शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी साखळी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 8:30 PM

कल्याण डोंबिवली ग्रामीण भागासह भूमीपूत्रंनी केले मानवी साखळी आंदोलन

ठळक मुद्देआगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वङो यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भर पावसात भूमीपूत्र रस्त्यावर उतरला आहे.

कल्याण - नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज भूमीपूत्रंनी मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला भूमीपूत्रंनी प्रतिसाद देत कल्याणडोंबिवलीसह ग्रामीण भागात भूमीपूत्रंनी मानवी साखळी तयार करुन राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन आत्ता शांततेच्या मार्गाने करीत आहोत. यापुढील आंदोलनात संयम ठेवला जाणार नाही, असा इशारा भूमीपुत्रांनी यावेळी सरकारला दिला आहे. भर पावसात ही मानवी साखळी तयार करण्यासाठी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते.

कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका, चक्कीनाका, नेवाली नाका, आडीवली ढोकली, द्वारली भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळ फाटा या ठिकाणी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला ही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सगळेच भूमीपूत्र हे आग्रही होते. त्यामध्ये ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोकही सहभागी झाले होते. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड हे मानवी साखळीत सहभागी झाले होते.

आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वङो यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भर पावसात भूमीपूत्र रस्त्यावर उतरला आहे. 24 तारखेला सिडकोत भव्य मोर्चा याच मागणीसाठी आहे. आत्ता समाजाचा संयम सुटण्या आधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा याकडे वङो यांनी लक्ष वेधले आहे.

आमदार गायकवाड म्हणाले की, विमानतळास दि. बा. पाटील याचे नावे देण्याची मागणी रास्त आहे. मात्र हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमीपूत्रंचे नेते असलेल्या दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे. मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील मानवी साखळीत सहभागी झाले. 

ते म्हणाले की, विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणी संदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असलीत समाज यापूढील आंदोलनात शांतता आणि संयम ठेवणार नाही असा इशारा सरकारला दिला आहे. आडीवली ढोकली या ठिकाणी पार पडलेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंच्या हितासाठी रक्त सांडले होते. त्यांचेच नाव विमानतळास द्यावे. सरकारने या प्रकरणी राजकारण करु नये याकडे लक्ष वेधले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली