शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कौतुकास्पद! हिंदू मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आले मुस्लिम बांधव, जवळच्या लोकांनी फिरवली पाठ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 15:12 IST

औरंगाबाद शहरात रमजानच्या दिवसात रोजा ठेवणारे मुल्सिम बांधवांनी आपल्या हिंदू मित्राच्या मुलाचा अंत्यसंस्कार पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे केला.

(Image Credit : Aajtak) 

कोरोना महामारीच्या या काळात जास्तीत जास्त लोक आपापला विचार करताना दिसत आहेत. माणूसकीला लाजवेल अशा घटना समोर येत आहेत. आपलेच लोक आपल्या लोकांपासून दूर पळत आहेत. मृत्युनंतर आपल्याच लोकांना खांदा देण्याचीही परवानगी प्रशासन देत नाहीये. अशा दुर्दैवी परिस्थितीत औरंगाबाद शहरातून मानवतेचा संदेश देणारी एक घटना समोर आली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, औरंगाबाद शहरात रमजानच्या दिवसात रोजा ठेवणारे मुल्सिम बांधवांनी आपल्या हिंदू मित्राच्या मुलाचा अंत्यसंस्कार पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे केला. या घटनेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. खांद्यावर मृतदेह घेणारे दाढी, टोपी आणि रूमाल ठेवलेले हे चेहरे सिनेमातील सीन नाही. औरंगाबादमधील हे सत्य चित्र आहे. औरंगाबादच्या सिटी चौक सराफा भागात राहणारे दलाल हार्डी यांचा मुलगा सुबोध याची ही अंत्ययात्रा आहे. कैलाश नगरच्या स्मशानभूमीत १५ वर्षीय सुबोधला अग्नि देण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन केली.

सुबोध हा जन्मताच दिव्यांग होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर अनेक उपचार केले. पण ते मुलाला वाचवू शकले नाहीत. सुबोधच्या मृत्यूची बातमी शेजारी राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना समजली तर त्यांनी सुबोधच्या अंत्यसंस्काराची पूर्ण व्यवस्था केली. इतकेच नाही तर सर्व जबाबदारी त्यांनीच पार पाडली. पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सुबोधला स्मशानभूमीत घेऊन गेले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. 

भोपाळमध्ये मानवता धर्म बघायला मिळाला

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) अशीच स्थिती आहे. येथील दानिश सिद्दीकी आणि सद्दाम कुरेशी सारखे तरूण कोरोनाच्या भीतीला माणूसकीच्या भावनेने मात दिली आहे. भोपाळमध्ये राहणारे दोन्ही मुस्लिम तरूण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाने मरणाऱ्या हिंदू लोकांच्या मृतदेहांवर अंत्य संस्कार करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, दानिश आणि सद्दामने आतापर्यंत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या ६० हिंदू लोकांवर अंत्य संस्कार केले आहेत. हे ते लोक आहेत ज्यांच्या घरचे लोक संक्रमणाच्या भीतीने अंत्य संस्कारला येत नाहीयेत किंवा कोरोनाच्या नियमामुळे स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यास पोहोचू शकत नाहीयेत.

दोघेही गेल्या काही दिवसापासून दिवसरात्र हे काम करत आहे. इतकंच काय तर रोजा ठेवला असूनही ते सकाळपासून हॉस्पिटल ते स्मशानभूमीवर फेऱ्या मारत आहेत. ते जाती-धर्म न बघता अंत्य संस्कार करत आहेत. दानिश आणि सद्दाम यांनी हे दाखवून दिलं आहे की, माणूसकीपेक्षा मोठा कोणता धर्म नाही. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी