शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

एनआरसी वसाहतीच्या पाडकामास विरोध, २५ कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 4:49 PM

kalyan : पोलिसांनी कंपनीच्या २५ कामगारांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या दंडकूशाहीचा कामगारांनी निषेध व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देएनआरसी कंपनी गेल्या १३ वर्षापासून बंद आहे. बंद असलेल्या साडे चार हजार कामगारांची देणी अद्याप दिलेली नाही.

एनआरसी वसाहतीच्या  पाडकामास विरोध, २५ कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कल्याण : आंबिवली मोहने नजीक असलेल्या एनआरसी कंपनीच्या कामगारांच्या थकीत देण्याचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना अदानी ग्रुपतर्फे कंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरे पाडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्याला कामगारांनी विरोध केला असता कामगारांना हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी कंपनीच्या २५ कामगारांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या दंडकूशाहीचा कामगारांनी निषेध व्यक्त केला आहे.

एनआरसी कंपनी गेल्या १३ वर्षापासून बंद आहे. बंद असलेल्या साडे चार हजार कामगारांची देणी अद्याप दिलेली नाही. १३०० कोटी रुपयांची थकीत देण्याचा दावा न्यायप्रविष्ट आहे. केंद्रीय नॅशल ट्रब्युनल कंपनी लॉ दिल्ली लवादाकडे कामगार संघटनांनी दावा केला आहे. हा दावा न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणीची तारीख उद्या २१ जानेवारी रोजी आहे. दरम्यान, कंपनीची जागा अदानी ग्रुपने घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा ठोस पुरावा कंपनी व्यवस्थापनाकडून कामगार संघटनांना सादर केलेला नाही. अदानी ग्रुपने कंपनी कामगारांना प्रत्येकी ११ हजार रुपये विना अटी शर्तीवर देण्याची जाहिरात दिली होती. ही रक्कम घेण्यास कामगारांनी नकार दिला आहे. 

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसापासून कंपनीच्या वसाहतीतील जुने बंगले तोडण्याचे काम अदानी ग्रुपकडून सुरु आहे. त्यावर कंपनी व्यवस्थापनानेकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. या तोडकामाला कामगारांनी वारंवार विरोध केला आहे. न्यायालयाचा आदेश नसताना तसेच देणी देण्याचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना आज बुलडोझर घेऊन कंपनी कामगार वसाहतीतील घरे पाडण्याचे काम सुरु होता. त्याला कामगारांनी तीव्र विरोध केला. हा विरोध पोलिसांनी मोडीत काढत असताना कामगारांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

विरोध करणाऱ्या महिला पुरुष अशा २५ कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या २५ कामगारांना खडकपाडा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये कामगार रामदास वळसे पाटील,भीमराव डोळस, अजरून पाटील, सिताराम शेट्टी, फरीदा पठाण, प्राजक्ता कुळधरण, आशा पाटील, अरविंद पाटील, मारुती दिघोडकर, चंदू पाटील, राजेश पाटील, प्रमोद बळीद, सुरेश पाटील, सोपान यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारण नसताना केलेल्या अटकेचा कामगारांनी विरोध केला आहे. पोलिस कंपनी व्यवस्थापनाला साथ देत आहे. कामगारांची देणी देण्याचा विषय न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचे उल्लंघन करण्यात अदानी ग्रुपला पोलिसांची साथ असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण