शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

बोंबला! हनीमूनच्या रात्री जवळ जाताच नवरदेवाला आला खोकला, माहेरी पळून गेली नवरी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 14:29 IST

एक नवरी तिच्या मधुचंद्राच्या रात्रीच सासर सोडून पळाली (Bride Escaped From Suhagrat). याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. 

कोरोना व्हायरसची दहशत किती आणि कशी पसरली आहे याची अनेक उदाहरणे दाखवणाऱ्या घटना समोर येत आहेत. झारखंडमधून (jharkhand) अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण व्हाल. धनबादमधील (Dhanbad) एक नवरी तिच्या मधुचंद्राच्या रात्रीच सासर सोडून पळाली (Bride Escaped From Suhagrat). याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. 

मधुचंद्राच्या रात्री नवरी पसार

असे म्हणतात की, मधुचंद्राची रात्र ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात रात्र असते. पण जर एखाद्याची नवरी याच मधुचंद्राच्या रात्री पळून गेली तर काय होईल? धनबादच्या टुंडीमध्ये नवरी टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत रूममधून बाहेर आली आणि फरार झाली. आणि नवरदेव नवरीची आतुरतेने वाट बघत राहिला. जेव्हा बराच वेळ होऊनही नवरी परसती नाही तर नवरदेवाला शंका आणि त्याने नवरीचा शोध सुरू केला. (हे पण वाचा : लग्नात नवरीनं नवऱ्याला घातलं मंगळसूत्र; मग पुढे घडलं असं काही......)

का पळाली नवरी?

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, नंतर नवरीच्या घरी फोन करण्यात आला तर समजलं की, ती माहेरी आली आहे. या संपूर्ण प्रकारात कोरोना व्हिलन ठरला आहे. कारण कोरोना व्हायरसच्या भीतीने नवरी मधुचंद्राच्या रात्री कुणाला न सांगता माहेरी पळून गेली.

काय झालं त्या रात्री?

३० एप्रिल रोजी धनबादच्या टुंडीजवळील बेगनोरिया गावात राहणाऱ्या तरूणाचं लग्न बरवाअड्डा पोलीस क्षेत्रातील एका गावातील तरूणीसोबत झालं होतं. दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नवरी नवरदेवासोबत सासरी गेली. दिवसभर सगळंकाही ठीक होतं. रात्री साधारण ११ वाजता नवरदेव नवरीजवळ बेडरूममध्ये पोहोचला. यावेळी नवरदेव खोकत होता. त्यामुळे नवरी घाबरली. नवरीला वाटलं की नवरदेवाला कोरोना झालाय. जर ती तिथे थांबली तर तिलाही कोरोनाची लागण होईल.

त्यानंतर नवरीने टॉयलेटला जाण्याचं कारण केलं आणि बाहेर जाऊन तिने माहेरी भावाला फोन केला. तिने भावाला सगळा प्रकार सांगितला आणि भाऊही तिला घेण्यासाठी तिच्या सासरी पोहोचला.  (हे पण वाचा : Video : लॉकडाऊनमध्ये ड्यूटी करणाऱ्या पोलिसांनी चिमुरडीच्या हातात दिला दांडा; मग पाहा काय झालं.....)

दरम्यान, नवरदेवाच्या घरातील अनेकांना ताप होता. परिवारातील लोकांनी कोरोनाची टेस्टही केली होती. अशात सासरच्या कुणीतरी नवरीला गंमतीत म्हणालं की, जर आम्ही लोक कोरोना संक्रमित निघालो तर जवळच्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल. त्यामुळे नवरी घाबरली होती. आता असं समजतं की, एखादा शुभ मुहूर्त पाहून नवरीची पुन्हा पाठवणी केली जाईल. 

टॅग्स :Jharkhandझारखंडcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न