शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

ज्या मुलाचा करण्यात आला होता अंत्यसंस्कार, तो 7 वर्षांनी जिवंत घरी आला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 16:58 IST

सात वर्षानंतर तोच मुलगा घरी परत आला आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यांना मुलाला बघून खूप आनंद झाला.

बिहारच्या पटणामधून एक अजब घटना समोर आली आहे. येथील आसोपूर गावात एक वृद्ध दाम्पत्य राहतात. सात वर्षाआधी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाला मृत समजून त्यांनी त्याचा अंत्यसंस्कार केला होता. पण सात वर्षानंतर तोच मुलगा घरी परत आला आणि आई-वडिलांना धक्का बसला. त्यांना मुलाला बघून खूप आनंद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये आसोपूर येथील बृजनंदन राय आणि पियरिया देवी यांचा मुलगा बिहारी राय अचानक बेपत्ता झाला होता. आई-वडिलांनी आपल्या मुलाचा खूप शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. त्याच्या वडिलांनी अंधविश्वासाच्या नादात त्याचा पुतळा बनवून त्याच्यावर अंत्यसंस्कार केला.

मात्र 7 वर्षानंतर त्याना आनंदाचा धक्का बसला. त्यांना मुलगा बिहारी राय दिल्लीतील एक संस्था आणि एका सरपंचाच्या माध्यमातून घरी परत आला. मुलगा घरी परत आल्याचा आनंद आई-वडिलांच्या डोळ्यात दिसत होता. त्याला बघताच त्यांनी मिठी मारली. 

वडील बृजनंदन राय म्हणाले की, मुलगा बेपत्ता झाल्यावर अनेकदा तो त्यांना स्वप्नात दिसत होता. एकदा स्वप्नात मुलगा स्वत: म्हणाला होता की, तो जिवंत आहे. ज्यानंतर त्यांनी काही साधूंशी चर्चा केली. साधू म्हणाले की, तुमचा मुलगा मृत झाला आहे. आता त्याची आत्मा तुम्हाला त्रास देत आहे. ज्यामुळे त्यांनी पुतळा बनवून त्याला मुलगा मानून अंत्यसंस्कार केला.

वडील काही लोकांच्या बोलण्यात आले होते. पण काही दिवसांआधी गावातील सरपंचाच्या मोबाइलवर दिल्लीतील एक संस्थेने बिहारी जिवंत असल्याचं सांगितलं आणि त्याचे फोटो पाठवले.

बिहारीची ओळख पटवल्यावर सरपंचांनी याची माहिती त्याच्या परिवाराला दिली. 7 वर्षानी जेव्हा बिहारी घरी परत आला तेव्हा परिवारात आनंद पसरला. बिहारी हा मानसिक आजारी आहे. त्यामुळे त्यालाच माहीत नव्हतं की, तो घरातून कधी आणि कसा निघून गेला होता. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके