शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

आजपर्यंत का कुणीच कैलास पर्वत सर करू शकले नाही, काय आहे कारण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 12:27 IST

हिंदू धर्मात कैलास पर्वताला फार महत्व आहे. कारण अशी मान्यता आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिवा राहतात. पण या पर्वताबाबत आणखी एक आश्चर्याची बाब आहे.

हिंदू धर्मात कैलास पर्वताला फार महत्व आहे. कारण अशी मान्यता आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिवा राहतात. पण या पर्वताबाबत आणखी एक आश्चर्याची बाब आहे. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट आतापर्यंत ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी सर केलं आहे. यांची उंची ८८४८ इतकी आहे. पण कैलास पर्वत आजपर्यंत कुणी सर करू शकलं नाही. याची उंची ६६३८ मीटर इतकी आहे. माउंट एव्हरेस्टपेक्षा ही उंची कमी असूनही कैलास पर्वत कुणी सर केला नाही, हे रहस्यच आहे.

कैलास पर्वतावर कधी कुणीही चढाई न करण्यावरून अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिव राहतात आणि त्यामुळे इथे कोणतीही जिवंत व्यक्ती जाऊ शकत नाही. असे मानले जाते की, कैलाश पर्वतावर थोडं वर चढल्यावर व्यक्ती दिशाहीन होते. दिशा कळत नसताना चढाई करणे मरणाला निमंत्रण देण्यासारखंच आहे. त्यामुळेच आजपर्यंत कुणी कैलास पर्वतावर चढू शकलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका गिर्यारोहकाने त्याच्या पुस्तकात लिहिले होते की, त्याने कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला होता. पण या पर्वतावर राहणं अशक्य होतं. कारण इथे शरीरावरील केस आणि नखे वेगाने वाढू लागतात. त्यासोबतच कैलास पर्वतावर फार जास्त रेडिओअॅक्टिवही आहे.

त्यासोबतच असेही म्हटले जाते की, कैलास पर्वताचा स्लोप सुद्धा ६५ डिग्रीपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टचा हाच स्लोप ४०-६० असा आहे. हेच कारण आहे की, गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर सहजपणे चढाई करू शकतात, पण कैलास पर्वतावर करू शकत नाहीत.

रशियातील एक गिर्यारोहक सरगे सिस्टीयाकोव यांनी सांगितले की, 'जेव्हा मी कैलास पर्वताच्याजवळ गेलो तेव्हा माझं हृदय वेगाने धडधडत होतं. मी त्या पर्वताच्या अगदी समोर होतो, ज्यावर आजपर्यंत कुणीही चढाई करू शकले नाहीत. पण मला अचानक कमजोरी वाटू लागली आणि माझ्या मनात विचार आला की, मी इथे थांबू नये. त्यानंतर जसजसा मी खाली उतरत गेलो, माझं मन हलकं होत गेलं'.

(Image Credit : Welcome NRI)

कैलास पर्वतावर चढाई करण्याचा शेवटचा प्रयत्न जवळपास  १८ वर्षांआधी म्हणजे २००१ मध्ये केला गेला होता. तेव्हा चीनने स्पेनच्या एका टीमला कैलास पर्वतावर चढाई करण्याची परवानगी दिली होती. सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसहीत जगभरातील लोकांचं मत आहे की, हे एक पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे यावर कुणालाही चढाई करू देऊ नये.

दरम्यान, असे म्हणतात की, ९२ वर्षांआधी म्हणजेच १९२८ साली एक बौद्ध भिक्खु मिलारेपा कैलास पर्वातावर चढाई करण्यात यशस्वी ठरले होते. तसेच ते या पर्वतावर जाऊन जिवंत परत येणारे जगातले पहिले व्यक्ती होते. याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल