शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

बोंबला! हनीमूनच्या रात्री जवळ जाताच नवरदेवाला आला खोकला, माहेरी पळून गेली नवरी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 14:29 IST

एक नवरी तिच्या मधुचंद्राच्या रात्रीच सासर सोडून पळाली (Bride Escaped From Suhagrat). याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. 

कोरोना व्हायरसची दहशत किती आणि कशी पसरली आहे याची अनेक उदाहरणे दाखवणाऱ्या घटना समोर येत आहेत. झारखंडमधून (jharkhand) अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण व्हाल. धनबादमधील (Dhanbad) एक नवरी तिच्या मधुचंद्राच्या रात्रीच सासर सोडून पळाली (Bride Escaped From Suhagrat). याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. 

मधुचंद्राच्या रात्री नवरी पसार

असे म्हणतात की, मधुचंद्राची रात्र ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात रात्र असते. पण जर एखाद्याची नवरी याच मधुचंद्राच्या रात्री पळून गेली तर काय होईल? धनबादच्या टुंडीमध्ये नवरी टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत रूममधून बाहेर आली आणि फरार झाली. आणि नवरदेव नवरीची आतुरतेने वाट बघत राहिला. जेव्हा बराच वेळ होऊनही नवरी परसती नाही तर नवरदेवाला शंका आणि त्याने नवरीचा शोध सुरू केला. (हे पण वाचा : लग्नात नवरीनं नवऱ्याला घातलं मंगळसूत्र; मग पुढे घडलं असं काही......)

का पळाली नवरी?

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, नंतर नवरीच्या घरी फोन करण्यात आला तर समजलं की, ती माहेरी आली आहे. या संपूर्ण प्रकारात कोरोना व्हिलन ठरला आहे. कारण कोरोना व्हायरसच्या भीतीने नवरी मधुचंद्राच्या रात्री कुणाला न सांगता माहेरी पळून गेली.

काय झालं त्या रात्री?

३० एप्रिल रोजी धनबादच्या टुंडीजवळील बेगनोरिया गावात राहणाऱ्या तरूणाचं लग्न बरवाअड्डा पोलीस क्षेत्रातील एका गावातील तरूणीसोबत झालं होतं. दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नवरी नवरदेवासोबत सासरी गेली. दिवसभर सगळंकाही ठीक होतं. रात्री साधारण ११ वाजता नवरदेव नवरीजवळ बेडरूममध्ये पोहोचला. यावेळी नवरदेव खोकत होता. त्यामुळे नवरी घाबरली. नवरीला वाटलं की नवरदेवाला कोरोना झालाय. जर ती तिथे थांबली तर तिलाही कोरोनाची लागण होईल.

त्यानंतर नवरीने टॉयलेटला जाण्याचं कारण केलं आणि बाहेर जाऊन तिने माहेरी भावाला फोन केला. तिने भावाला सगळा प्रकार सांगितला आणि भाऊही तिला घेण्यासाठी तिच्या सासरी पोहोचला.  (हे पण वाचा : Video : लॉकडाऊनमध्ये ड्यूटी करणाऱ्या पोलिसांनी चिमुरडीच्या हातात दिला दांडा; मग पाहा काय झालं.....)

दरम्यान, नवरदेवाच्या घरातील अनेकांना ताप होता. परिवारातील लोकांनी कोरोनाची टेस्टही केली होती. अशात सासरच्या कुणीतरी नवरीला गंमतीत म्हणालं की, जर आम्ही लोक कोरोना संक्रमित निघालो तर जवळच्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल. त्यामुळे नवरी घाबरली होती. आता असं समजतं की, एखादा शुभ मुहूर्त पाहून नवरीची पुन्हा पाठवणी केली जाईल. 

टॅग्स :Jharkhandझारखंडcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न