शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

भारीच! 'हे' आहे अनोखं गाव जिथे प्रत्येक घरात पाळले जातात 'मोर', अशी घेतली जाते काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 11:32 IST

Peacock Village : गावच्या घरोघरी मोर पाळलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मोरांचं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली असून हे गाव अत्यंत लोकप्रिय झालं आहे

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एक असं अनोखं गाव आहे जिथे प्रत्येक घरात मोर पाळले जातात. हे सुंदर दृश्य पाहून सर्वच जण आनंदी होतात. उज्जैनपासून जवळपास सात किलोमीटर दूर अंतरावर चिंतामन रोडजवळ एक मंगरोला गाव आहे. हा एक ग्रामीण परिसर आहे पण या गावाची खासियत म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात आपला राष्ट्रीय पक्षी मोर वास्तव्यास आहे. या गावच्या घरोघरी मोर पाळलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मोरांचं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली असून हे गाव अत्यंत लोकप्रिय झालं आहे. सर्वत्र या गावाची चर्चा रंगली आहे. 

मंगरोला या गावातील नागरिकांनी मोरांना वाचवण्यासाठी या मोहीम सुरू केली असून राज्यातील पहिले मोर संवर्धन केंद्र त्यांनी उघडलं आहे. जखमी मोरांना रुग्णालयात नेण्याचं कामही गावकरी करत आहेत. या मंगरोला गावाची लोकसंख्या साधारण एक हजार असून त्यांच्याकडे 600 मोर आहेत. मोरांचे निवारा बनलेलं हे गाव आता मोरांमुळे ओळखलं जाऊ लागलं आहे. मोरांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी सुरुवातीला पैसे जमा केले आणि त्यानंतर मोर संवर्धन केंद्र बांधले. संवर्धन केंद्रामध्ये मोरांच्या राहण्याची आणि उपचाराची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. 

तरुण गावकऱ्यांनी मोरांच्या देखरेखीची स्वीकारली जबाबदारी

उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी देखील मोरांच्या संरक्षणासाठी आमदार निधीतून 5 लाख रुपये दिले आहेत. आता गावातच सरकारी जमिनीवर मोर संवर्धन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. मोर आता या गावाचाच एक महत्त्वाचा भाग बनत चालले आहेत. जसे घरातील पाळीव प्राणी कुत्री आणि मांजर असतात. तसेच या गावात मोर घरोघरी फिरताना दिसतात. मंगरोला गावाच्या आजुबाजूला असलेल्या 15 गावांमध्ये आता मोरांची संख्या वाढत आहे. तरुण गावकऱ्यांनी मोरांच्या देखरेखीची जबाबदारी स्वीकारली आहे. 

मोर संवर्धन केंद्रासाठी 10 एकर जमीन

कधीकधी मोर शेतातील कीटक देखील. त्यामुळे ते अनेक वेळा आजारी पडतात. अनेक वेळा जंगली प्राणी मोरांवर हल्ला करून जखमी करतात. आता यासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतला असून मोर संवर्धन केंद्रासाठी 10 एकर जमीन दिली आहे. हे राज्यातील पहिले आणि एकमेव मोर संवर्धन केंद्र आहे. मोर उन्हाळ्यात घरी राहतात आणि थंड आणि पावसाच्या वेळी शेतात जातात. मोर इतके मैत्रीपूर्ण झाले आहेत की ते घराच्या बाजूला बागेत अंडी घालतात. गावकरी मग रात्रंदिवस त्यांचं रक्षण करतात जेणेकरून मांजर ते खाऊ नये. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत