शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

जगातला सगळ्यात महागडा आंबा माहित्येय का? १ किलो घ्यायलाही फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 5:31 PM

जगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात.

आंबा खायला सगळ्यांनाच आवडतं. वाढत्या उन्हाळ्यात मनाला आनंद देणारा आंबा असतो. तोंडाला पाणी सुटलं ना? उन्हाळ्यात असं एकही घर नसेल जिथे आंबे खाल्ले जात नाहीत. आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं. हापूस, पायरी, तोतापूरी, लंगडा असे अनेक आंब्याचे प्रकार आहेत. जगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात. पण तुमचा विश्वास बसणार नाही. जगातील सगळ्यात महागडा आंबा भारतात मिळत नाही.  तसंच या आंब्याची किंमत ऐकूनच अनेक लोकांना सुद्धा घाम फुटतो. चला तर मग जाणून घेऊया या आंब्याबाबत.

ताईयो नो तामागो (एग ऑफ द सन) असा एक आंब्यांचा प्रकार आहे. हा आंबा जपानच्या मियाजाकी प्रांतात पिकवला जातो. तसंच संपूर्ण जपानमध्ये विकला सुद्धा जातो. दरवर्षी खास आणि सगळ्यात आधी पिकवलेल्या आंब्यांची बोली लावून लिलाव केला जातो. त्यामुळे या आंब्याचे भाव गगनाला भिडतात.

या आंब्याची शेती इतर पिंकाप्रमाणे कधीही करता येत नाही. फक्त ऑर्डर असेल तरच या पिकांची शेती केली जाते. या आंब्याचं वेगळेपणं असं आहे की हा आंबा अर्धा लाल आणि अर्धा पिवळा असतो. जपानमध्ये हिवाळा आणि उन्हाळ्यात या आंब्याचं पीक घेतलं जातं. हे आंबे खूप महाग असतात.

२०१७ मध्ये  या आंब्याच्या एका जोडीसाठी बोली लावण्यात आली होती. त्यावेळी ही जोडी ३ हजार ६०० डॉलर म्हणजे ७२ हजार रुपयांना विकली होती. प्रत्येक आंब्याचं वजन ३५० ग्राम होतं.  तुम्ही विचारात पडला असाल की, ७०० ग्राम आंब्याची किंमत एव्हढी जास्त कशी,  हेच एक किलो आंबे विकत घेण्यासाठी तुम्हाला तीन लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.

हे आंबे पिकवत असताना खूप खबरदारी घेतली जाते. शेतकरी आंब्यांना बाहेरून जाळे लावून ठेवतात. शेतकरी या आंब्यांना पिकल्यानंतर खाली पडू देत नाहीत. जाळी लावल्यामुळे आंबे जाळीत पडतात. हे आंबे खूप चविष्ट आणि रसदार असल्याचे स्थानिक लोक सांगतात. 

ज्योती कुमारी होणार 'सुपर 30' ची विद्यार्थीनी; मोफत शिक्षण देणार

बापरे! याने हव्यासापोटी शेजाऱ्यांच्या १२६ चपला चोरल्या; कारण वाचाल तर हैराण व्हाल

टॅग्स :Jara hatkeजरा हटके