शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

vidhan sabha 2019 : यंदाची विधानसभा निवडणूक प्लॅस्टिक मुक्त - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:34 PM

उमेदवारांसह प्रशासनही टाळणार प्लॅस्टिकचा वापर, निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जळगाव : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांनी निवडणूक प्रचारात प्लॅस्टिक साहित्याचा वापर करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले असून प्रशासनही निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्लॅस्टिक साहित्याचा वापर करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार आंनद कळसकर उपस्थित होते.आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करणारआचारसंहिता लागू झाली असल्याने विधानसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. आचारसंहिता पथके तयार करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करणारप्रत्येक तालुक्यात दोन वाहनांद्वारे जगजागृती केली जात असून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.४ हजार ८८२ व्हीव्ही पॅटजिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १७ लाख ९६ हजार ३२६ तर स्त्री मतदार १६ लाख ५० हजार ७२९ व इतर ९३ असे एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ मतदार आहेत. तसेच ११ विधानसभा मतदार संघात एकूण ७ हजार ८४६ सैनिक मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या १४ हजार ८५२ असून जिल्ह्यात एकूण ३ हजार ५३२ मतदान केंद्र आहेत. त्यात सहाय्यकारी मतदान केंद्रांची संख्या ५४ असे एकूण ३ हजार ५८६ मतदान केंद्र आहेत. मतदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ६ हजार ५१३ मतदान यंत्र तर ४ हजार ४३० कंट्रोल युनिट तर ४ हजार ८८२ व्हीव्ही पॅट यंत्रे निवडणुकासाठी उपलब्ध आहेत.२७ सप्टेंबर रोजी अधिसूचना२७ सप्टेंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर आहे. ५ आॅक्टोबर रोजी दाखल अर्जांची छाननी होणार आहे तर ७ आॅक्टोबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. २७ आॅक्टोबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.यासाठी संपूर्ण प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कक्ष प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचीही माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली.अ‍ॅपद्वारे करा थेट तक्रार१९५० या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर मतदारांना निवडणुकीविषयी माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सुविधा, सी-व्हिजिल, सुगम या मोबाईल अ‍ॅपचाही वापर करण्यात येणार आहे. यातील सी-व्हिजिल या अ‍ॅपद्वारे आपल्या मोबाईलवरून पैसे वाटप, इतर गैर अनुचित प्रकारांबाबत थेट तक्रार करण्यात येणार आहे. त्यात त्या ठिकाणचे छायाचित्रही यावर अपलोड करता येणार असून त्याद्वारे प्रशासनाची खात्री पटू शकणार आहे.११ निवडणूक निर्णय अधिकारी तर ३३ सहायक अधिकारीनिवडणुक कामकाजासाठी आवश्यक असलेले मनुष्य बळ पुरेसे उपलब्ध आहेत. त्यांच्या नियुक्तीही करण्यात आल्या असून त्यांना प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. ११ मतदार संघासाठी ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तर ३३ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवडणूक निरीक्षकांची अद्याप नियुक्ती नाहीजिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी अद्याप निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती झालेली नसून ती लवकरच निवडणूक आयोगाकडून होईल व ्यांनतर त्यांचे नावे कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.मतमोजणी केंद्रांचा लवकरच निर्णयजिल्ह्यातील ११ मतदार संघातील मतमोजणी त्या-त्या मतदार संघातच होणार असून मतमोजणी केंद्र लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. मतदान यंत्रांची संपूर्ण तपासणी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.२४ तासाच वाहने जमा कराआचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यातील पदाधिकाºयांचे शासकीय वाहने २४ तासाच जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच राजकीय फलकही काढण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.३६ क्रिटीकल मतदान केंद्रजिल्ह्यातील ११ मतदान केंद्रामध्ये ३६ क्रिटीकल मतदान केंद्र असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मतदान प्रक्रियेदरम्यान ३६० ठिकाणी वेब कास्टिंग होणार असून प्रक्रियेदरम्यानच्या वाहनांवर जीपीएस प्रणाली राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.प्रत्येक मतदार संघात सखी व आदर्श मतदान केंद्रजिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघामध्ये एक सखी मतदान केंद्र व एक आदर्श मतदान केंद्र राहणार आहे. ही किमान संख्या असून त्या पेक्षा जास्त संख्या वाढविण्यावर भर राहणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.सीमावर्ती भागात सात चेकपोस्टमतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येण्यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा सक्रीय करण्यात आली असून पोलीस प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेतली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली. निवडणुकीत बाधा आणणाºया व्यक्तींची यादी पोलीस ठाणेनिहास तयार असल्याचेही डॉ. उगले म्हणाले. गुन्हेगारांना पाठबळ देण्याºयांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी असलेल्या समाजकंटकांची यादी तयार असून त्या व्यतिरिक्त या चार-पाच महिन्याच्या काळातील गुन्हेगारांच्या हालचालीवर पोलिसांची करडी नजर असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात काही गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यासह इतर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सात चेकपोस्ट राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. उगले म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव