शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

Kolhapur: पुणे-बंगळुरू महामार्गावर १२३ अपघात, ३७ बळी; रूंदीकरणाच्या कामामुळे प्रवास धोकादायक

By उद्धव गोडसे | Updated: May 27, 2025 19:29 IST

बेफिकिरी जिवावर बेतते

उद्धव गोडसे

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. मागील १२० दिवसांत (चार महिने) कागल ते पेठ नाक्यादरम्यान १२३ अपघात झाले. यात ३७ जणांनी जीव गमावला, तर ३९ जण गंभीर जखमी झाले. टोप ते अंबप फाट्यादरम्यान तीन दिवसांत दोन मोठे अपघात झाले. पावसाळ्यात अपघातांचा धोका आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शासकीय यंत्रणांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.संपूर्ण देश दक्षिणोत्तर जोडणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच याच्या रूंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, रखडलेली कामे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान १०३ अपघातांची नोंद झाली होती.यंदा पहिल्या ४ महिन्यांत १२३ अपघात झाले. यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ३९ जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले. अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, पावसाळ्याच्या तोंडावर हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

रखडलेल्या कामांमुळे धोका वाढलामहामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान उड्डाणपूल आणि मोऱ्यांचे काम अजून सुरूच आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे कामही रखडले आहे. सर्व्हिस रोड उपलब्ध नाहीत. सूचना फलक लावले जात नाहीत. महामार्गावर स्थानिक वाहनांची वर्दळ असते. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

पोलिसांनी दिल्या सूचनापावसाळ्यात अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाला खबरदारीच्या उपाययोजनांचे पत्र पाठवले आहे. त्यात सखल भागात पाणी साचू नये, काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी, धोकादायक झाडे हटवावीत, पुराचे पाणी येणाऱ्या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवावी, सूचना फलक लावावेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

बेफिकिरी जिवावर बेततेअपघात होण्यास महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम कारणीभूत आहेच, पण वाहनचालकांची बेफिकिरीही तितकीच कारणीभूत ठरते. बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. कार आणि मालवाहतूक करणारी वाहने लेनमधून बाहेर पडताना इंडिकेटरचा वापर करत नाहीत. यामुळे अपघात वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जानेवारी ते एप्रिल २०२५ मधील अपघात (कागल ते पेठ नाका)

  • एकूण अपघात : १२३
  • प्राणांतिक अपघात : ३७
  • गंभीर अपघात : ३९
  • किरकोळ अपघात : १४
  • बिगर दुखापत : ३३

पुणे-बंगळुरू महामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे पत्र महामार्ग प्राधिकरणाला पाठवले आहे. लवकरच यातील कामांना सुरुवात होईल. - सत्यराज घुले, पोलिस निरीक्षक, महामार्ग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातhighwayमहामार्ग