शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

‘एफआरपी’पेक्षा १४५ कोटी अधिक : कोल्हापूर विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:18 IST

कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे संपूर्ण रक्कम देत १४५ कोटी ४२ लाख रुपये अधिक वाटप केले आहेत.

ठळक मुद्देराज्यात ९८ कोटींची थकीत एफआरपी गत ; हंगामातील चित्रगेल्या हंगामातील थकीत ‘एफआरपी’चा प्रश्न सध्या राज्यासह संपूर्ण देशात चर्चेत आला आहे

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे संपूर्ण रक्कम देत १४५ कोटी ४२ लाख रुपये अधिक वाटप केले आहेत. राज्याची ९८ कोटी थकीत एफआरपी असताना विभागातील ‘माणगंगा’, ‘केन अ‍ॅग्रो’ वगळता सर्व कारखान्यांनी ‘एफआरपी’ सोडून अधिक पैसे दिले आहेत.

गेल्या हंगामातील थकीत ‘एफआरपी’चा प्रश्न सध्या राज्यासह संपूर्ण देशात चर्चेत आला आहे. महाराष्टÑात ९८ कोटी, तर उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ११०० कोटी ‘एफआरपी’ थकीत आहे; त्यामुळे या हंगामातील उचलीबरोबरच गत हंगामातील थकीत ‘एफआरपी’चा मुद्दा प्रकर्षाने पुढे येत आहे. गेल्या हंगामात शेतकरी संघटनांबरोबर झालेल्या तडजोडीत ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपयांवर तडजोड झाली.

हंगामाच्या सुरुवातीला घाऊक बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल असल्याने कारखानदारही तडजोडीला राजी झाले; पण त्यानंतर साखरेच्या दरात घसरण सुरू झाली ती २१०० रुपयांपर्यंत आली.काही कारखान्यांनी पहिल्या महिन्याचे तडजोडीच्या फार्म्युल्याप्रमाणे पैसे दिले; पण बॅँकांकडून उचल कमी झाल्याने दोन टप्पे केले. राज्य व केंद्र सरकारने मदत केली; पण ‘एफआरपी’ देताना साखर कारखान्यांची दमछाक उडाली. हंगाम संपला तरी राज्यातील बहुतांशी कारखान्यांनँ ‘एफआरपी’प्रमाणे पैसे देता आले नाहीत; पण ‘एफआरपी’ देण्यात कोल्हापूर विभाग फारच पुढे राहिला.

कोल्हापूर विभाग वगळता उर्वरित महाराष्टतील कारखान्यांकडे ९८ कोटींची थकीत एफआरपी आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांना गेल्या हंगामात पाच हजार ७८५ कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये देय ‘एफआरपी’ होती. प्रत्यक्षात कारखान्यांनी पाच हजार ९३० कोटी ९४ लाख ३५ हजार रुपये दिलेले आहेत. ‘माणगंगा’ची सात कोटी ५८ लाख, तर केन अ‍ॅग्रो (डोंगराई) ची ९५ लाख एफआरपी अद्याप थकीत आहे.‘आजरा’, ‘शिंदे’ आघाडीवर!आजरा कारखान्यांची २४४०, तर मोहनराव शिंदेंची २४४१ रुपये एफआरपी होती. त्यांनी दराच्या स्पर्धेमुळे अनुक्रमे ३००० व ३००६ रुपये शेतकऱ्यांना पैसे दिले; त्यामुळे एफआरपी आणि प्रत्यक्ष दिलेला दर यामध्ये अनुक्रमे ५६० व २६५ रुपये, तर ‘बिद्री’ने सर्वाधिक ३१०० रुपये दर दिला आहे, त्यांची २८६८ रुपये एफआरपी होती.

‘वसंतदादा’, ‘दौलत’कडे ‘एफआरपी’ थकीत‘दौलत’ कारखान्यांकडे २०११-१२ मधील १८ कोटी ११ लाख २३ हजार, तर २०१६-१७ मधील १ कोटी ८५ लाख ६४ हजार, असे १९ कोटी ९६ लाख ९७ हजार रुपये थकीत आहेत. ‘वसंतदादा’ कारखान्यांकडे २०१३-१४ मधील ८ कोटी ९ लाख ८४ हजार व ‘यशवंत’२०१५-१६ मधील ३ कोटी ८२ लाख, तर २०१६-१७ मधील ७ लाख ४ हजार असे ३ कोटी ८९ लाख रुपये थकीत आहेत.कारखानानिहाय ‘एफआरपी’ व दिलेला दरकारखान्याचे नाव एफआरपी दर रुपयेआजरा २४४० ३०००भोगावती २७०४ २९१२राजाराम २६९२ २९००शाहू २८२० ३०३२दत्त-शिरोळ २८१६ २९२५बिद्री २८६८ ३१००नलवडे, गडहिंग्लज २५७८ ३०००जवाहर २८३२ ३०७५मंडलिक, हमीदवाडा २७०१ ३०५०कुंभी, कुडित्रे २८९२ ३०००पंचगंगा, इचलकरंजी २७५८ ३०००शरद, नरंदे २७९० २९२५वारणा २६८६ २९००गायकवाड, सोनवडे २६०५ २९००डॉ. डी. वाय. पाटील २७१८ २९००दालमिया २७९२ २९००गुरूदत्त, टाकळीवाडी २९५१ ३०५४हेमरस २६११ ३०००महाडिक शुगर्स २४२९ २९००संताजी घोरपडे २५९८ ३०००अथणी (इंदिरा-तांबाळे) २२२९ २९००सांगली जिल्हाकिसनवीर आहिरे ३०३० ३०३२महाकाली २३२० २९००राजारामबापू, साखराळे २८९२ ३००६राजारामबापू, वाटेगाव २८७३ ३००६सोनहिरा २८०५ २९०५वसंतदादा १९९५ २९०१विश्वासराव नाईक २७६९ २९००क्रांती २७७२ २९०५मोहनराव शिंदे २४४१ ३००६

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा