शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोल्हापूर जिल्ह्यातून १५ हजारजणांनी दिली महाटीईटी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 12:53 IST

तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाली परीक्षा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) शहरातील २७ परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे पार पडली. जिल्ह्यातून १४ हजार, ९३६ उमेदवारांनी ही परीक्षा दिली, तर ८४५ जण गैरहजर राहिले. तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही परीक्षा झाली. कोणताही अनुचित प्रकार परीक्षेच्या वेळी घडला नाही. दिवसभरात दोन पेपर झाले.शहरातील २७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा परिषदेकडून स्वतंत्र एजन्सी नेमली होती. परीक्षार्थीची फेस रिडींगसह बायोमेट्रिक हजेरी घेतली. प्रत्येक केंद्रावरील परीक्षा खोलीत सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली. विभागीय अधिकाऱ्यांसोबत पथकाने व्हिडीओ चित्रीकरण केले. पहिल्या पेपरला ६ हजार १०४ पैकी ५ हजार ७६० परीक्षार्थी बसले. ३४४ परीक्षार्थी गैरहजर राहिले. दुसऱ्या पेपरला ९ हजार ६७७ पैकी ९ हजार १७६ परीक्षार्थी हजर होते. ५०१ परीक्षार्थी गैरहजर होते.परीक्षेसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सकाळपासूनच विविध केंद्रांवर गर्दी झाली. परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था शोधताना अनेकांची दमछाक झाली. कक्षात प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची तपासणी झाली. केंद्राबाहेर उमेदवारांनी रांगा केल्या. सकाळी दहा वाजता पहिला पेपर सुरू झाला. परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षक भरतीसाठी पात्र ठरवले जातील. केंद्रावर सहा परीरक्षकांचे बैठे पथक नियुक्त केले होते. ७ झोनल ऑफीसर, २८ परीक्षा केंद्र संचालक, ४ उपकेंद्र संचालक, २८ सहायक परीरक्षक, एक जिल्हा परीरक्षक, ८७ पर्यवेक्षक, ४२३ समवेशक, ५८ लिपिक, ११६ सेवक अशा सुमारे ७५२ जणांनी परीक्षेचे कामकाज पाहिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

असे होते परीक्षेचे स्वरूपपहिल्या पेपरसाठी मराठी ३०, गणित ३०, परिसर अभ्यास ३०, बाल मानसशास्त्र ३०, इंग्रजी ३० अशा १५० गुणांची प्रश्नपत्रिका होती. दुसऱ्या पेपरला मराठी ३०, गणित ३०, बालमानसशास्त्र ३०. इंग्रजी ३० विज्ञान ३०, समाजशास्त्र ३० असे १५० गुणांचे प्रश्न होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाTeacherशिक्षक