शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 12:55 IST

अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात.

भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. आजही देशातील ७५ लोक हे शेती करतात. हे देशातील जास्तीत जास्त लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. पण अनेक भागात कमी पाऊस होणे आणि जुन्याच पद्धती वापरल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नाही. अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात.

हीच स्थिती मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल जिल्हा झाबुआमध्ये झाली होती. डोंगराळ आदिवासी क्षेत्रात शेती करणं कठिण होतं. येथील माती आणि पावसाची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना पिक कमी व्हायचं. अशात रमेश बारिया नावाच्या एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या समस्यांवर मात करत चांगली शेती करण्याची इच्छा ठेवली. 

त्यातून त्यांनी २००९-१० मध्ये NAIP (राष्ट्रीय कृषि नवाचार परियोजना) KVK वैज्ञानिकांसोबत संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनात हिवाळा आणि पावसाळ्यात छोटयाशा जागेत भाज्यांची शेती सुरू केली. ही जमिनही अशा पिकासाठी फायदेशीर होती. इथे त्यांनी कारले, लौकीचं पिक घेणं सुरू केलं. लवकरच त्यांनी एक छोटी नर्सरीही सुरू केली. पण पावसाच्या अनिश्चिततेमुळे पाण्याची कमतरता भासत होती.

त्यामुळे त्यांचं आलेलं पिक खराब होत होतं. बारिया यांनी NAIP कडे मदत मागितली. इथे त्यांना सल्ला देण्यात आला की, वेस्ट ग्लूकोज पाण्याच्या बॉटलच्या मदतीने एक सिंचन टेक्निक वापरा. त्यांनी २० रूपये प्रति किलो दराने ग्लूकोज प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला आणि पाण्यासाठी एक इनलेट करण्यासाठी वरचा भाग कापला. ही बॉटल त्यांनी नंतर या झाडांजवळ लटकवल्या.या बॉटलपासून त्यांनी एका एका थेंबाचा स्थिर पाण्याचा प्रवाह तयार केला. त्यांनी त्यांच्या मुलांनाही शाळेत जाण्याआधी या बॉटल्समध्ये पाणी भरण्यास सांगितले. 

फक्त एवढ्या उपायाने ते सीझन संपल्यानंतर 0.1-हेक्टेयर जमिनीतून 15,200 रुपयांचं उत्पादन  घेऊ लागले. या उपायाने ते झाडांना दुष्काळापासून वाचवू शकत तर होतेच सोबतच याने पाण्याची नासाडीही टाळली जात होती. पाण्याचा पुरेपुर आणि योग्य वापर होत होता. तसेच या टेक्निकने कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या ग्लूकोजच्या प्लास्टिक बॉटलचा वापर होऊ लागला. ही टेक्निक लवकरच गावातील इतरही शेतकऱ्यांनी अंगीकारली. रमेश बारिया यांना जिल्हा प्रशासनाने आणि मध्य प्रदेश सरकारने सन्मानितही केले.

क्या बात! 150 वर्षे जुन्या झाडाची एक फांदीही न तोडता बांधलं अनोखं घर, दूरदूरून बघायला येतात इंजिनिअर!

लय भारी! शेतकऱ्यानं केली कमाल; घराच्या छतावर फुलवली ४० प्रकारच्या आंब्याची बाग

टॅग्स :FarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सMadhya Pradeshमध्य प्रदेश