शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जेमतेम २० ते ३० रुपये दर, वडापाव खाऊन भागवली भूक; नाशिकच्या शेतकऱ्याची व्यथा

By मुरलीधर भवार | Updated: October 25, 2023 12:21 IST

फुले आणणे झाले भाड्याला महाग

मुरलीधर भवार, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : दसऱ्याला झेंडूच्या फुलांना फूल बाजारात चांगली मागणी असेल या अपेक्षेने नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर येथून आलेल्या योगेश अंकुरणीकर या शेतकऱ्याला फुले आणणे भाड्याला महाग झाले. झेंडूला किलोमागे किमान ५० रुपये दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, योगेशला जेमतेम २० ते ३० रुपये दर मिळाला. झेंडू पिकवण्यासाठी मेहनत केलेले अंकुरणीकर आपल्या टेम्पोतील शिल्लक झेंडूंच्या फुलांवर थोडीशी विश्रांती घेण्यासाठी पडले होते. एक वडापाव खाऊन भूक भागवली. सारेच शेतकऱ्यांच्या हिताची फक्त भाषा करतात, पण शेतकरी असा चोहोबाजूने पिचलाय, अशी खंत त्यांनी ‘लोकमत’कडे बोलून दाखवली.

योगेश अंकुरणीकर हे झेंडूच्या फुलांची शेती करतात. त्यांनी पंधरा गुंठे जागेत लाल झेंडूच्या फुलाचे पीक घेतले. दसऱ्याला चांगला भाव मिळणार, अशी त्यांना अपेक्षा होती. पहिल्या खुड्यात त्यांच्या हाती २०० क्रेट माल निघाला. एका क्रेटमध्ये आठ किलोचा माल असतो. त्यांना फूलशेतीसाठी १५ हजार रुपये उत्पादन खर्च आला. हा माल घेऊन २२ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता ते विंचूर येथून निघाले. त्यांना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती गाठण्यासाठी पहाटे ४ वाजले. या प्रवासादरम्यान त्यांना तीन टाेलनाके लागले. या टोलनाक्यांवर तीन टप्प्यात २४०, १४० आणि ७० रुपये टोल भरावा लागला.

सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. मात्र जो शेतकरी शेतातला माल घेऊन थेट बाजारपेठ गाठतो त्याचा माल हा टोलमुक्त असला पाहिजे, असे योगेश म्हणाले. मालवाहतूक गाडीला ७ हजार भाडे भरले. बाजारात आल्यावर झेंडूला किमान ५० रुपये किलोचा दर मिळणे अपेक्षित होते. तो केवळ २० ते ३० रुपये दराने विकला गेला. त्यामुळे उत्पादन खर्च आणि गाडीभाडे निघणे मुश्किल झाले. योगेश यांची केवळ फूलशेतीच नाही तर त्यांनी या आधी टोमॅटोचे पीक घेतले होते. बाजारभाव पडले. त्यामुळे त्यांची मदार दसऱ्यावर होती. दसराही फुकट गेला. आता त्यांच्या शेतात कांदा पीक आहे.

५०० रुपयांची पावती बाजार समितीत फाडली

विवेक आवटे हे जुन्नरचे शेतकरी आहेत. त्यांनी २३ ऑक्टोबरच्या पहाटेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली. त्यांनी लाल आणि पिवळा झेंडू बाजारात विक्रीसाठी आणला होता. एका रोपामागे २ रुपये खर्चाप्रमाणे २० हजार रुपये, औषध फवारणीसाठी पाच हजार रुपये,  एक एकर जागेत ८ ते १० टन झेंडूचे पीक आले. गाडीभाडे सात हजार रुपये माेजावे लागले. बाजार समितीत ५०० रुपये पावती फाडावी लागली. हा सगळा खर्च पाहता बाजारात झेंडूला मिळालेला दर पाहता ५० टक्के तोटा सहन करावा लागला. गणपती उत्सवात चांगला दर मिळाला. पण दसऱ्याला दर पडले, असे त्यांनी सांगितले.

शेती सोडता येत नाही. करावीच लागते. त्यामुळे करणार काय? कल्याणला माल विकण्यासाठी आलो. रात्र टेम्पोत झोपून काढावी लागली. पोटाला आधार म्हणून वडापाव खाल्ला. निराशा उरी घेऊन गावी परतणार आहे. आमच्या घरी यंदा दसरा-दिवाळी सण कसा साजरा होणार? - योगेश अंकुरणीकर, शेतकरी, विंचूर, नाशिक.

 

टॅग्स :kalyanकल्याण