शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! 'हे' आहे अनोखं गाव जिथे प्रत्येक घरात पाळले जातात 'मोर', अशी घेतली जाते काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 11:32 IST

Peacock Village : गावच्या घरोघरी मोर पाळलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मोरांचं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली असून हे गाव अत्यंत लोकप्रिय झालं आहे

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एक असं अनोखं गाव आहे जिथे प्रत्येक घरात मोर पाळले जातात. हे सुंदर दृश्य पाहून सर्वच जण आनंदी होतात. उज्जैनपासून जवळपास सात किलोमीटर दूर अंतरावर चिंतामन रोडजवळ एक मंगरोला गाव आहे. हा एक ग्रामीण परिसर आहे पण या गावाची खासियत म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात आपला राष्ट्रीय पक्षी मोर वास्तव्यास आहे. या गावच्या घरोघरी मोर पाळलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मोरांचं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली असून हे गाव अत्यंत लोकप्रिय झालं आहे. सर्वत्र या गावाची चर्चा रंगली आहे. 

मंगरोला या गावातील नागरिकांनी मोरांना वाचवण्यासाठी या मोहीम सुरू केली असून राज्यातील पहिले मोर संवर्धन केंद्र त्यांनी उघडलं आहे. जखमी मोरांना रुग्णालयात नेण्याचं कामही गावकरी करत आहेत. या मंगरोला गावाची लोकसंख्या साधारण एक हजार असून त्यांच्याकडे 600 मोर आहेत. मोरांचे निवारा बनलेलं हे गाव आता मोरांमुळे ओळखलं जाऊ लागलं आहे. मोरांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी सुरुवातीला पैसे जमा केले आणि त्यानंतर मोर संवर्धन केंद्र बांधले. संवर्धन केंद्रामध्ये मोरांच्या राहण्याची आणि उपचाराची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. 

तरुण गावकऱ्यांनी मोरांच्या देखरेखीची स्वीकारली जबाबदारी

उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी देखील मोरांच्या संरक्षणासाठी आमदार निधीतून 5 लाख रुपये दिले आहेत. आता गावातच सरकारी जमिनीवर मोर संवर्धन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. मोर आता या गावाचाच एक महत्त्वाचा भाग बनत चालले आहेत. जसे घरातील पाळीव प्राणी कुत्री आणि मांजर असतात. तसेच या गावात मोर घरोघरी फिरताना दिसतात. मंगरोला गावाच्या आजुबाजूला असलेल्या 15 गावांमध्ये आता मोरांची संख्या वाढत आहे. तरुण गावकऱ्यांनी मोरांच्या देखरेखीची जबाबदारी स्वीकारली आहे. 

मोर संवर्धन केंद्रासाठी 10 एकर जमीन

कधीकधी मोर शेतातील कीटक देखील. त्यामुळे ते अनेक वेळा आजारी पडतात. अनेक वेळा जंगली प्राणी मोरांवर हल्ला करून जखमी करतात. आता यासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतला असून मोर संवर्धन केंद्रासाठी 10 एकर जमीन दिली आहे. हे राज्यातील पहिले आणि एकमेव मोर संवर्धन केंद्र आहे. मोर उन्हाळ्यात घरी राहतात आणि थंड आणि पावसाच्या वेळी शेतात जातात. मोर इतके मैत्रीपूर्ण झाले आहेत की ते घराच्या बाजूला बागेत अंडी घालतात. गावकरी मग रात्रंदिवस त्यांचं रक्षण करतात जेणेकरून मांजर ते खाऊ नये. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत