शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Maharashtra Bandh: KDMC चे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न; शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वादंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 1:38 PM

संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील आणि सचिन बासरे यांनी आज महापालिका मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र बंद असल्याने कामगारांनी कामकाज बंद ठेवा असे आवाहन केले.

 कल्याण- शिवसेना प्रणित म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आज महाराष्ट्र बंदच्या पाश्र्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बाजारपेठ पोलिसांनी मुख्यालयात धाव घेतली. पोलिस आणि कामगार संघटनेच्या पदाधिका:यांमध्ये वादंग झाला.

संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील आणि सचिन बासरे यांनी आज महापालिका मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र बंद असल्याने कामगारांनी कामकाज बंद ठेवा असे आवाहन केले. यावेळी कामगारांना कार्यालया बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब कळताच मुख्यालयात बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पाटील आणि बासरे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस आणि त्यांच्यात वादंग झाला. बंदला महाविकास राज्य सरकारचा आघाडीचा पाठिंबा आहे. बंदचे आवाहन करीत असताना कोणीही त्याला विरोध केलेला नसता त्याठिकाणी पोलिस येऊन त्यांनी बंदच्या कामकाजात हस्तक्षेप केला असल्याचा आरोप पाटील आणि बासरे यांनी केला आहे.

दरम्यान आज दुपारी 12 वाजता शिवाजी चौकातील शिवसेना शाखेत शिवसैनिक जमले होते. त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन दुकानदारांना केले. लखीमपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच रस्त्यावर चालणा:या रिक्षा चालकांना थांबवून रिक्षा बंद करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संदीप देसाई, उमेश बोरगांवकर आदींनी शिवाजी चौकात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली ब्रीज दत्त, शकील खान, कांचन कुलकर्णी दुचाकीवरुन पक्षाचे झेंडे हाती घेत शिवाजी चौक, स्टेशन परिसर, खडकपाडा, चिकनघर, सहजानंद चौकातील दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांची जीप पक्षाच्या कार्यकत्र्याचा पाठलाग करीत होती. मात्र कार्यकर्ते कुठेही न थांबता दुकानदारांना दुकाने बंदचे आवाहन करीत होते. काँग्रेच्या काही कार्यकतेा आणि पदाधिका:यांनी शिवाजी चौकात निदर्शने करुन केंद्र सरकारचा निषेध केला.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५५ बसेस दररोज रस्त्यावर धावतात. मात्र आज महाराष्ट्र बंद असल्याने रस्त्यावर प्रवासी कमी आहेत. त्यामुळे केडीएमटीने आजच्या दिवशी ३३ बसेस रस्त्यावर काढल्या हा्ेत्या. त्यामुळे केडीएमटीला आर्थिक फटका बसणार असल्याची माहिती परिवहनचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप भोसले यांनी सांगितले.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाMaharashtra BandhMaharashtra Bandh