शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

'इश्किया'तील 'इब्न बतूता...' हे गाणं तर तुम्ही ऐकलं असेलच, आता हे जाणून घ्या कोण होता हा इब्न बतूता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 13:36 IST

'इब्न बतूता, बगल में जूता, पहने तो करता है चुर्र...' या गाण्याला १० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. आजही अनेकांना हे गाणं आवडतं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, हा इब्न बतूता (Ibn Battuta) कोण होता?

२०१० मध्ये अरशद वारसी,  नसीरूद्दीन शाह आणि विद्या बालनचा 'इश्किया' सिनेमा आला होता. या सिनेमातील एक गाणं फारच  फेमस झालं होतं. 'इब्न बतूता, बगल में जूता, पहने तो करता है चुर्र...' या गाण्याला १० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. आजही अनेकांना हे गाणं आवडतं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, हा इब्न बतूता (Ibn Battuta) कोण होता? चला आज आम्ही तुम्हाला सांगतो कोण होता हा इब्न बतूता...

ही गोष्ट आहे १४व्या शतकातील. १३०४ मध्ये मोरक्कोमध्ये एका इब्न बतूता नावाच्या व्यक्तीचा जन्म झाला होता. तो एक मस्तमौला व्यक्ती होता. त्याला जगभरात फिरायची आवड होती. त्याला फिरायची इतकी आवड होती की, तो जगाच्या प्रवासावर निघाला. त्यावेळी लोक बाहेर फिरायला जाण्याच्या नावावर धार्मिक यात्राच करत होते. पण इब्न-ए-बतूता खरंच जगभरात फिरायला आणि जग समजून घ्यायला निघाला होता. तेही केवळ २१व्या वयात. तो एक इस्लामिक स्कॉलर होता. तो हज यात्रेकरूंसोबत फिरायला गेला. पण परत आला नाही. त्याने ठरवलं की, तो बाकीची दुनिया बघणार.

३० वर्ष केलं प्रवास

इब्न बतूताने आफ्रिका, आशिया आणि दक्षिण पूर्व यूरोपचा जास्तीत जास्त भाग पाहिला. आपल्या प्रवासादरम्यान तो उत्तर अमेरिका, इजिप्त, अरब, फारस, अफगानिस्तानलाही गेला होता. इतकंच काय तर तो हिमालय पार करत भारत, चीन, दक्षिण-पूर्व आशिया, मालदीव्सलाही गेला होता. 

१३३२ च्या शेवटी तो भारतात आला होता. त्यावेळी मुहम्मद बिन तुघलकाचं शासन होतं. त्याने इब्न बतूताचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. इब्न बतूता काही दिवस सुल्तानच्या दरबारात राहिला. त्याने तीस वर्षात जवळपास १ लाख २० हजार किलोमीटर प्रवास केला.

त्याच्या प्रवासाचं सगळं वर्णन 'रिहला' मध्ये वाचता येईल. ज्याचा अर्थ होतो सफरनामा. यात तुम्हाला त्या सर्व ठिकाणांबाबत, लाईफस्टाईलबाबत वाचायला मिळेल. या पुस्तकात याचाही उल्लेख आहे की, इब्न बतूताने त्याच्या या प्रवासादरम्यान साधारण १० लग्ने केली. आफ्रिका, यूरोप आणि आशियात त्याला मुलंही झालीत.

इब्न बतूता आपल्या देशात म्हणजे मोरक्कोत कधी परतला  याबाबत वाद आहेत. पण असं मानलं जातं की, तो १३४९ मध्ये आपल्या देशात पोहोचला होता. आपल्या घरापासून तो बराच काळ दूर होता. तो पोहोचण्यााच्या काही महिन्यांआधीच त्याच्या  आईचं निधन झालं होतं. तर साधारण १५ वर्षाआधी त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके