शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी शेंडा पार्कातील ३० हेक्टर जागा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 12:29 IST

मुंबई- कोल्हापूर : कोल्हापुरात आयटी पार्कच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या पार्कची उभारणी ...

मुंबई-कोल्हापूर : कोल्हापुरात आयटी पार्कच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या पार्कची उभारणी तातडीने करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटी पार्कसाठी द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.कोल्हापूर आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, वित्तचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, महसूलचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तेथे आयटी पार्क आवश्यक आहे. तेथील तरुणांना यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. त्यामुळे कृषी विद्यापीठाची जागा घेताना त्यांना पर्यायी जागा द्यावी. विशिष्ट कालमर्यादेत पार्क उभे न राहिल्यास जमीन कृषी विद्यापीठाला परत द्यावी. विद्यापीठाच्या या जागेपासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुणे नंतर कोल्हापूर शहर हे एक चांगला पर्याय आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीही जागा द्याकोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील किंवा शहरात मध्यवर्ती ठिकाणची अन्य जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देशही पवार यांनी याबाबतच्या बैठकीत दिले. या उपकेंद्रामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कामासाठी वारंवार नाशिकला जाण्याची गरज राहणार नाही. यातून वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरITमाहिती तंत्रज्ञानAjit Pawarअजित पवारHasan Mushrifहसन मुश्रीफ