शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

हॉस्पिटलमध्ये दिव्यांग मुलीच्या प्रेमात पडला, उचलून घेऊन पूर्ण केली सप्तपदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 1:11 PM

असे म्हणतात की, प्रेमासाठी मनाची तयारी असणे गरजेची असते. मनाची तयारी असेल तर काहीही शक्य होऊ शकतं. अशीच एक वेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे.

(Image Credit : NBT)

असे म्हणतात की, प्रेमासाठी मनाची तयारी असणे गरजेची असते. मनाची तयारी असेल तर काहीही शक्य होऊ शकतं. अशीच एक वेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. ही कहाणी आहे अमित आणि रानूची. या दोघांचं प्रेम हे दाखवतं की, प्रेम असेल तर समाज, परिस्थीती, परिवार यांच्याशी कसं लढलं जातं. ही घटना हरयाणातील आहे. 

अमित हा १०वी पास असून तो वेल्डिंगचं काम करतो. त्याची भेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रानूशी झाली. रानूला पाहताच त्याचं तिच्यावर प्रेम जडलं. रानू ही दिव्यांग आहे. तिचे दोन्ही हात आणि पाय निकामी आहेत. तरीही रानू ही बीए. बीएड आहे. अमितच्या परिवाराचा या प्रेमाला विरोध होता. पण शेवटी विजय अमितच्या प्रेमाचाच झाला. त्याने सगळी बंधने झुगारुन रानूसोबत लग्न केलं. रानू ही स्वत:च्या पायांवर उभी राहू शकत नाही म्हणून अमितने तिला उचलून घेऊन सप्तपदी पूर्ण केली. 

घरच्यांचा विरोध झाला तेव्हा अमितने सनातन धर्म चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने रानूसोबत लग्न केलं. अमितने सांगितले की, 'मी हॉस्पिटलमध्ये वेल्डिंगचं काम करायला जात होतो. रानू तिथे उपचारासाठी अॅडमिट होती. रानूला आई-वडील नाहीत. माझं पहिल्या नजरेतच तिच्यावर प्रेम जडलं. मग मी हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घेऊ लागलो'. रानूही अमितचं हे प्रेम पाहून त्याच्यावर प्रेम करु लागली. 

अमित आणि रानूचं लग्न संस्थेच्या कार्यालयात अगदी साध्या पद्धतीने करण्यात आलं. या लग्नाचा नजारा सर्वांनाच भावून करणारा होता. म्हणजे एकीकडे पंडित मंगलाष्टकं म्हणत होता आणि दुसरीकडे अमित रानूला उचलून घेऊन सप्तपदी पूर्ण करता होता. 

खरंच हे प्रेम करणाऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. रानू दिव्यांग असल्याने तिच्याशी कुणी लग्न करायला तयार होत नव्हतं. खरं प्रेम मिळणं कठीण असतं. पण खरं प्रेम मिळाल्यावर काय होतं हे अमित आणि रानूकडे पाहिल्यावर कळून येतं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्न