शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बोंबला! दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून विजेच्या खांबावर चढले ६० वर्षीय आजोबा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 09:30 IST

या आजोबांना दुसरं लग्न करायचं आहे आणि असं करून ते परिवारावर आणि मुलांवर दबाव टाकत होते.

राजस्थानच्या धौलपूरमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका पाच मुलांचे वडील असलेल्या  ६० वर्षीय वयोवृद्धाने ११ हजार वोल्टेजच्या विजेच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. असे सांगितले जात आहे की, या आजोबांना दुसरं लग्न करायचं आहे. आणि असं करून ते परिवारावर आणि मुलांवर दबाव टाकत होते. महत्वाची बाब म्हणजे या आजोबांना अनेक नातवंडेही आहेत.

या घटनेची माहिती वयोवृद्धाच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना लागली तर एकच गोंधळ उडाला. सुदैवाने ज्यावेळी ही व्यक्ती विजेच्या खांबावर चढली तेव्हा तारांमध्ये करंट नव्हता. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. कुटुंबियांनी लगेच या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी लगेच कारवाई केली. 

कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी खूप समजावल्यावर ही व्यक्ती खाली उतरली. तेव्हा गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. रिपोर्टनुसार, चार वर्षांआधी या व्यक्तीच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्याला तीन मुलं आणि दोन मुली आहेत. पाचही लेकरांची लग्नेही झाली आहेत. त्याला नातवंडेही आहेत. तरी ही व्यक्ती दुसरं लग्न करण्याच्या जिद्दीत खांबावर चढली. त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. (हे पण वाचा : बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...)

सोबरन सिंह असं या व्यक्तीचं नाव असून चार वर्षांआधी त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर तो दुसऱ्या लग्नासाठी तगादा लावत होता. पण यासाठी त्याची मुले तयार नव्हती. त्यामुळे गेल्या रविवारी ७ मार्चला सोबरनने रागात येऊन परिवारावर लग्नासाठी दबाव टाकण्यासाठी खांबावर चढला. 

याबाबत पोलीस अधिकारी सुमन कुमार यांनी सांगितले की, 'एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याची माहिती काढली तर एक ६० वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती दुसरं लग्न लावून द्यावं ही मागणी करण्यासाठी विजेच्या खांबावर चढली होती. ज्यानंतर गावकऱ्यांनी तत्परता दाखवत वीज कापली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना फोन केला. त्यानंतर कसंतरी समजावून त्या व्यक्तीला खाली उतरवलं.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानJara hatkeजरा हटके