शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 12:55 IST

अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात.

भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. आजही देशातील ७५ लोक हे शेती करतात. हे देशातील जास्तीत जास्त लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. पण अनेक भागात कमी पाऊस होणे आणि जुन्याच पद्धती वापरल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नाही. अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात.

हीच स्थिती मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल जिल्हा झाबुआमध्ये झाली होती. डोंगराळ आदिवासी क्षेत्रात शेती करणं कठिण होतं. येथील माती आणि पावसाची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना पिक कमी व्हायचं. अशात रमेश बारिया नावाच्या एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या समस्यांवर मात करत चांगली शेती करण्याची इच्छा ठेवली. 

त्यातून त्यांनी २००९-१० मध्ये NAIP (राष्ट्रीय कृषि नवाचार परियोजना) KVK वैज्ञानिकांसोबत संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनात हिवाळा आणि पावसाळ्यात छोटयाशा जागेत भाज्यांची शेती सुरू केली. ही जमिनही अशा पिकासाठी फायदेशीर होती. इथे त्यांनी कारले, लौकीचं पिक घेणं सुरू केलं. लवकरच त्यांनी एक छोटी नर्सरीही सुरू केली. पण पावसाच्या अनिश्चिततेमुळे पाण्याची कमतरता भासत होती.

त्यामुळे त्यांचं आलेलं पिक खराब होत होतं. बारिया यांनी NAIP कडे मदत मागितली. इथे त्यांना सल्ला देण्यात आला की, वेस्ट ग्लूकोज पाण्याच्या बॉटलच्या मदतीने एक सिंचन टेक्निक वापरा. त्यांनी २० रूपये प्रति किलो दराने ग्लूकोज प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला आणि पाण्यासाठी एक इनलेट करण्यासाठी वरचा भाग कापला. ही बॉटल त्यांनी नंतर या झाडांजवळ लटकवल्या.या बॉटलपासून त्यांनी एका एका थेंबाचा स्थिर पाण्याचा प्रवाह तयार केला. त्यांनी त्यांच्या मुलांनाही शाळेत जाण्याआधी या बॉटल्समध्ये पाणी भरण्यास सांगितले. 

फक्त एवढ्या उपायाने ते सीझन संपल्यानंतर 0.1-हेक्टेयर जमिनीतून 15,200 रुपयांचं उत्पादन  घेऊ लागले. या उपायाने ते झाडांना दुष्काळापासून वाचवू शकत तर होतेच सोबतच याने पाण्याची नासाडीही टाळली जात होती. पाण्याचा पुरेपुर आणि योग्य वापर होत होता. तसेच या टेक्निकने कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या ग्लूकोजच्या प्लास्टिक बॉटलचा वापर होऊ लागला. ही टेक्निक लवकरच गावातील इतरही शेतकऱ्यांनी अंगीकारली. रमेश बारिया यांना जिल्हा प्रशासनाने आणि मध्य प्रदेश सरकारने सन्मानितही केले.

क्या बात! 150 वर्षे जुन्या झाडाची एक फांदीही न तोडता बांधलं अनोखं घर, दूरदूरून बघायला येतात इंजिनिअर!

लय भारी! शेतकऱ्यानं केली कमाल; घराच्या छतावर फुलवली ४० प्रकारच्या आंब्याची बाग

टॅग्स :FarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सMadhya Pradeshमध्य प्रदेश