शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh: प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रिक्षाचालक सरसावले; शिवसैनिक मात्र चांगलेच संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 13:43 IST

शिवसैनिकांकडून रिक्षाचालकांना अर्वाच्य भाषेचा प्रयोग करत रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

कल्याण डोंबिवलीमध्ये लखीमपूर खेरी(Lakhimpur Kheri Incident) घटनेचा निषेध महाविकास आघाडीकरून करण्यात आला. एकीकडे  या बंद मध्ये  डोंबिवलीत शिवसेना दुपारपर्यंत फारशी  सक्रिय पाहायला मिळाली नाही. मात्र कल्याणात शिवसैनिक रसत्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आवाहन करूनही रिक्षा बंद न केल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते.एकंदरीत कल्याण डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. 

राष्ट्रवादी,  काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून आजच्या बंदमध्ये आपण संपूर्ण ताकदीनिशी उतरणार अस स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही आज सकाळी शहरातील रिक्षा सुरूच असल्याचे दिसताच शिवसैनिक संतप्त झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर उतरत उपशहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करण्यात आली. शिवसैनिकांकडून  रिक्षाचालकांना अर्वाच्य भाषेचा प्रयोग करत रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांची समजूत काढत बाजूला केले.  मात्र, कल्याण डोंबिवलीत  कोरोनां काळात निर्माण झालेले आर्थिक संकट आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी  सकाळपासूनच रिक्षाचालक  नेहमीप्रमाणे बाहेर पडले होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra BandhMaharashtra Bandh