शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
3
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
4
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
5
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
6
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
7
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
8
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
9
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
10
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
11
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
12
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
13
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
14
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
15
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
16
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
17
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
18
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
19
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
20
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पुणे-बंगळुरू महामार्गावर १२३ अपघात, ३७ बळी; रूंदीकरणाच्या कामामुळे प्रवास धोकादायक

By उद्धव गोडसे | Updated: May 27, 2025 19:29 IST

बेफिकिरी जिवावर बेतते

उद्धव गोडसे

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. मागील १२० दिवसांत (चार महिने) कागल ते पेठ नाक्यादरम्यान १२३ अपघात झाले. यात ३७ जणांनी जीव गमावला, तर ३९ जण गंभीर जखमी झाले. टोप ते अंबप फाट्यादरम्यान तीन दिवसांत दोन मोठे अपघात झाले. पावसाळ्यात अपघातांचा धोका आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शासकीय यंत्रणांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.संपूर्ण देश दक्षिणोत्तर जोडणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच याच्या रूंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, रखडलेली कामे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान १०३ अपघातांची नोंद झाली होती.यंदा पहिल्या ४ महिन्यांत १२३ अपघात झाले. यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ३९ जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले. अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, पावसाळ्याच्या तोंडावर हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

रखडलेल्या कामांमुळे धोका वाढलामहामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान उड्डाणपूल आणि मोऱ्यांचे काम अजून सुरूच आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे कामही रखडले आहे. सर्व्हिस रोड उपलब्ध नाहीत. सूचना फलक लावले जात नाहीत. महामार्गावर स्थानिक वाहनांची वर्दळ असते. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

पोलिसांनी दिल्या सूचनापावसाळ्यात अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाला खबरदारीच्या उपाययोजनांचे पत्र पाठवले आहे. त्यात सखल भागात पाणी साचू नये, काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी, धोकादायक झाडे हटवावीत, पुराचे पाणी येणाऱ्या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवावी, सूचना फलक लावावेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

बेफिकिरी जिवावर बेततेअपघात होण्यास महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम कारणीभूत आहेच, पण वाहनचालकांची बेफिकिरीही तितकीच कारणीभूत ठरते. बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. कार आणि मालवाहतूक करणारी वाहने लेनमधून बाहेर पडताना इंडिकेटरचा वापर करत नाहीत. यामुळे अपघात वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जानेवारी ते एप्रिल २०२५ मधील अपघात (कागल ते पेठ नाका)

  • एकूण अपघात : १२३
  • प्राणांतिक अपघात : ३७
  • गंभीर अपघात : ३९
  • किरकोळ अपघात : १४
  • बिगर दुखापत : ३३

पुणे-बंगळुरू महामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे पत्र महामार्ग प्राधिकरणाला पाठवले आहे. लवकरच यातील कामांना सुरुवात होईल. - सत्यराज घुले, पोलिस निरीक्षक, महामार्ग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातhighwayमहामार्ग