शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
2
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
3
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
4
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
5
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
6
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
7
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
8
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
9
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
10
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
11
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
12
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
13
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
14
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
15
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
16
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
17
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
18
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
19
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
20
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण ग्रोथ सेंटर रद्द करण्याची मागणी; मेट्रो कारशेडप्रमाणे हाही प्रकल्प होणार रद्द? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 01:07 IST

संघर्ष समिती घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांपैकी १८ गावे महापालिकेतून वगळण्याची प्रक्रिया सरकारदरबारी सुरू आहे. मात्र, २०१५ मध्ये २७ गावांपैकी १० गावांच्या हद्दीतील एक हजार ८९ हेक्टर जमिनीवर कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हे ग्रोथ सेंटर शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. या भेटीतून तोडगा निघाला नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समितीने दिली.

मेट्रो कारशेड आरेच्या जमिनीवर उभे करण्याचा मागील सरकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलला आहे. आता ग्रोथ सेंटरचा निर्णयही बदलणार का, असा सवाल केला जात आहे. समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे व सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. पाटील म्हणाले की, ‘कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा २०१५ मध्ये करण्यात आली. एक हजार ८९ हेक्टर जागेवरील ग्रोथ सेंटरकरिता एक हजार ८९ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. दहा गावांत हे ग्रोथ सेंटर विकसित केले जाणार आहे. प्रत्यक्षात २०१५ साली २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाली. आजची स्थिती वेगळी आहे. २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया राज्य सरकारद्वारे सुरू आहे. ग्रोथ सेंटरच्या १० गावांपैकी काही गावे महापलिकेत तर काही गावे नव्या उपनगर परिषदेत समाविष्ट केली आहेत. या १० गावांत नव्या बांधकामांना एमएमआरडीएकडून बांधकाम परवानगी दिली जात नाही.

एका परवानगीकरिता तीन वर्षांचा कालावधी लागत आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच परवानग्या देण्यात आल्या आहेत. या गावात एक गुंठा जमिनीचा भाव २५ लाख रुपये इतका आहे. शेतकऱ्यांची ५० टक्के जागा घेणार. ती विकसित करून देणार. त्यात रस्ता तयार करणार, लाइटची व्यवस्था करणार. सरकारकडून ग्राेथ सेंटरच्या विकासापाेटी ०.९५ एफएसआय दिला जात आहे. जागा ५० टक्के घेऊन एफएसआय इतका कमी कसा काय दिला आहे.’ 

‘बिल्डरांना कोणतीही आडकाठी नाही’

  • १० गावांत शेकडो एकर जमिनी बड्या बिल्डरांनी घेतल्या आहेत. त्यांच्याकडून विकास सुरू आहे. त्यांना कोणतीही आडकाठी सरकारने केली नाही. केवळ शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. बड्या बिल्डरांचे प्रकल्प सुरू आहेत. 
  • आता सरकारला ग्रोथ सेंटरसाठी घेण्यास जागा शिल्लक राहिलेली नाही. आता जर ग्रोथ सेंटर उभे करायचे तर शेतजमीन व शेतकऱ्यांची राहती घरे द्यावी लागतील. 
  • महापालिका, एमएमआरडीए आणि नव्याने होऊ घातलेली नगर परिषद या तिहेरी पेचात येथील शेतकरी फसला आहे. त्यातून त्याची मुक्तता करण्याकरिता ग्रोथ सेंंटर रद्द करा, अशी मागणी समितीने केली आहे. 
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे