शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

कोणाच्या पापण्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:45 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमधील डॉ.अलका कुलकर्णी यांचा लेख दैनंदिन जीवनात आवश्यक असणा:या चहाची उत्पत्ती कशी झाली यासंबंधीची मनोरंजनपर आणि उद्बोधक लेखमाला ‘लोकमत’साठी लिहीत आहेत शहादा येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अलका शशांक कुलकर्णी.

ख्रिस्त पश्चात सहावे शतक. बोधीधर्म विचलित झाले होते. चीनमधल्या ‘शाओलिन’ मठाच्या जवळच्या एका गुहेत त्यांचे तप सुरू होते. बुद्धधर्माचा प्रसार करण्यासाठी ते भारतातून चीनमध्ये आले होते. सतत नऊ वर्षे ध्यान करायचे व्रत त्यांनी घेतले होते. ध्यानाला बसून सात वर्षे पूर्ण झाली होती आणि आता, लक्ष्य जवळ आल्यानंतर, त्यांच्या नश्वर शरीराने त्यांना दगा दिला होता. त्यांना झोप अनावर झाली होती! त्यांनी मन एकाग्र करायचा निक्षून प्रय} केला. समोरच्या भिंतीकडे गेली सात वर्षे त्यांनी टक लावून, पापणी न लववता पाहिले होते. आता मात्र...त्यांनी दीर्घ श्वास घेतला, भ्रू-मध्यावर लक्ष केंद्रित करायचा प्रय} केला, पण व्यर्थ! शेवटी त्यांच्या पापण्या मिटल्याच. इतकी वर्षे तपश्चर्या करूनही त्यांना स्वत:च्या रागावर ताबा मिळवता आला नव्हता. संतापाच्या भरात बोधीधर्मानी दगा देणा:या आपल्या पापण्या उखडून टाकल्या. प्रायश्चित्त घेण्याच्या नादात त्यांनी त्या उकळत्या पाण्यात टाकल्या आणि त्यांचा काढा ते प्यायले, आणि काय आश्चर्य.. त्यांची झोप कुठल्या कुठे पळून गेली. त्यांना शांत वाटू लागले. मनातले विकार नष्ट होऊ लागले. श्वास सुरळीत झाला, छातीतली धडधड कमी झाली. उरलेला काढा जिथे फेकला, तिथे एक अद्भुत झाड उगवले. पाहता पाहता चांगले पाच सहा फूट उंचीचे ते झाले. त्याची पालवी मनोरम होती. कोवळ्या हिरव्या रंगावर अजब सोनेरी छटा पसरली होती. सोनेरी ते शेंडे कसे चमचम करत होते. नीट पाहिल्यानंतर लक्षात येत होते.. शेंडय़ावर तीन पाने होती. बाजूच्या दोन पानांत लपलेली ‘कळी’ म्हणजे खरं तर एक पान होतं. मात्र ते अजून घट्ट मिटलेलं होतं म्हणून एखाद्या कळीसारखं दिसत होतं. एक कळी दोन पाने असलेले ते झाड कशाचे असावे? बोधीधर्माच्या शिष्यांनी त्या झाडाचे शेंडे खुडून काढा केला, आणि प्रसाद म्हणून भक्तीभावाने तो काढा प्यायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! त्याचे अनेक फायदे त्यांना दिसू लागले. मुख्य म्हणजे बुद्ध भिक्षूंच्या ध्यानधारणेसाठी या निरुपद्रवी पेयाचा खूप उपयोग होता. ध्यानात अडथळा आणणारी, झोप दूर करणारे, त्यांना जागृत ठेवणारे हे पेय होते. ‘बुद्ध’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘जागृत होणे’ असा आहे. बौद्ध मठातल्या दैनंदिन जीवनात या पेयाचा वापर सर्रास होऊ लागला. बौद्ध मठात त्याचा प्रसार जसा वाढला, तशी त्याबद्दलची मिथकंही. बोधीधर्म नव्हे तर साक्षात सांख्यमुनींनी [बुद्ध] स्वत:च्या पापण्या उखडल्या, असे मिथक तयार झाले. ह्या पेयाला धार्मिक अधिष्ठान लाभले. बौद्ध मठातून हळुहळू हे औषधी पेय चीन आणि जपानच्या उच्चभ्रू वर्गात आणि तेथून तळागाळातल्या जनतेर्पयत झपाटय़ाने पोहोचले आणि चिनी आणि जपानी संस्कारातील अविभाज्य घटक झाले. त्यासाठी चिनी लिपीत विशिष्ट अक्षर तयार झाले. दोन्ही बाजूला फांद्या व गवत आणि मधे मानवी आकृती असलेले हे अक्षर होते. मानवी जीवनाचा आणि निसगार्चा संबंध आणि तोल दर्शवणारे हे अक्षर होते ..‘चा..’