शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:23 PM

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात.

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे मनुष्य तुम्हाला सोनं बहुमूल्य दगड किंवा हिरे शोधताना दिसतात. तेच आश्चर्याची बाब म्हणजे या गोष्टी त्यांना सापडतात सुद्धा. असंच एक ठिकाण भारतातही आहे. इथे लोक खुल्या मैदानात, शेतात हिरे शोधतात. चला जाणून घेऊ कुठे आहे हे ठिकाण...

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात. Geological Survey of India नुसार, पेरावली, तुग्गाली, जोन्नागिरी आणि वजराकरूर सारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिरे आहेत.

दूरदूरून लोक हिरे शोधायला येतात

हिरे सापडत असल्याची माहिती आजूबाजूच्या गावातील लोकांनाही आहे. ते नेहमीच इथे हिरे शोधायला येतात. ते आजूबाजूच्या राज्यातील लोकही हिऱ्याच्या शोधात इथे पोहोचतात. लोक त्यांची मजुरी सोडून इथे हिरे शोधायला येतात. त्यांना अपेक्षा असते की हिरा त्यांचं नशीब बदलेल. बीबीसीसोबत बोलताना गुंटूरमधील एक व्यक्ती म्हणाले की, त्यांच्या एका मित्राला  इथेच हिरा सापडला होता. त्यामुळे तेही त्यांचं नशीब पारखण्यासाठी इथे येतात.

कसे शोधतात हिरे ?

रिपोर्टनुसार इथे हिऱ्याच्या शोधात आलेले लोक कोणत्याही विशेष टेक्नीकचा वापर करत नाही. त्यांना जो दगड वेगळा आणि खास दिसतो तो ते उचलतात. हे लोक सूर्य किंवा चंद्र किरणांच्या प्रतिबिंबाच्या आधारावर हिरे शोधण्याच्या जागेची निवड करतात.

कुठे विकतात?

इथे सापलेले हिरे खरेदी करणारे इथे भरपूर लोक आहेत. ते लोकांकडून हिरे खरेदी करतात. पण फार जास्त किंमत देत नाहीत. नंतर तेच लोक हे हिरे  मोठ्या किंमतीत विकतात. मुळात हे एक फारच मेहनतीचं आणि पेशन्सचं काम आहे. यात नशीबाचाही मोठा खेळ आहे.

हिरे जमिनीतून वर येतात

Geological Survey of India चे उप-निर्देशक राजा बाबू म्हणाले की आंध प्रदेशातील दोन जिल्हे करनूल आणि अनंतपूरसोबत तेलंगणातील महबूबनगर हे खनिज संपत्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्यानुसार, जेव्हा जमिनीच्या खाली काही नैसर्गिक बदल होतो, तेव्हा जमिनीच्या आतील हिरे जमिनीच्या वर येतात.

काळा दगड

जीएसआयनुसार, या भागांमध्ये हिरे जमिनीच्या वर येणाचं मुख्य कारण ५ हजार वर्षात झालेलं मृदा क्षरण म्हणजे Soil Erosion हेही आहे. अधिकारी सांगतात की, पृथ्वीच्या १४०-१९० फूट खोलात असलेलं कार्बन अणु दबाव आणि जास्त तापमानामुळे हिऱ्या रूपांतरित होतं. तेच जेव्हा पृथ्वीत स्फोट होऊन लाव्हारस बाहेर येतो, हा लाव्हा नंतर काळा दगड बनतो. ज्याला किम्बरलाइट आणि लॅम्प्रोइट पाइप असंही म्हणतात.  हे पाइप हिऱ्यांसाठी स्टोर हाउससारखं काम करतात.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेAndhra Pradeshआंध्र प्रदेश