शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कौतुकास्पद! दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मराठमोळ्या तरूणानं यशस्वी सर केला लिंगाणा किल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 19:03 IST

Inspirational Stories : विशेष म्हणजे काठ्यांचा आधार घेतल्याशिवाय चैतन्यला उभंही राहता येत नाही तरी यानं ही कामगिरी केल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

लिंगाणा डोंगराची चढाई करणं खूपच कठीण आहे. या डोंगराची चढाई करणं धडधाकड लोकांनाही जमत नाही. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अहमनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील दाढ गावातील रहिवासी असलेल्या चैतन्य कुलकर्णी नावाच्या एका अपंग  तरूणाने या दुर्गम डोंगरी किल्ल्यावर यशस्वीरित्या चढाई केली आहे. विशेष म्हणजे काठ्यांचा आधार घेतल्याशिवाय चैतन्यला उभंही राहता येत नाही तरी यानं ही कामगिरी केल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

२०१४ ला चैतन्य  ६० फूड नारळाच्या झाडावरून खाली पडला होता. त्यामुळे त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यानंतर त्याला नेहमी चालण्यासाठी काठ्याची गरज भासू लागली. इच्छाशक्ती असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे चैतन्यने वारंवार सिद्ध केलं आहे. अशा स्थितीतही त्यानं खडतर रस्ता पार करत शक्तीच्या जोरावर महाराष्ट्रातील सर्वोच्च  कळसूबाई शिखर तीन वेळा सर केलं आहे. 

माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार

कंबरेखालचा भाग निष्क्रीय झाल्यानं सुळक्यावर चढाई करण्यात अनेक अडचणी येत होत्या. असं असताना त्याने लिंगाणा डोंगरावरील शिखरावरची गुहा गाठत भारताचा तिरंगा ध्वज फडकवत विक्रम केला आहे. लिंगाणा ट्रेक करण्यासाठी चैतन्य महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या ग्रुप लीडर एडवेंचर्सची भेट  घेत होता. पण पायाची अवस्था पाहून त्याला कोणीही  प्रतिसाद देत नव्हतं. पण  बारामतीतील अनिल वाघ, अमोल बोरकर आणि संदीप कसबे यांच्या ग्रुपने चैतन्याला ही संधी दिली. ज्याचं चैतन्यनं सोनं केलं आहे. त्याने सह्याद्री पर्वतरांगेतील अवघड असलेला लिंगाणा गड सर करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी सुरूवात केली होती.  त्याने एक दिवस अवघड चढाई करून मध्ये एकदा थांबले होते.

माणुसकीला काळीमा! आधी मुक्या जीवाला दांड्यानं मारलं नंतर रस्त्यावरून नेलं फरपटत, व्हायरल फोटो 

त्यानंतर १३ तारखेला दुसऱ्या दिवशी पुन्हा गडाची अवघड चढाई सुरू केल्यानंतर फक्त ५ तासात लिंगाणा शिखराची गुहा सर करण्यात यश मिळवलं आहे. त्यानंतर उन्हाच्या तडाख्यामुळे चैतन्याला पुढील ट्रेक करणं अशक्य वाटत होतं. त्यामुळे चैतन्याने गुहा सर केल्यानंतर तिरंगा झेंडा फडकावून उत्सव साजरा केला. त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. चैतन्याचं ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटकेRaigadरायगड