शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

Asian Games 2018: फेडरेशनच्या कलहामुळे आम्ही हरलो; भारतीय कबड्डी संघाच्या कर्णधाराचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 8:34 AM

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेतील कबड्डीतील हक्काचे सुवर्णपदक जिंकण्यात भारतीय पुरुष व महिला संघाना अपयश आले. महिला संघाला रौप्य, तर पुरुष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुंबई - आशियाई स्पर्धेतील कबड्डीतील हक्काचे सुवर्णपदक जिंकण्यात भारतीय पुरुष व महिला संघाना अपयश आले. महिला संघाला रौप्य, तर पुरुष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष संघाची १९९० पासूनची आणि महिला संघाची २०१० पासूनची सुवर्णपदक जिंकण्याची परंपरा जकार्ता येथे खंडित झाली. 

या अपयशाला भारतीय कबड्डी फेडरेशनमध्ये सुरु असलेले कलह जबाबदार असल्याची टीका महिला संघाची कर्णधार पायल चौधरीने केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक खुलासा केला. त्याचसोबत अंतिम लढतीत पंचांचे काही निर्णय चुकल्याचेही तिने सांगितले. 

ती म्हणाली,' आशियाई संघ निवडीवरून काही माजी खेळाडूंनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पुन्हा संघ निवड चाचणी घेण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आम्ही येथू सुवर्ण जिंकून परतलो असतो तरी त्याचा आम्हाला काहीच अतिरिक्त फायदा मिळणारा नव्हता आणि पुन्हा निवड चाचणी झाली असती, अशाही चर्चा सुरु होत्या. हे सर्व आम्ही आशियाई स्पर्धेला रवाना होणार त्याच दिवशी आम्हाला कळले. त्याचे मानसिक दडपण कुठेतरी संघातील प्रत्येक खेळाडूवर होते.' 

भारताचे माजी खेळाडू होनप्पा सी गोवडा आणि एस राजराथनम यांनी संघ निवड करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाKabaddiकबड्डीSportsक्रीडा