शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

भारतातील एक असं गाव जिथे गुलाल, रंगासोबत नाही तर विंचवांसोबत खेळली जाते होळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 12:25 IST

होळीला भारतातील वेगवेगळ्या भागात अनेक रितीरिवाज पाळले जातात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे रंगपंचमी साजरी केली जाते.

भारतातील सर्वात महत्वाच्या उत्सवांपैकी एक म्हणजे होळी आणि रंगपंचमी. यावेळी लोक एकमेकांना रंग लावतात आणि आनंद घेतता. सोबतच वेगवेगळे गोड पदार्थही खातात. हा उत्सव फार जल्लोषात साजरा केला जातो. रंगाने माखलेले इतर लोक पाहून कुणाचंही त्यांच्यासारखं रंग खेळण्याचं मन होईल.

होळीला भारतातील वेगवेगळ्या भागात अनेक रितीरिवाज पाळले जातात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे रंगपंचमी साजरी केली जाते. असाच एक वेगळा प्रकार उत्तर प्रदेशच्या बरसानामध्ये बघायला मिळतो. नंदगाव आणि वृंदावनमधील होळी तर जगभरात प्रसिद्ध आहे 

होळीचा एक सर्वात घातक प्रकार आहे. The Times of India च्या रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे होळीला विंचवांची पूजा केली जाते. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत होळी खेळली जाते. सॅंथना गावातील लोकांना विश्वास आहे की, या दिवशी विंचू दंश मारत नाही. ते विंचवांसोबत अनोख्या पद्धतीने होळी साजरी करतात.

दैनिक जागरणच्या एका लेखानुसार, होळीदरम्यान सर्वच दिवशी या गावतील लोकांना विंचवाचं विष चढतं. सॅंथना गावातील लोक होळीच्या दिवशी भैसान देवीच्या गढावर चढतात आणि तेव्हा तिथे शेकडो विंचू निघतात. हे विंचू लोक आपल्या अंगा-खांद्यावर घेऊन फिरतात. विंचू आरामात लोकांच्या अंगावर राहतात आणि बेफिकिर राहतात. पण अशाप्रकारची होळी खेळण्यामागचं कारण काय हे कुणालाही माहीत नाही. 

होळीचं दहन केल्यावर येथील लोक देवीच्या गढावर जातात. देवीची पूजा करतात. त्यानंतर तेथील दगड बाजूला करतात. ज्यातून शेकडो विंचू बाहेर निघतात. काही लोकांचं मत आहे की, हे लोक गात असलेली गाणी ऐकून विंचू बाहेर येतात. नंतर गाणी गाउन विंचवांना पुन्हा तिथेच सोडलं जातं आणि गावातील लोक घरी परततात. 

टॅग्स :HoliहोळीJara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेश