आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून जळगावात तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:35 PM2018-12-26T12:35:14+5:302018-12-26T12:35:48+5:30

रेल्वेखाली घेतली उडी

The youth committed suicide in Jalgaon so that the mother did not carry mobile | आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून जळगावात तरुणाची आत्महत्या

आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून जळगावात तरुणाची आत्महत्या

Next

जळगाव : आईने नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला म्हणून सुमेध काकासाहेब भालेराव (खंबाळकर) वय २३, रा.हिरा शिवा कॉलनी, जळगाव या तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनला आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेल्या परिचारिका लिलाबाई भालेराव या खोटे नगरातील हिरा शिवा कॉलनीत वास्तव्याला आहेत. पती मुंबईला असल्याने मुलगा सुमेध हा जळगावला त्यांच्याजवळच होता. तीन दिवसापूर्वीच तो मुंबईहून परत आला. सोमवारी सायंकाळी त्याने आईला नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह केला. त्यावर आईने दोन मोबाईल असतांना नवीन मोबाईल गरज काय असे म्हणत त्याला मोबाईल घेवून देण्यास नकार दिला. यावर सुमेधने आईशी भांडण केले. इतकेच काय त्याने आईचा हातही पिरगळला. वाद झाल्यानंतर मी आता आत्महत्याच करतो असे सांगून तो रात्री आठ वाजता घराबाहेर पडला.
अशी पटली ओळख
रामानंद नगरचे विनोद शिंदे व विजय जाधव यांनी घटनास्थळ गाठले असता सुरुवतीला मयताची ओळख पटत नव्हती. मोबाईल आढळून आले, मात्र तो लॉक असल्याने मर्यादा येत होता. मृतदेहापासून काही अंतरावर दुचाकीही असल्याने तिचा क्रमांक आॅनलाईन वाहन अ‍ॅपमध्ये टाकला असता त्यात भालेराव नाव आहे. त्यामुळे पोलिसांनी भालेराव नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला असता तीन नावे पोलिसांचीच निघाली. तरीही ओळख पटत नव्हती. त्यामुळे शिंदे यांनी काही नगरसेवकांशी संपर्क केला असता त्यातही अपयश आले. सकाळी घटनास्थळी गर्दी झाल्याचे पाहून रुपेश प्रवीण राणे हा तरुण घटनास्थळाकडे आला असता त्याने सुमेधला व त्याची दुचाकी ओळखली.
शिव कॉलनी पुलाजवळ केली आत्महत्या
आईशी वाद घातल्यानंतर सुमेध हा दारु प्यायला गेला. त्यानंतर दुचाकी (एम.एच.क्र.१९ डी.एक्स. ०१४९) घेऊन तो शिव कॉलनी पुलाजवळील रेल्वे रुळाजवळ गेला. तेथे बाजुला दुचाकी लावून खांब क्र. ४१७२ ते २६ च्या दरम्यान कोणत्यातरी धावत्या रेल्वेखली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. रात्री साडे बारा वाजेनंतर ही घटना घडली आहे. रेल्वे स्टेशन उपप्रबंधक अरुण देशमुख यांनी पहाटे तीन वाजता रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरुन सकाळी हेडकॉन्स्टेबल विनोद शिंदे व विजय जाधव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.
एकुलता असल्याने लाडका
लिलाबाई यांना सुमेध हा एकुलता मुलगा होता. वडील मुंबईत आरपीआयचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्याचे प्रचंड लाड केले जात असत. लाडका असल्याने हवी ती वस्तू त्याला मिळत होती. सद्यस्थितीत त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल होते. दरम्यान, याआधी देखील त्याने किरकोळ कारणावरुन वाद घालून आत्महत्येची धमकी आईला दिली होती रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात तो डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला होता, मात्र त्याने ते शिक्षणही अर्धवट सोडून दिल्याची माहिती मिळाली. आता त्याच्यासाठी अमरावतीचे स्थळही आले होते.
मुलांना नकार पचवायची सवय नसते. त्यामुळे एखादी वस्तू किंवा मनासारखे झाले नाही तर मुलगा बेचैन होता. त्यासाठी लहानपणापासून त्यांना स्पष्टपणे नकार द्यावा. आई, वडीलही त्याला जबाबदार आहेत. कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे. मुलगा चुकला असेल तर डोक्यावर हात फिरवून त्याला जवळही घ्यावे.
-प्रतिभा हरणखेडकर, समुपदेशक

Web Title: The youth committed suicide in Jalgaon so that the mother did not carry mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.