शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

दुर्गम डोंगर रांगांत टॉवर उभारणीसाठी चक्क हेलिकॉप्टरचा वापर, मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाची प्रयत्नांची पराकाष्ठा 

By मुरलीधर भवार | Updated: June 1, 2023 14:52 IST

महाराष्ट्रात अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा वापर करून प्रकल्प उभारणी करण्याची ही पहिलीच घटना असावी.

कल्याण - महाराष्ट्र राज्याच्या विजेचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे जे आवश्यक ते सारे करण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे. म्हणूनच दुर्गम डोंगर रांगांच्यात उच्च वीज दाबाच्या वाहिन्या आणि टॉवर उभारणीसाठी कंपनी हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा वापर करून प्रकल्प उभारणी करण्याची ही पहिलीच घटना असावी. प्रकल्पासाठी अंबरनाथ तालुका ते पनवेल तालुका यांच्या दरम्यान असणाऱ्या डोंगर रांगांच्यात उच्च वीज दाब वाहून नेणाऱ्या वाहिन्या आणि टॉवर उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. साधारण पणे १४ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या या दुर्गम डोंगर रांगांच्यातून जाणार आहेत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत टॉवर उभारणीचे काम करावे लागते.कितीही खडतर परिस्थिती असली तरीही प्रकल्प वेळेत पूर्ण झालाच पाहिजे या विजिगिषु वृत्तीने कंपनी अत्याधुनिक विकसन प्रणालीचा अवलंब करत आहे. 

या प्रकल्पाचे राष्ट्रीय महत्व ध्यानात घेता तो वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.म्हणूनच या साऱ्या पार्श्वभूमीवर स्टरलाईट पॉवर अंतर्गत मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प डोंगर प्रदेशातील कन्स्ट्रक्शन साईट वर अवजड साहित्य पोहोचविण्याच्या दृष्टीने हेलिकॉप्टर चा वापर करत आहे. हे हेलिकॉप्टर दिवसात साधारण पणे बेस वरून ५० ते ६० फेऱ्या मारत टॉवर उभारणीचे साहित्य प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन साईट वर पोहोचवत आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंग वाडी येथील हेलिबेस चे ऍव्हेशन हेड राहुल उनियाल यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांनी सांगितले कि या प्रकल्पाचे साठी वापरण्यात येणारे हेलिकॉप्टर हे उत्कृष्ट दर्जाचे असून ते चालविणाऱ्या पायलट्स कडे हजारो तासांचा हेलिकॉप्टर उडविण्याचा अनुभव आहे.आमच्या पायलट्सनी यापूर्वी भारतीय सेनेसाठी सुद्धा आपली सेवा दिलेली आहे. अगदी माउंट एव्हरेस्ट च्या सर्वोच्च बिंदूपर्यंत उडण्याची या हेलिकॉप्टर ची क्षमता आहे. 

ते पुढे म्हणाले कि,हेलिकॉप्टर च्या खाली मजबूत साखळीला हुक बांधून त्याच्या सहाय्यतेने टॉवर उभारणीसाठी लागणारे साहित्य दुर्गम ठिकाणी पोहोचविले जाते. आत्ताचे तापमान आणि भौगोलिक परिस्थिती पाहता ८०० ते ८५० किलोग्रॅम वजनाचे साहित्य एका वेळेस उचलून डोंगरातील साईट वर पोहोचविले जाते. उड्डाण करताना सुरक्षेच्या साऱ्या नियम आणि निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. या प्रक्रियेत सहभागी हर एक कर्णाचऱ्याला रोज संचलन आयोजित करून सुरक्षा राखण्याचे खडतर प्रशिक्षण दिले जाते.उड्डाण क्षेत्रातील निष्णात अधीकारी या साऱ्या प्रक्रियेची हाताळणी करत असतात. वाहून न्यावयाचे साहित्य मजबूत साखळ्या,लोखंडी पट्ट्या यांनी बंदिस्त केले जाते जेणेकरून प्रत्यक्ष उड्डाण वाहतुकीच्या दरम्यान कुठलीही क्षती होऊ नये.प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे ध्येय्य डोळ्यापुढे ठेऊन आम्ही सारे काम करत आहोत तसेच हेलिकॉप्टर चा वापर करत प्रकल्प उभारणी केल्याने पर्यावरण रक्षण देखील होत आहे. दुर्गम ठिकाणी टॉवर उभारताना इतर वेळी रास्ता बनवून साहित्य पोहोचवावे लागते,त्यात झाडांची कत्तल होते. वन्यजीवांच्या नैसर्गिक निवाऱ्यांना नुकसान पोहोचते. कित्येक वेळेस वन्य जीव प्राणास मुकतात. हेलिकॉप्टर च्या वापराने वन्य संपदा अबाधित राहाते.अतिरिक्त मनुष्य बाळाचा वापर टळतो,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेळेची बचत होते. मुंबई ऊर्जा मार्ग हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी कंपनी कटिबद्ध असून वाटेत येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करत प्रकल्प पूर्तीचे ध्येय्य साधण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण