाच होता, तरीदेखील धरणे भरली आणि पुरात बुडवले होते. त्यामुळे अतिरिक्त साठा अजूनही धास्तावणाराच आहे.

धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • राधानगरी (२.३८) २८ टक्के
  • तुळशी (१.३७) ४० टक्के
  • वारणा (१०.२७) ३० टक्के
  • दूधगंगा (५.९१) २३ टक्के
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणी