शहरं
Join us  
Trending Stories
1
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
2
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
3
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
4
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
6
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
7
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
8
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
9
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
10
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
11
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
12
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
13
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
14
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
15
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
16
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
17
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
18
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
19
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
20
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...

Kolhapur: पुणे-बंगळुरू महामार्गावर १२३ अपघात, ३७ बळी; रूंदीकरणाच्या कामामुळे प्रवास धोकादायक

By उद्धव गोडसे | Updated: May 27, 2025 19:29 IST

बेफिकिरी जिवावर बेतते

उद्धव गोडसे

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. मागील १२० दिवसांत (चार महिने) कागल ते पेठ नाक्यादरम्यान १२३ अपघात झाले. यात ३७ जणांनी जीव गमावला, तर ३९ जण गंभीर जखमी झाले. टोप ते अंबप फाट्यादरम्यान तीन दिवसांत दोन मोठे अपघात झाले. पावसाळ्यात अपघातांचा धोका आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शासकीय यंत्रणांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.संपूर्ण देश दक्षिणोत्तर जोडणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच याच्या रूंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, रखडलेली कामे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान १०३ अपघातांची नोंद झाली होती.यंदा पहिल्या ४ महिन्यांत १२३ अपघात झाले. यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ३९ जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले. अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, पावसाळ्याच्या तोंडावर हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

रखडलेल्या कामांमुळे धोका वाढलामहामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान उड्डाणपूल आणि मोऱ्यांचे काम अजून सुरूच आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे कामही रखडले आहे. सर्व्हिस रोड उपलब्ध नाहीत. सूचना फलक लावले जात नाहीत. महामार्गावर स्थानिक वाहनांची वर्दळ असते. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

पोलिसांनी दिल्या सूचनापावसाळ्यात अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाला खबरदारीच्या उपाययोजनांचे पत्र पाठवले आहे. त्यात सखल भागात पाणी साचू नये, काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी, धोकादायक झाडे हटवावीत, पुराचे पाणी येणाऱ्या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवावी, सूचना फलक लावावेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

बेफिकिरी जिवावर बेततेअपघात होण्यास महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम कारणीभूत आहेच, पण वाहनचालकांची बेफिकिरीही तितकीच कारणीभूत ठरते. बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. कार आणि मालवाहतूक करणारी वाहने लेनमधून बाहेर पडताना इंडिकेटरचा वापर करत नाहीत. यामुळे अपघात वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जानेवारी ते एप्रिल २०२५ मधील अपघात (कागल ते पेठ नाका)

  • एकूण अपघात : १२३
  • प्राणांतिक अपघात : ३७
  • गंभीर अपघात : ३९
  • किरकोळ अपघात : १४
  • बिगर दुखापत : ३३

पुणे-बंगळुरू महामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे पत्र महामार्ग प्राधिकरणाला पाठवले आहे. लवकरच यातील कामांना सुरुवात होईल. - सत्यराज घुले, पोलिस निरीक्षक, महामार्ग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातhighwayमहामार्ग