शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दुर्गम डोंगर रांगांत टॉवर उभारणीसाठी चक्क हेलिकॉप्टरचा वापर, मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाची प्रयत्नांची पराकाष्ठा 

By मुरलीधर भवार | Updated: June 1, 2023 14:52 IST

महाराष्ट्रात अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा वापर करून प्रकल्प उभारणी करण्याची ही पहिलीच घटना असावी.

कल्याण - महाराष्ट्र राज्याच्या विजेचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे जे आवश्यक ते सारे करण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे. म्हणूनच दुर्गम डोंगर रांगांच्यात उच्च वीज दाबाच्या वाहिन्या आणि टॉवर उभारणीसाठी कंपनी हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा वापर करून प्रकल्प उभारणी करण्याची ही पहिलीच घटना असावी. प्रकल्पासाठी अंबरनाथ तालुका ते पनवेल तालुका यांच्या दरम्यान असणाऱ्या डोंगर रांगांच्यात उच्च वीज दाब वाहून नेणाऱ्या वाहिन्या आणि टॉवर उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. साधारण पणे १४ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या या दुर्गम डोंगर रांगांच्यातून जाणार आहेत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत टॉवर उभारणीचे काम करावे लागते.कितीही खडतर परिस्थिती असली तरीही प्रकल्प वेळेत पूर्ण झालाच पाहिजे या विजिगिषु वृत्तीने कंपनी अत्याधुनिक विकसन प्रणालीचा अवलंब करत आहे. 

या प्रकल्पाचे राष्ट्रीय महत्व ध्यानात घेता तो वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.म्हणूनच या साऱ्या पार्श्वभूमीवर स्टरलाईट पॉवर अंतर्गत मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प डोंगर प्रदेशातील कन्स्ट्रक्शन साईट वर अवजड साहित्य पोहोचविण्याच्या दृष्टीने हेलिकॉप्टर चा वापर करत आहे. हे हेलिकॉप्टर दिवसात साधारण पणे बेस वरून ५० ते ६० फेऱ्या मारत टॉवर उभारणीचे साहित्य प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन साईट वर पोहोचवत आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंग वाडी येथील हेलिबेस चे ऍव्हेशन हेड राहुल उनियाल यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांनी सांगितले कि या प्रकल्पाचे साठी वापरण्यात येणारे हेलिकॉप्टर हे उत्कृष्ट दर्जाचे असून ते चालविणाऱ्या पायलट्स कडे हजारो तासांचा हेलिकॉप्टर उडविण्याचा अनुभव आहे.आमच्या पायलट्सनी यापूर्वी भारतीय सेनेसाठी सुद्धा आपली सेवा दिलेली आहे. अगदी माउंट एव्हरेस्ट च्या सर्वोच्च बिंदूपर्यंत उडण्याची या हेलिकॉप्टर ची क्षमता आहे. 

ते पुढे म्हणाले कि,हेलिकॉप्टर च्या खाली मजबूत साखळीला हुक बांधून त्याच्या सहाय्यतेने टॉवर उभारणीसाठी लागणारे साहित्य दुर्गम ठिकाणी पोहोचविले जाते. आत्ताचे तापमान आणि भौगोलिक परिस्थिती पाहता ८०० ते ८५० किलोग्रॅम वजनाचे साहित्य एका वेळेस उचलून डोंगरातील साईट वर पोहोचविले जाते. उड्डाण करताना सुरक्षेच्या साऱ्या नियम आणि निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. या प्रक्रियेत सहभागी हर एक कर्णाचऱ्याला रोज संचलन आयोजित करून सुरक्षा राखण्याचे खडतर प्रशिक्षण दिले जाते.उड्डाण क्षेत्रातील निष्णात अधीकारी या साऱ्या प्रक्रियेची हाताळणी करत असतात. वाहून न्यावयाचे साहित्य मजबूत साखळ्या,लोखंडी पट्ट्या यांनी बंदिस्त केले जाते जेणेकरून प्रत्यक्ष उड्डाण वाहतुकीच्या दरम्यान कुठलीही क्षती होऊ नये.प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे ध्येय्य डोळ्यापुढे ठेऊन आम्ही सारे काम करत आहोत तसेच हेलिकॉप्टर चा वापर करत प्रकल्प उभारणी केल्याने पर्यावरण रक्षण देखील होत आहे. दुर्गम ठिकाणी टॉवर उभारताना इतर वेळी रास्ता बनवून साहित्य पोहोचवावे लागते,त्यात झाडांची कत्तल होते. वन्यजीवांच्या नैसर्गिक निवाऱ्यांना नुकसान पोहोचते. कित्येक वेळेस वन्य जीव प्राणास मुकतात. हेलिकॉप्टर च्या वापराने वन्य संपदा अबाधित राहाते.अतिरिक्त मनुष्य बाळाचा वापर टळतो,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेळेची बचत होते. मुंबई ऊर्जा मार्ग हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी कंपनी कटिबद्ध असून वाटेत येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करत प्रकल्प पूर्तीचे ध्येय्य साधण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण