शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

एक म्हैस, दोन दावेदार...! पंचायतीला करता आला नाही न्याय निवाडा, तेव्हा खुद्द म्हशीनंच सोडवला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 02:28 IST

हा वाद मिटवण्यासाठी पंचायतही झाली. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले. मात्र, यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर, खुद्द म्हशीनेच हे प्रकरण सोडवले आणि वाद मिटला.

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे, एका म्हशीवर दोन जणांनी दावा सांगितला होता. हा वाद मिटवण्यासाठी पंचायतही झाली. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले. मात्र, यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर, खुद्द म्हशीनेच हे प्रकरण सोडवले आणि वाद मिटला.

काय आहे प्रकार? -संबंधित प्रकरण जिल्ह्यातील महेशगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राय अस्करनपूर गावातील नंदलाल सरोज यांच्याशी संबंधित आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची म्हैस बेपत्ता झाली होती. ती भटकून हरिकेश गावात पोहोचली. तेथे हनुमान सरोज नावाच्या एका व्यक्तीने तिला पकडले. तपास सुरू केला असता, संबंधित म्हैस हरिकेश गावातील हनुमान सरोज यांच्याकडे असल्याचे समजले. बुधवारी नंदलाल हनुमान सरोज यांच्या घरी पोहोचले. मात्र, त्यांनी ती म्हैस आपली असल्याचे सांगून देण्यास नकार दिला.

पंचायतीतही सुटलं नाही प्रकरण -यानंतर, हे प्रकरण पंचायतीकडे पोहोचले. मात्र, तेथेही निर्णय होऊ शकला नाही. अखेर हे प्रकरण पेलिसांपर्यंत पोहोचले. मात्र, सर्व प्रकारची चौकशी करूनही पोलिसांना निष्कर्षापर्यंत पोहोचता आले नाही.

असा मिटला वाद -वेगवेगळे प्रयत्न करूनही, प्रकरण सुटत नव्हते. अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षक अवधेश शर्मा यांना एक युक्ती सुचली. त्यांनी नंदलाल आणि हनुमान यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर काढले आणि त्यांच्या गावाच्या वाटेवर विरुद्ध बाजूला उभे राहण्यास सांगितले. यानंतर म्हैस सोडण्यात आली. अखेर ही म्हैस नंदलाल यांच्याकडे गेली आणि अशा पद्धतीने प्रकरण सुटले आणि वाद मिटला. म्हैस नंदलाल यांना देण्यात आली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसFarmerशेतकरी