शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

५७ शाळांतील २०१ खोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:06 AM

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५७ प्राथमिक शाळांमधील गळके छत आणि पडक्या भिंती ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५७ प्राथमिक शाळांमधील गळके छत आणि पडक्या भिंती असलेल्या २०१ वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्यांच्या दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीचे काम होण्यास काही कालावधी लागणार आहे. बसण्यायोग्य नसलेल्या वर्गखोल्यांमुळे शाळांना सध्या समाजमंदिरे, भाडेतत्त्वावरील इमारतींचा आधार घ्यावा लागत आहे.जिल्ह्यात एकूण १९९४ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यापैकी ९८ प्राथमिक शाळांकडून ३२७ वर्गखोल्यांच्या निर्लेखनाचे (पुनर्बांधणी/दुरुस्ती) प्रस्ताव जुलै २०१६ ते मे २०१९ अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यांपैकी ५७ शाळांतील २०१ वर्गखोल्यांच्या निर्लेखनास मान्यता दिली आहे. निर्लेखन करावयाच्या शिल्लक वर्गखोल्यांची संख्या १२६ इतकी आहे. त्यामध्ये पन्हाळा, भुदरगड आणि करवीर तालुक्यांतील वर्गखोल्यांची संख्या अधिक आहे.गडहिंग्लज तालुक्यातील एका शाळेकडून नऊ वर्गखोल्यांच्या निर्लेखनासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. बसण्यायोग्य नसलेल्या शाळा आणि वर्गखोल्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आली आहे. या वर्षी २४२ शाळांची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये छत, भिंतीची पुनर्बांधणी, वर्गखोल्यांची दुरुस्ती, आदींचा समावेश आहे. विविध शाळांमधील ११६ वर्गखोल्या बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी २२ वर्गखोल्यांचे काम पूर्ण झाले आहे. या कामाची गती वाढविणे आवश्यक आहे.वर्गखोल्यांच्या निर्लेखनाचे काम पूर्ण झाले नसल्याने पर्यायी व्यवस्थेचा शाळा आणि विद्यार्थ्यांना आधार घ्यावा लागणार आहे. विद्यार्थी सुरक्षा आणि त्यांना योग्य सुविधांद्वारे शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळा आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण होणे आवश्यक ठरणार आहे.पन्हाळा तालुक्यातील वर्गखोली पडलीगेल्या वर्षी पन्हाळा तालुक्यातील एका शाळेस पुनर्बांधणीसाठी मान्यता दिलेली वर्गखोली पडली. मात्र, त्यात कोणत्याही इयत्तेचा वर्ग भरत नव्हता. संबंधित शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची दक्षता घेऊन त्यांची अन्य ठिकाणी व्यवस्था केली होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.पर्यायी व्यवस्थेनंतरच मान्यता : निर्लेखनाबाबत शाळांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा संबंधित वर्ग भरविण्याची पर्यायी व्यवस्था या शाळांनी केल्यानंतरच त्यांना मान्यता दिली जाते. वर्ग भरविण्यासाठी भाडेतत्त्वावर इमारत घेतली असल्यास तिचे भाडेदेखील जिल्हा परिषदेकडून दिले जाते. निर्लेखनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या शाळांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो.