शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

भय इथले संपत नाही; कल्याण पुर्वेतील कचोरे टेकडीवर राहणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 2:12 PM

संरक्षक जाळीची मागणी करूनही  प्रशासनांच दुर्लक्ष,  लोकप्रतिनिधीचा आरोप 

केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एनडीआरएफच्या टिमसोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती व नेतीवली क कचोरे टेकडीची पाहणी  केली.  पाहणी झाली मात्र आता पुढे काय? असा सवाल निर्माण झाला आहे. कारण कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीवर आजही नागरिक भीतीच्या  छायेखाली रहात आहे. या परिसरात एका ठिकाणी दगड पडू नये म्हणून संरक्षक जाळीसाठी पोल उभे करण्यात आलेय. मात्र या  ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाळी  दिसून येत नाही. गेल्या अनेक  वर्षांपासून संरक्षक जाळी बसवण्याबाबत आम्ही पाठपुरावा करतोय पण याकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप स्थानिक  नगरसेविका रेखा चौधरी यांनी केला आहे.

डोंगराच्या अगदी तोंडाशी काही घर आहेत. अनेकदा लहान मोठे दगड या ठिकाणी पडतात. मात्र जीव मुठीत घेऊन  आम्ही रहातो अस येथील नागरिक सांगतात.अनेकदा या ठिकाणी दुर्घटना देखील घडल्यात. आम्हाला फक्त सुरक्षा पाहिजे असं येथील नागरिक सांगतात. मात्र  घराच्या तोंडाशी असलेला  हा उंच  डोंगर पाहून तुमच्या मनात सुद्धा धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. 

 मागच्या वर्षी या घरावर  दरड कोसळून संपूर्ण घराचा चक्काचूर झाला होता.अतिवृष्टी झाली तर पुन्हा या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत आम्ही संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना विचारल असता त्यांनी सांगितलं की नुकताच एनडीआरएफच्या  टीम सोबत केडीएमसी आयुक्तांनी या टेकडीची पाहणी केलीय. येथील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली असून त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्यात.

अतिवृष्टीच्या काळात केडीएमसीनं या लोकांची पर्यायी व्यवस्था केलीये मात्र लोक येथून हालायला मागत नाही, अस त्यांनी सांगितलं. तसेच  या ठिकणी उपाय योजना करण्याबाबत विचार सुरू असल्याच अभियंता सुभाष पाटील यांनी सांगितलं.  आता प्रशासन , कचोरे येथील रहिवासी आणि स्थानिक प्रतिनिधी यांनी एकत्र येत यावर योग्य तो तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे