शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

जेमतेम २० ते ३० रुपये दर, वडापाव खाऊन भागवली भूक; नाशिकच्या शेतकऱ्याची व्यथा

By मुरलीधर भवार | Updated: October 25, 2023 12:21 IST

फुले आणणे झाले भाड्याला महाग

मुरलीधर भवार, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : दसऱ्याला झेंडूच्या फुलांना फूल बाजारात चांगली मागणी असेल या अपेक्षेने नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर येथून आलेल्या योगेश अंकुरणीकर या शेतकऱ्याला फुले आणणे भाड्याला महाग झाले. झेंडूला किलोमागे किमान ५० रुपये दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, योगेशला जेमतेम २० ते ३० रुपये दर मिळाला. झेंडू पिकवण्यासाठी मेहनत केलेले अंकुरणीकर आपल्या टेम्पोतील शिल्लक झेंडूंच्या फुलांवर थोडीशी विश्रांती घेण्यासाठी पडले होते. एक वडापाव खाऊन भूक भागवली. सारेच शेतकऱ्यांच्या हिताची फक्त भाषा करतात, पण शेतकरी असा चोहोबाजूने पिचलाय, अशी खंत त्यांनी ‘लोकमत’कडे बोलून दाखवली.

योगेश अंकुरणीकर हे झेंडूच्या फुलांची शेती करतात. त्यांनी पंधरा गुंठे जागेत लाल झेंडूच्या फुलाचे पीक घेतले. दसऱ्याला चांगला भाव मिळणार, अशी त्यांना अपेक्षा होती. पहिल्या खुड्यात त्यांच्या हाती २०० क्रेट माल निघाला. एका क्रेटमध्ये आठ किलोचा माल असतो. त्यांना फूलशेतीसाठी १५ हजार रुपये उत्पादन खर्च आला. हा माल घेऊन २२ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता ते विंचूर येथून निघाले. त्यांना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती गाठण्यासाठी पहाटे ४ वाजले. या प्रवासादरम्यान त्यांना तीन टाेलनाके लागले. या टोलनाक्यांवर तीन टप्प्यात २४०, १४० आणि ७० रुपये टोल भरावा लागला.

सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. मात्र जो शेतकरी शेतातला माल घेऊन थेट बाजारपेठ गाठतो त्याचा माल हा टोलमुक्त असला पाहिजे, असे योगेश म्हणाले. मालवाहतूक गाडीला ७ हजार भाडे भरले. बाजारात आल्यावर झेंडूला किमान ५० रुपये किलोचा दर मिळणे अपेक्षित होते. तो केवळ २० ते ३० रुपये दराने विकला गेला. त्यामुळे उत्पादन खर्च आणि गाडीभाडे निघणे मुश्किल झाले. योगेश यांची केवळ फूलशेतीच नाही तर त्यांनी या आधी टोमॅटोचे पीक घेतले होते. बाजारभाव पडले. त्यामुळे त्यांची मदार दसऱ्यावर होती. दसराही फुकट गेला. आता त्यांच्या शेतात कांदा पीक आहे.

५०० रुपयांची पावती बाजार समितीत फाडली

विवेक आवटे हे जुन्नरचे शेतकरी आहेत. त्यांनी २३ ऑक्टोबरच्या पहाटेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली. त्यांनी लाल आणि पिवळा झेंडू बाजारात विक्रीसाठी आणला होता. एका रोपामागे २ रुपये खर्चाप्रमाणे २० हजार रुपये, औषध फवारणीसाठी पाच हजार रुपये,  एक एकर जागेत ८ ते १० टन झेंडूचे पीक आले. गाडीभाडे सात हजार रुपये माेजावे लागले. बाजार समितीत ५०० रुपये पावती फाडावी लागली. हा सगळा खर्च पाहता बाजारात झेंडूला मिळालेला दर पाहता ५० टक्के तोटा सहन करावा लागला. गणपती उत्सवात चांगला दर मिळाला. पण दसऱ्याला दर पडले, असे त्यांनी सांगितले.

शेती सोडता येत नाही. करावीच लागते. त्यामुळे करणार काय? कल्याणला माल विकण्यासाठी आलो. रात्र टेम्पोत झोपून काढावी लागली. पोटाला आधार म्हणून वडापाव खाल्ला. निराशा उरी घेऊन गावी परतणार आहे. आमच्या घरी यंदा दसरा-दिवाळी सण कसा साजरा होणार? - योगेश अंकुरणीकर, शेतकरी, विंचूर, नाशिक.

 

टॅग्स :kalyanकल्याण