शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

वर्षभरातील अपघातांत १९२ जणांचा मृत्यू; खड्डे, रस्त्याचा असमतोलपणा ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 11:30 PM

३७८ जण गंभीर जखमी ; अपघाती ठिकाणे ब्लॅक स्पाॅट घाेषित, कोरोनामुळे अपघातात झाली घट

अजित मांडके/प्रशांत माने

ठाणे : लॉकडाऊनमुळे शहरातील वाहनांचा वेग मंदावला होता. त्याचा परिणाम पोलीस आयुक्तालयात अपघातांमध्ये या कालावधीत घट दिसून आली; मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि पुन्हा अपघातांत वाढ झाली. त्यानुसार मागील जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत पोलीस आयुक्तालयात ६६८ अपघात झाले असून, त्यामध्ये ८०४ जणांना दुखापत झाली आहे. यामध्ये १९२ जणांचा मृत्यू झाला.पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक विभागामार्फत अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलीस आयुक्तालयात ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात, ती ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

याठिकाणी अपघात कशा पद्धतीने कमी करता येऊ शकतात, यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालयात आजच्या घडीला ३७ ब्लॅक स्पॉट असल्याची माहितीही यानिमित्ताने समोर आली आहे. दरम्यान, मागील वर्षभराची आकडेवारी पाहता, पोलीस आयुक्तालयात एकूण ६६८ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १९२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याच अपघातांमध्ये ३७८ जण गंभीर झाले असून, २३४ जणांना किरकोळ दुखापत झाली.  २०१९ मध्ये पोलीस आयुक्तालयात ८७४ अपघात झाले असून, यामध्ये २११ जणांचा मृत्यू झाला आहे. ४९५ जणांना गंभीर, तर २९९ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. वर्षभरात १०११ जणांना दुखापत झाली.

कल्याण-डाेंबिवली शहरांमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही दुरवस्था ‘जैसे थे’ 

‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीनुसार पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडणारच हे गृहीत धरले जात असले तरी पावसाळ्यानंतरही खड्ड्यांचे चित्र कल्याण- डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. खड्ड्यांसह रस्त्याच्या असमतोलपणामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून दरवर्षी केडीएमसीकडून कोट्यवधी खर्च करूनही रस्त्यांची दुरवस्था ‘जैसे थे’ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीलाही हातभार लागत असून ज्यांच्यावर वाहतूक नियमाची जबाबदारी आहे त्या वाहतूक पोलिसांनाही योग्य त्या सुविधा महापालिकेकडून मिळत नसल्याने त्यांचीही फरपट होते. दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते; परंतु रस्तेच सुस्थितीत नसतील आणि वाहतूक नियमन करणाऱ्यांना सुविधाच मिळत नसतील तर असे कार्यक्रम राबवून काय साध्य होणार? असा सवाल एकूणच वास्तव पाहता उपस्थित होत आहे.

केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी ५३२ किमी आहे. या पैकी ३८२ किलोमीटरचे रस्ते हे कल्याण डोंबिवली शहरातील तर उर्वरित १५० किलोमीटर रस्ते २७ गावांतील आहेत. यातील बहुतांश रस्ते डांबरीकरणाचे तर काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. विकासकामांच्या निमित्ताने महापालिकेसह अन्य यंत्रणांनी वेळोवेळी केलेल्या खोदकामांमुळे पावसाळ्यानंतरही शहरातील काही प्रमुख रस्त्यांची आजच्या घडीला दयनीय अवस्था आहे. डोंबिवली निवासी भागासह ठाकुर्लीतील ९० फिट रोड आणि कल्याण- डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता याचे ज्वलंत उदाहरण आहे.  सुस्थितीत असलेल्या या रस्त्यांची सद्य:स्थितीला पुरती वाताहत झाली असताना शहरातील काँक्रिटीकरणाची कामेही योग्य प्रकारे झालेली नाहीत. 

टॅग्स :Accidentअपघात