शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

‘मी आणि माझे कुटुंब’ इतक्यापुरतेच सरकार मर्यादित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 5:16 AM

प्रकाश आंबेडकर : राज्य सरकारवर केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मी आणि माझे कुटुंब इतक्यापुरतेच राज्य सरकार मर्यादित आहे. मी आणि माझे कुटुंब सुरक्षित, बाकीच्यांच्या सुरक्षिततेशी सरकारला देणे-घेणे नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर  केली आहे.

आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांचे थकीत देणी मिळावीत, या मागणीसाठी २० दिवसांपासून कंपनी प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आंबेडकर यांनी गुरुवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकांचे प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. केवळ एकमेकांची उणीदुणी काढली जात आहे. तू माझे काही काढू नको, मी तुझे काही काढणार नाही, अशी भूमिका तेथे घेतली जात आहे. त्यामागचे गौडबंगाल काय आहे, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. देशात महागाई वाढत आहे. ही महागाई कमी न होता वाढतच जाणार आहे. राज्य सरकारने मूग, तांदूळ, कडधान्ये यांचा सरकारी साठा करून ठेवला असता, तर भाववाढीवर नियंत्रण मिळवता आले असते. साठा केलेले धान्य स्वस्त दराने देता आले असते. मात्र, सरकारने त्या प्रकारचे नियोजन केलेले नाही. सरकारने लॉकडाऊन केले पाहिजे. मात्र, नागरिकांच्या खाण्याची सोय आणि खर्चाला लागणाऱ्या पैशांची सोय करावी. त्यानंतर, खुशाल कितीही दिवस लॉकडाऊन करावे, याकडे आंबेडकर यांनी लक्ष वेधले आहे.समाजवादी आणि शिवसेना ही वेगवेगळी दिसत आहे. हा फरक राहणार आहे. शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडल्याचा दावा केला होता. त्यामुळे जेव्हा बाबरी मशिदीचा प्रश्न चर्चेला येईल, तेव्हा समाजवादी आणि शिवसेनेत वेगळेपण दिसून येईल, असे आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर